शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

हिंदूच राहणार नाही, तर विकास काय कामाचा ?- तोगडिया

By admin | Updated: December 30, 2016 21:06 IST

डॉ. प्रवीण तोगडिया यांनी संघभूमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट नाव न घेता टीकास्त्र सोडले.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 30 - एरव्ही रामराग आलपणारे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी संघभूमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट नाव न घेता टीकास्त्र सोडले. देशात बहुसंख्याक असलेल्या हिंदूंवर अत्याचार वाढले आहेत .केंद्र शासन विकास करत आहे. मात्र जर हिंदूच राहणार नाही, तर विकास काय कामाचा राहणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.गुरुवारपासून नागपुरातील माँ. उमिया धाम येथे विहिंपच्या केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रतिनिधी मंडळाच्या संयुक्त अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी मंचावर जितेंद्रनाथ महाराज, त्रिनिदादहून आलेले स्वामी अक्षतानंद, विहिंपचे राष्ट्रीय अध्यक्ष राघव रेड्डी, महामंत्री चंपत राय, विदेश विभागाचे कार्याध्यक्ष अशोक चौगुले, या अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरातील कच्छी विसा मैदानावर त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. देशात विकास करत असताना हिंदूंच्या संरक्षणासाठी व समृद्धीसाठीदेखील प्रयत्न झाले पाहिजेत. अनेक ठिकाणी हिंदू गाव व शहरांतून पलायन करत आहेत. अशीच स्थिती राहिली तर अल्पसंख्यांक आयोगाप्रमाणेच बहुसंख्यांक हक्क संरक्षण आयोगाची स्थापनादेखील करावे लागेल, असे ते म्हणाले. विहिंपने सुरक्षित हिंदू-समृद्ध हिंदू हा संकल्प घेतला आहे. याअंतर्गत ६ सूत्री कार्यक्रम आखला आहे. यात गरीब हिंदूंसाठी भोजन, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, बेरोजगारांसाठी रोजगार, व्यापाऱ्यांची प्रगती आणि शेतकऱ्यांचा विकास या मुद्द्यांचा समावेश आहे, असे ते म्हणाले.