शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

हिंदुंनो, किमान दहा मुले जन्माला घाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2016 05:07 IST

आज हिंदुत्व धोक्यात आले असून, हिंदुंची संख्याही वेगाने कमी होत आहे. हे चित्र बदलायचे असेल, तर ‘हम दो, हमारे दो’ हे सरकारी आवाहन नजरेआड करीत,

नागपूर : आज हिंदुत्व धोक्यात आले असून, हिंदुंची संख्याही वेगाने कमी होत आहे. हे चित्र बदलायचे असेल, तर ‘हम दो, हमारे दो’ हे सरकारी आवाहन नजरेआड करीत, एका हिंदू दाम्पत्याने किमान दहा अपत्य जन्माला घालणे आवश्यक आहे. त्यांचे पोेट कसे भरायचे, याची चिंता करू नका, त्यासाठी परमेश्वर समर्थ आहे, असे वादग्रस्त आवाहन ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी धर्मसंस्कृती महाकुंभाच्या धर्मपीठावरून केले. तीन दिवसीय धर्मसंस्कृती महाकुंभाचा रविवारी समारोप झाला. या वेळी १११८ संतांच्या उपस्थितीत देशरक्षा, संस्कृतीरक्षेचा संकल्प करण्यात आला. स्वामी वासुदेवानंद यांनी हिंदुंना दहा मुले जन्माला घालण्याचे आवाहन केलेले असताना, त्याच व्यासपीठावरून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही काहीसा तोच सूर आळवला. ते म्हणाले, आपल्याला अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल, तर आपल्या पाठीशी मोठी शक्ती असली पाहिजे. ती नसेल तर आपले कुणी ऐकणार नाही. ती शक्ती पाठीशी उभी करण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरांचे समर्थन आवश्यक आहे. या महाकुंभाच्या निमित्ताने हा संदेश देशभर जायला हवा, अशी अपेक्षाही सरसंघचालकांनी या वेळी व्यक्त केली. धर्माचार्यांचे योगदान गरजेचे - मुख्यमंत्रीभारताने नेहमीच जगाला चांगले विचार दिले आहेत. जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारतात आहे. असे जागतिक नेतृत्व स्वीकारताना त्यात धर्माचार्यांचे योगदान गरजेचे आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राममंदिराचे पुनर्बांधकाम हा प्रत्येक हिंदूच्या स्वाभिमानाचा विषय आहे. परंतु अद्याप राममंदिराचे बांधकाम का होऊ शकलेले नाही, देशभरात गोहत्या आजही सर्रास सुरू आहे. ती का बंद होत नाही, असा खडा सवाल विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केला. त्यांचा रोख केंद्र सरकारवर होता. हिंदूंच्या आजच्या स्थितीबाबत बोलताना तोगडिया म्हणाले, या देशात हिंदूंची संख्या आधी ८६ टक्के होती. आज ती कमी होऊन ८० टक्क्यांच्या खाली आली आहे. उलट मुस्लिमांची संख्या वेगाने वाढत आहे. अनेक राज्यात दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या हिंदूंना निवडणूक लढवता येत नाही. मुस्लीम समाजाला असे बंधन कुणी घालत नाही. हिंदूंची संख्या अशीच वेगाने कमी होत राहिली तर पुढच्या शंभर वर्षात हिंदूच या देशात अल्पसंख्यक होतील, अशी भीतीही तोगडिया यांनी व्यक्त केली. देवांच्या नावावर केला जाणारा जातीभेद कुणालाच मान्य नाही. राम, कृष्ण, शंकराला कोणतीच जात नाही. ते सर्वांचे भगवान आहेत, असे या महाकुंभाचे राष्ट्रीय निमंत्रक जितेंद्रनाथ महाराज यांनी सांगितले. (प्रतिनिधी)