शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

देशाला बलिदानाचा इतिहास

By admin | Updated: August 25, 2014 01:16 IST

राष्ट्रोन्नतीसाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली आहे. देशाला बलिदानाचा इतिहास आहे. हा इतिहास जपण्याची जबाबदारी युवकांची आहे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ट वाहतूक व जहाज बांधणी मंत्री

नितीन गडकरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संमेलननागपूर : राष्ट्रोन्नतीसाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली आहे. देशाला बलिदानाचा इतिहास आहे. हा इतिहास जपण्याची जबाबदारी युवकांची आहे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ट वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे माधवनगरातील पीएमजी सभागृहात आयोजित या संमेलनाचे गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस, परिषदेचे अखिल भारतीय संघटनमंत्री सुनील आंबेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश तापस, प्रांताध्यक्ष प्रा. केदार ठोसर, प्रांतमंत्री स्वप्निल कठाळे प्रमुख अतिथी होते. राष्ट्रोन्नतीच्या हवनात अनेकांनी स्वत:च्या प्राणाची आहुती दिली आहे. असे कार्यकर्ते आजच्या काळातही आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने बलिदानासाठी सज्ज राहिले पाहिजे. कोणतीही अपेक्षा न ठेवता जोमाने कार्य करणे आवश्यक आहे. सर्वांनी संघटनेच्या मागे ताकदीने उभे राहावे. देश व गरिबांच्या विकासाकरिता लढणारी ही एक वैचारिक संघटना आहे. आपला उद्देश अद्यापही पूर्ण झालेला नाही. परिणामी तन, मन व धनाने कामाला लागा, असे आवाहन गडकरी यांनी केले.परिषदेंतर्गत काम करताना खूप शिकायला मिळते. परिषदेचा कार्यकर्ता विपरीत परिस्थितीत कार्य करतो. यामुळे तो संघर्षशील व मनाने बळकट असतो, असे फडणवीस यांनी सांगितले. संमेलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.(प्रतिनिधी)