शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग किल्ल्याला ३५0 वर्षांचा इतिहास

By admin | Updated: December 9, 2014 23:19 IST

शासनाचे दुर्लक्ष : पुरातत्त्व विभागाची उदासीनता, समृद्ध शिवलंकेचे संवर्धन गरजेचे

महेश सरनाईक : :सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. स्वराज्य रक्षणार्थ सागरी नाकेबंदीची नितांत आवश्यकता आहे, ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने हेरली आणि अरबी समुद्रात सागराच्या लाटा झेलणारा सिंंधुदुर्गचा किल्ला उभा केला. छत्रपतींच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देत आज हा जलदुर्ग डौलाने उभा आहे; पण शासनाचे दुर्लक्ष आणि पुरातत्त्व विभागाची उदासीनता यामुळे साडेतीनशे वर्षांचा इतिहास असलेल्या या सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्त्व आणि दरवर्षी ढासळत चाललेली तटबंदी पाहता या समृद्ध शिवलंकेचे संवर्धन करणे गरजेचे आहे.जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचे राज्य ताब्यात घेऊन आणि अफझलखानाला मारून शिवाजी महाराज सैन्यांसह कोकणात उतरले. त्यांनी स्वराज्याची हद्द समुद्राला भिडविली. आदिलशहाची ठाणी काबीज करून महाराज मालवण किनाऱ्यावर आले. तेव्हा कोकणची स्थिती भयानक होती. आदिलशहा, सिद्दी व पोर्तुगीजांचे अत्याचार, जबरदस्तीने होणारी धर्मांतरे, मंदिरांची तोडफोड, कोकणातील स्त्री-पुरूषांना एकत्रित पकडून परदेशात गुलाम म्हणून केली जाणारी रवानगी हा कोकण प्रांतातला नेहमीचा प्रकार होता. शिवरायांना नियतीने दिलेले हे आव्हान होते. त्याला महाराजांनी दिलेले अचूक व परिणामकारक उत्तर म्हणजे, त्यांनी बांधलेला हा जलदुर्ग. अप्रतिम दुर्गबांधणी व अष्टावधानाचे प्रतिक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीला २४ नोव्हेंबरला तब्बल ३५0 वर्षे पूर्ण झाली. मार्गशिर्ष शके १५८६ व्दितीय म्हणजे २५ नोव्हेंबर १६६४ हा दिवस महाराजांनी किल्ल्याच्या मुहूर्ताचा पहिला दगड बसविण्यासाठी निवडला. किल्ल्याच्या बांधकामासाठी सुरत लुटून मिळविलेले एक कोटी होन खर्च केले. मालवण दांडी समुद्र किनाऱ्यावर ज्या ठिकाणी आहे, तेथे किल्ले सिंधुदुर्गचे भूमिपूजन केले. या ठिकाणाला मोरयाचा धोंडा म्हणून पुढे प्रसिद्धी मिळाली. या ऐतिहासिक दगडावर गणपती, चंद्र, सूर्य, शिवलिंग यांच्या प्रतिकृती कोरल्या आहेत. या ठिकाणी विधिवत गणेश पूजन व सागर पूजन केले. समुद्राला नारळ अर्पण करून सिंधुदुर्ग किल्ल्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर शिवाजी महाराज नौकेतून कुरटे बेटावर गेले. त्यांनी तिथे मुहूर्ताचा पहिला दगड बसविला. त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाली.मालवणच्या सागरी किनाऱ्यावर दगड-खडकांनी वेढलेल्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग आहे. या किल्याचे क्षेत्र ४१ एकर असून, घेर दौन मैल आहे. किल्ल्यास ३२ बुरूज आहेत. तटाची रूंदी सरासरी १0 फूट आहे. तटबंदी नागमोडी वळणाची असून, शत्रूवर तोफा आणि बंदुका यांचा परिणामकारक मारा करण्यासाठी तटाची रचना कौशल्यपूर्ण केली.शिवाजी महाराजांचा पराक्रम व कर्तृत्वाची गाथा जगाला सांगण्यासाठी अरबी समुद्रात हजारो कोटींचे शिवस्मारक उभारले जाणार आहे; परंतु शिवछत्रपतींची शौर्यगाथा या शिवस्मारकात ध्वनी-प्रकाश किरणांच्या कार्यक्रमाद्वारे दाखविण्याऐवजी कोकण किनारपट्टीवर पर्यटक बोटसेवा सुरू करून जलदुर्गांची सफर घडविल्यास या किल्ल्यावरील प्रत्येक बुरूज मर्द मावळे, रजपूत, भंडारी, गाबितांची आरमारी शौर्यगाथा सांगेल. शिवस्मारकावर खर्च करण्याऐवजी किल्ल्यांची ढासळलेली तटबंदी पुन्हा बांधली, तर शिवरायांचा हा इतिहास उजळून निघेल.पुरातत्त्व विभागाची उदासीनतासंस्कृती व पर्यटनाचे प्रतीक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याबाबत शासन आणि पुरातत्त्व विभाग उदासीन आहे. ढासळत चाललेले बुरूज, पडझड झालेली तटबंदी, वैराण माळरान, जीर्ण ऐतिहासिक ठेवे, मंदिरांची दुरवस्था, सोयी-सुविधांचा अभाव, प्लास्टिक प्रदूषणाचा विळखा यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याचे बकाल चित्र पर्यटकांमार्फत जगासमोर जात आहे. हे बदलण्याची मागणी होत आहे.अडीच लाख पर्यटक देतात भेटसिंधुदुर्ग किल्ल्याला दरवर्षी मार्च ते मे आणि आॅक्टोबर ते फेब्रुवारी अशा पर्यटक हंगामात सुमारे २.५0 लाख पर्यटक येथे येत असतात. मालवणातही पर्यटन व्यवसाय वाढला. साडेतीनशे वर्षानंतरही सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्त्व वाढतेच आहे. मालवणचे वाढलेले पर्यटन, जमिनींचे वाढलेले भाव, रोजगाराच्या उपलब्ध झालेल्या संधी या सर्वांत किल्ल्याचे महत्त्व आधुनिक युगातही कायम आहे. पावसाळ्यातील उधाण त्सुनामीसारखी परिस्थिती, अरबी समुद्राच्या अजस्त्र लाटा अंगावर झेलत हा जलदुर्ग मालवण शहराचे रक्षणही करीत आहे.सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी १६९५ मध्ये स्थापन केलेले एकमेवाव्दितीय, असे शिवछत्रपतींचे मंदिर आहे. हेच खरेखुरे शिवछत्रपतींचे स्मारक आहे. या स्मारकाची जपणूक व्हावी.शिवप्रेमींच्या मागण्यासिंधुदुर्ग किल्ला राष्ट्रीय स्मारक म्हणून गौरविला जावामंदिर आणि ऐतिहासिक ठेव्यांचा जीर्णोद्धार व्हावाकिल्ल्याची पडझड थांबवावीकिल्ल्यावर प्रशस्त उद्यान बांधावेकिल्ल्यावर वृक्ष लागवड करावीकोकण किनारपट्टी बोट सुुरूकरावी