शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सलमानच्या हिट अँड रनप्रकरणातील फाईल मंत्रालयातील आगीत जळून खाक

By admin | Updated: May 28, 2015 11:44 IST

२०१२ मध्ये मंत्रालयात लागलेल्या भीषण आगीत अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रनप्रकरणातील फाईल जळून खाक झाल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारने दिली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २८ - २०१२ मध्ये मंत्रालयात लागलेल्या भीषण आगीत अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रनप्रकरणातील फाईल जळून खाक झाल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारने दिली आहे. या प्रकरणासंदर्भात दाखल झालेल्या माहिती अधिका-याच्या अर्जावर उत्तर देताना राज्य सरकारने ही माहिती दिली आहे. 
२००२मधील हिट अँड रनप्रकरणात न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवत त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सलमान सध्या जामीनावर बाहेर आहे. याप्रकरणातील राज्य सरकारने आत्तापर्यंत किती सरकारी वकिल, कायदाविषयक सल्लागार नेमले व त्यासाठी किती खर्च झाला याबाबतची माहिती मन्सूर दर्वेश यांनी माहिती अधिकारांतर्गत मागवली होती. '२०१२ मध्ये मंत्रालयाला आग लागल्याने या प्रकरणातील कागदपत्र जळून खाक झाल्याने याबाबतची सखोल माहिती उपलब्ध करुन देता येणार नाही' असे उत्तर राज्य सरकारने दिले आहे.  हिट अँड रन प्रकरणातील वकिल प्रदीप घरत यांची २०१४ मध्ये नियुक्ती करण्यात आली असून प्रति सुनावणीसाठी त्यांना सहा हजार रुपयांचे मानधन दिले जात आहे ऐवढीच माहिती सरकारने दिली आहे. मंत्रालयातील आगीत जळून खाक झालेल्या कागदपत्र पुन्हा तयार केली जातील असे आश्वासन सरकारने त्यावेळी दिले होते. मात्र तीन वर्षांनंतरही सरकारने अशा फाईल्सची माहिती जमवलेली नाही हे स्पष्ट झाले आहे. या दिरंगाईच्या कारभारावर मन्सूर दर्वेश यांनी नाराजी व्यक्त केली आहे.