शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

मुंबईत जकात कर झाला इतिहासजमा

By admin | Updated: May 21, 2017 04:31 IST

बृहन्मुंबई महापालिकेतील जकात आणि अन्य महापालिकांमधील स्थानिक संस्था कर (एलबीटी) इतिहासजमा करताना, या दोन करांपासूनच्या महसुलाच्या हानीची भरपाई

- यदु जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेतील जकात आणि अन्य महापालिकांमधील स्थानिक संस्था कर (एलबीटी) इतिहासजमा करताना, या दोन करांपासूनच्या महसुलाच्या हानीची भरपाई राज्य शासनाने देण्याची तरतूद असलेले विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी शनिवारी एकमताने मंजूर केले. ‘जीएसटी आल्यानंतर महापालिकांना शासनाकडून दर महिन्याच्या ५ तारखेला कोणत्याही परिस्थितीत भरपाईची रक्कम दिली जाईल,’ अशी ग्वाही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधेयक मांडताना दिली. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) धर्तीवर राज्याचा कायदा करण्यासाठी विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन शनिवारपासून येथे सुरू झाले. पहिल्या दिवशी महापालिकांना भरपाई देण्यासंबंधीचे, तसेच जीएसटी आल्याने काही कर रद्द करण्यासंबंधीचे विधेयक अशा दोन्ही विधेयकांना दोन्ही सभागृहांनी एकमताने मंजुरी दिली. विधान परिषदेत वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ही विधेयके मांडली. विधानसभेत झालेल्या चर्चेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी, जीएसटी अंतर्गत महापालिकांना भरपाई देताना त्या निधीचा योग्य वापर होतो की नाही, हे तपासण्याची यंत्रणाही असली पाहिजे, असा आग्रह धरला. त्यावर मुनगंटीवार यांनी सांगितले की, जगातील अनेक देशांत कामगिरीच्या आधारे २० टक्के निधी देण्याची पद्धत आहे. राज्यात केवळ महापालिकाच नव्हे तर अन्य स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व शासकीय विभागांना कामगिरीचा निकष लाऊन निधी दिला जाईल. दिलेल्या निधीचा योग्य वापर होतो की नाही यावर शासनाची नजर असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकार राज्याला १४ टक्के भरपाई देणार असताना मुंबईसह सर्व महापालिकांना आठ टक्केच भरपाई कशाला, असा सवाल विरोधी पक्ष सदस्यांनी केला. मुनगंटीवार यांनी यावर स्पष्ट केले की, १४ टक्के भरपाई पाच वर्षांपर्यंत महापालिकांना देण्याचा आधी प्रस्ताव होता. मात्र, दरवर्षी ८ टक्के भरपाई कायमस्वरुपी देण्याचा योग्य निर्णय आमच्या सरकारने घेतला.तेवढी रक्कम वजा करणार!महापालिकांना व्यवसाय कर, शिक्षण कर आदी स्थानिक करांपासून मिळणारी रक्कम वजा करून भरपाई देण्याचा शासनाचा विचार आहे. मात्र, त्या बाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. एसजीएसटी १ जुलैपासूनचराज्यात जीएसटीची अंमलबजावणी १ जुलैऐवजी १ सप्टेंबरपासून करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मात्र, मुनगंटीवार यांनी ती फेटाळली. एलबीटी १ जुलैपासून लागू करण्यास केंद्रात काँग्रेसने मान्यता दिलेली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.दरवर्षी ८ टक्के वाढमहापालिकांच्या २०१६-१७ च्या उत्पन्नाला आधार मानून त्यावर दरवर्षी सरासरी आठ टक्के वाढ गृहित धरून येणारी रक्कम महापालिकांना दरवर्षी दिली जाणार आहे. आठ टक्क्यांची वाढ दरवर्षीच्या भरपाईत जोडून त्यावर आठ टक्के भरपाई दिली जाणार आहे. दर महिन्याच्या ५ तारखेला ती महापालिकांच्या खात्यात जमा होईल, अशी तरतूद कायद्यात आहे. तसे झाले नाही तर बँकेकडे असलेल्या शासकीय हमीतून ती रक्कम आपोआप महापालिकांच्या खात्यात जमा होईल.चार वर्षांची स्थित्यंतरेपृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळात २०१३ मध्ये मुंबई महापालिका वगळता अन्य महापालिकांमध्ये एलबीटी लागू करण्यात आला होता. भाजपाने दिलेल्या निवडणूक आश्वासनानुसार एलबीटी रद्द केला आणि त्याच्या नुकसानीपोटीची रक्कम महापालिकांना देणे सुरू केले. ही रक्कम आम्ही केंद्र सरकारकडून मिळवू अशा वल्गना आजच्या सत्तापक्षाने केल्या पण त्यांना ते शक्य झाले नाही. आजच्या निर्णयाने एलबीटीच्या पुनरुज्जीवनाची शक्यता संपुष्टात आली आणि जकातीप्रमाणे हा करदेखील इतिहासजमा झाला आहे. एलबीटीचा कटू अनुभवराज्य शासनाकडून एलबीटीच्या भरपाईपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेबाबतचा अनुभव अजिबात चांगला नाही. भाजपाची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेने एलबीटीच्या भरपाईपोटी वार्षिक ६०० कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली होती पण शासनाने प्रत्यक्षात ३६० कोटी रुपयेच दिले.महापालिकांचे परावलंबित्वजीएसटीतून येणाऱ्या उत्पन्नातून राज्य सरकार महापालिकांना भरपाईची रक्कम देणार असल्याने महापालिका याचक बनतील आणि शासनाच्या मर्जीवर त्यांना अवलंबून राहावे लागेल. राज्यातील सत्तारूढ पक्षाच्या विरोधात असलेल्या महापालिकांवर भरपाईबाबत अन्याय होेईल, अशी भीती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. त्यावर, पुढील पंचवीस-तीस वर्षे आम्हीच सत्तेत राहू आणि असा अन्याय होऊ देणार नाही, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.