शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

हायवे झाले दारूमुक्त

By admin | Updated: April 2, 2017 03:17 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील हायवेवरील दारूची दुकाने, तसेच बार, पब आणि दारू विक्री करणारी रेस्टॉरंटस शनिवारी सकाळपासूनच बंद व्हायला सुरुवात झाली

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील हायवेवरील दारूची दुकाने, तसेच बार, पब आणि दारू विक्री करणारी रेस्टॉरंटस शनिवारी सकाळपासूनच बंद व्हायला सुरुवात झाली. काही ठिकाणी बार व दुकानमालकांनी स्वत:हूनच सकाळी दुकाने उघडली नाहीत, तर राज्याच्या बऱ्याच भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली.विदर्भात महामार्गांवरील २,१२६ दारूची दुकाने बंद झाली असून, नागपूर जिल्ह्यातील ८७१ परमिट रूम, बार, विदेशी व देशी दारूची दुकाने आणि बीअर शॉपींना सील ठोकण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात सुमारे ४०० दारू दुकाने बंद करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील २४९ पैकी २१९ दुकाने बंद झाली. बुलडाणा जिल्ह्यातील ३६१, वाशिम जिल्ह्यातील १६२ आणि अकोला जिल्ह्यातील २२१ दुकानांना टाळे लावण्यात आले वा मालकांनी स्वत:च ती बंद ठेवली. जवळपास १४ अधिकाऱ्यांसह ५० जणांच्या चमूने शनिवारी विदर्भात कारवाई केली. चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीच आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील ८८७ दुकानांना टाळे लावण्यात आले. सांगली जिल्ह्यातील ६२४ दुकाने बंद झाली. सातारा जिल्ह्यातील दुकानेही बंद होती. सोलापूर जिल्ह्यातील ८९५ पैकी तब्बल ६४६ बार, रेस्टॉरण्टस व दुकानांना टाळे ठोकण्यात आले़ यापैकी ५२३ दुकाने सोलापूर शहरातील आहेत़ पुणे शहरानजीकची जवळपास ८० टक्के दारूची दुकाने बंद झाली. शहरात महामार्गांलगत १९५० बार असून, जवळपास पाचशे वाइन्स शॉप आहेत. त्यातील केवळ २० टक्केच आता सुरू राहणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी दिली. कोकणातील दुकानेही सील करण्यात आली. रत्नागिरीतील २९४ तर सिंधुदुर्गात २३२ दुकानांना टाळे लागले. अहमदनगर जिल्ह्यातील ८२५ पैकी ६७५ दुकाने बंद करण्यात आली. मराठवाड्यातही धडक मोहीम राबवून दुकाने बंद करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील ४९४, हिंगोली जिल्ह्यातील १६५ आणि परभणी जिल्ह्यातील २१६ दुकाने बंद करण्यात आली. गोव्यात पहिल्यांदा बंदपणजी : गोव्यातील ३ हजार २१० दारूची दुकाने शनिवारी बंदच होती. गोवा हे पर्यटन राज्य आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे ३ हजार २१० मद्यालये बंद राहाण्याचा अनुभव राज्याला प्रथमच येत आहे. या दुकानांना पाचशे मीटर अंतराच्या बाहेर स्थलांतर करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.परवाने रद्द केलेले नाहीतआम्ही दारूविक्रीचे परवाने रद्द केलेले नाहीत. महामार्गापासून ५०० मीटर अंतरापुढे बार आणि दारूची दुकाने अन्यत्र हलविण्याची परवानाधारकांना मोकळीक आहे. दारूचा साठा नसलेल्यांना ‘नील’चे प्रमाणपत्र दिले जात आहे, तर बार व रेस्टॉरन्ट एकत्र असलेल्या ठिकाणी दारूच्या गोदामाला सील लावले आहे, असे राज्य उत्पादन शुल्क (नागपूर विभाग)च्या अधीक्षिका स्वाती काकडे म्हणाल्या.हॉटेलमध्ये जाऊन मद्यपान करणाऱ्यांची संख्या ७० टक्के आहे. केवळ ३० लोक दुकानांमधून मद्य खरेदी करतात. या निर्णयामुळे राज्यातील ८० टक्के बार व दुकाने बंद झाली आहेत. खरे तर वाइन आणि इतर मद्य असा फरक सरकारने केला पाहिजे, असे इंडियन ग्रेप असोसिएशन बोर्डाचे माजी अध्यक्ष जगदीश होळकर यांनी सांगितले.खान्देशात नंदुरबार वगळता, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील अनुक्रमे ६०० आणि २६० दुकाने बंद करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील बहुसंख्य दुकाने महामार्गापासून ५०० मीटर दूर असल्याने, ती सुरूच राहिली. नाशिक जिल्ह्यातील ७८० दुकानांवर कारवाई करण्यात आली.