शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

हिंजवडीत आयटी कंपनीतील तरुणीची आत्महत्या

By admin | Updated: April 26, 2017 02:59 IST

हिंजवडीतील आयटी कंपनी प्रशासनाने राजीनाम्याची मागणी केल्याने आलेल्या नैराश्यातून आयटी अभियंता तरुणीने राहत्या घरात गळफास घेतला.

वाकड : हिंजवडीतील आयटी कंपनी प्रशासनाने राजीनाम्याची मागणी केल्याने आलेल्या नैराश्यातून आयटी अभियंता तरुणीने राहत्या घरात गळफास घेतला. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. नैराश्येपोटी आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले असले तरी नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मीनल अशोकराव देशमुख (वय २८, रा. अनंतानगर, लक्ष्मी चौक, हिंजवडी, मूळची आंबेजोगाई) असे त्या तरुणीचे नाव आहे. ती पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरी करीत होती. येत्या १८ मे रोजी तिचे लग्न होणार होते. त्यामुळे काही दिवसांपासून ती रजेवर होती. परफॉर्मन्स समाधानकारक नाही. त्यामुळे राजीनामा द्यावा, असा कंपनीतील काही अधिकाऱ्यांनी मीनलला तगादा लावला होता. स्वत:हून राजीनामा दे अथवा कंपनी व्यवस्थापनाला कारवाई करणे भाग पडेल, असे तिला धमकावले जात असल्याने तिला नैराश्य आले होते. असे मीनलची बहीण प्रियांका हिचे म्हणणे आहे. प्रियंकाच्या आरोपामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. या घटने नंतर पोलिसांनीही कमालीची गुप्तता बाळगली असल्याने संशय बळावला आहे. (वार्ताहर)