शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

हिंदस्थान हे हिंदुराष्ट्रच - उद्धव ठाकरेंचा सरसंघचालकांना पाठिंबा

By admin | Updated: August 21, 2014 09:28 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 'हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्रच' या विधानाचा पुनरुच्चार करत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या विधानाला सहमती दर्शवली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ -  सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 'हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्रच' या विधानाचा पुनरुच्चार करत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या विधानाला सहमती दर्शवली आहे. 'देश हिंदुत्वाने भारला आहे, हिंदूंच्या विचारांचा वणवा भडकला आहे, यापुढे हिंदू समाज अपमान सहन करणार नाही. कुणाची हरकत असो वा नसो हे हिंदू राष्ट्रच आहे'  असे मत सामनातील अग्रलेखाद्वारे मांडण्यात आले आहे. सं
सरसंघचालकांवर होणा-या टीकेत आश्चर्य वाटण्यासारखे नाही, ज्या देशाचा डोलारा बेगडी निधर्मीवादाच्या ठिसूळ पायावर उभा आहे व जेथे मुस्लिम लांगूलचालन हेच राजकीय पोटापाण्याचे उद्योग आहेत तेथे दुसरे काय होणार असेही लेखात म्हटले आहे. देशात काँग्रेसचे सरकार असताना व मुसलमानी मतांसाठी हिंदू समाजाची गळचेपी सुरू असतानाही आधी स्वातंत्र्यवीर सावरकर व नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी अनेकदा 'हे हिंदू राष्ट्रच आहे' असे ठणकावून सांगितले होते. त्यांनी हिंदुत्वाचा अंगार चेतवल्यानेच कॉंग्रेस व त्यांच्या बगलबच्यांच्या निधर्मी ढोंगाची राखरांगोळी झाली. 
 
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे -
मोदी हे पंतप्रधान झाले ते त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांमुळेच व या देशातील समस्त हिंदू समाजाने जात, पंथ विसरून फक्त हिंदू म्हणूनच शिवसेना-भाजपास मतदान केले. कॉंग्रेसच्या मुसलमानी चाटुगिरीस वैतागलेल्या हिंदू समाजाने बेगडी निधर्मीवादाला मूठमाती दिली व संपूर्ण उत्तर प्रांतात दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह बिहारात एकही मुसलमान खासदार निवडून येऊ शकला नाही. 
हा हिंदू एकजुटीच्या वज्रमुठीचा विजय आहे व ही वज्रमूठ अशीच राहिली तर हा देश ‘हिंदुराष्ट्र’ म्हणून मान्यता पावण्यास फारसा उशीर लागणार नाही.  लोकसभा निवडमुकूतही हेच चित्र दिसले. हिंदूंच्या संयमाचा बांध फुटला व त्याचा परिणाम निवडणुकीत दिसला. कॉंग्रेस, समाजवादी पार्टी वगैरे पक्षांच्या सरकारने १५ टक्के मुस्लिमांच्या धर्मांधतेपुढे सतत गुडघे टेकले आणि त्याचवेळी ८५ कोटी हिंदूंना अपमानित केले आणि त्यांची सहनशक्ती संपली. 
ज्या वंदे मातरम्ने स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली ते वंदे मातरम् गायचे नाही,  कारण पंधरा टक्के मुस्लिम समाजातील धर्मांध नेते विरोध करतात. वंदे मातरम्मुळे मुस्लिमांच्या भावना दुखावतात. त्यांचा इस्लाम खतर्‍यात येतो. 
या देशातील मुसलमान कुटुंब नियोजन पाळत नाही. कारण ‘छोटे कुटुंब सुखी कुटुंब’ ही संकल्पना इस्लामला मान्य नाही. हिंदूंनी लोकसंख्या कमी करायची व मुसलमानांनी वाढवायची. त्यामुळे देशाचा समतोल बिघडला व कॉंग्रेससह सर्व बेगडी निधर्मीवाद्यांनी मुस्लिम मतांसाठी हिंदूंचे अस्तित्वच धोक्यात आणले.
त्यामुळे हिंदू चिडला. तो आधी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीशी उभा राहिला व आता शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद लाभलेल्या मोदी यांच्या पाठीशी उभा राहिला! 
उत्तर प्रदेशात मुलायम यांचे पुत्र राज्य करत असून तेथे हिंदू मुलींना दिवसाढवळ्या उचलून बलात्कार केले जातात. त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जाते व त्याविरोधात आवाज उठविणार्‍यांना गुन्हेगार ठरविले जाते. या सर्व प्रकारामुळे त्यामुळे हिंदू चिडला व त्यांनी लोकसभा निवडणुकीत मुलायम यांचे पानिपत केले. उत्तर प्रदेशातील यादवी संपली व तेथे हिंदुत्ववादी विचारांचे ७१ खासदार निवडून आले. हिंदुत्वाचा हा विजय म्हणजेच हिंदुस्थान हे हिंदुराष्ट्र होत असल्याची पोचपावतीच आहे.
मोदी सत्तेवर येताच हिंदूची अस्मिता ठिणग्यांप्रमाणे चमकू लागली आहे. त्यामुळे मोहन भागवत यांनी आज खुलेआम सांगितले की, हे हिंदुराष्ट्रच आहे! जनतेने मुस्लिम धर्मांधांना पाठीशी घालणारे सरकार खाली खेचले आहे. 
कॉंग्रेसचे सरकार दिल्लीत आणखी काही काळ राहिले असते तर आणखी एका पाकिस्तानच्या मागणीस जोर चढला असता व हे राष्ट्र इस्लामी धर्मांधांचे गुलाम झाले असते, पण लोकशाही मार्गाने हे राष्ट्र हिंदुराष्ट्र झाले. देश हिंदुत्वाने भारला आहे. यापुढे हिंदू समाज अपमान सहन करणार नाही. जो अपमान सहन करेल तो हिंदू रक्ताचा नाही. हिंदूंच्या विचारांचा वणवा भडकला आहे. होय, हे हिंदुराष्ट्रच आहे! कुणाची हरकत असो अगर नसो!