शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

महाराष्ट्रात दर तासाला अपहरण

By admin | Updated: September 13, 2016 04:02 IST

सगळयात जास्त अपहरणे होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे. गेल्या वर्षी रोज जवळपास २३ म्हणजे तासाला एक अपहरणाचा गुन्हा नोंद होत होता.

नितीन अग्रवाल ,  नवी दिल्लीसगळयात जास्त अपहरणे होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे. गेल्या वर्षी रोज जवळपास २३ म्हणजे तासाला एक अपहरणाचा गुन्हा नोंद होत होता. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात गेल्या वर्षी (२०१५) अपहरणाच्या ८,२५५ घटना घडल्या.

राज्यात नोंदल्या गेलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये प्रत्येक चौथा किंवा पाचवा गुन्हा हा अपहरणाचा होता. गंभीर गुन्ह्याचे ३७,२९० प्रकरणे नोंद झाली. त्यात २२.१ गुन्हे अपहरणाचे होते. सगळयात जास्त अपहरणाचे गुन्हे (११,९९९) हे उत्तर प्रदेशात व त्यानंतर राजधानी दिल्लीत (७,७३०) नोंद झाले. त्यानंतरचा क्रमांक आहे बिहार (७,१२८) मध्य प्रदेश (६,.६७७८), पश्चिम बंगाल (६११५), आसाम (५,८३१),राजस्थान (५४२६) आणि हरियाना (३,५२०).

देशात अपहरणाचे एकूण गुन्हे ८२,९९९ नोंद झाले. त्यातील ३१,८२९ महिलांशी जबरदस्तीने विवाह करणे व ३,३३८ महिलांना अनैतिक संबंधांसाठी पळवून नेण्यात आले. अपहरण करणाऱ्यांमध्ये १,१८३ जणांना ठार मारण्यात आले तर १,२०३ जणांचे अपहरण बेकायदेशीर कारवायांसाठी केले गेले. खंडणीसाठी ७७४ तर ४३३ जणांचे सूड घेण्यासाठी पळवून नेण्यात आले. राजधानी दिल्लीअपहरणाच्या संख्येचा विचार केला, तर दिल्लीचे स्थान उत्तर प्रदेश व महाराष्ट्रानंतरचे, परंतु लोकसंख्येच्या तुलनेत येथे सगळ््यात जास्त अपहरणाचे गुन्हे नोंद झाले आहेत. एनसीआरबीच्या माहितीनुसार, दिल्लीत दर एक लाख व्यक्तिंमागे अपहरणाचे ३७ गुन्हे नोंदले गेले. संपूर्ण देशात दर एक लाख लोकसंख्येमागे सरासरी ६.६ व्यक्ती अपरहणाच्या बळी ठरल्या. दिल्ली नंतर क्रमांक लागतो तो आसाम (१८.१), अरुणाचल (१३.४) चंदीगड (१३.२) आणि हरियाणा (१२.९) यांचा. सगळ््यात जास्त गुन्हे उत्तर प्रदेशात दर एक लाख लोकसंख्येमागे ५.६ आणि महाराष्ट्रात ६.९ लोकांचे अपहरण झाल्याची तक्रार होती.