शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

हायवे झाले दारूमुक्त

By admin | Updated: April 2, 2017 03:17 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील हायवेवरील दारूची दुकाने, तसेच बार, पब आणि दारू विक्री करणारी रेस्टॉरंटस शनिवारी सकाळपासूनच बंद व्हायला सुरुवात झाली

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील हायवेवरील दारूची दुकाने, तसेच बार, पब आणि दारू विक्री करणारी रेस्टॉरंटस शनिवारी सकाळपासूनच बंद व्हायला सुरुवात झाली. काही ठिकाणी बार व दुकानमालकांनी स्वत:हूनच सकाळी दुकाने उघडली नाहीत, तर राज्याच्या बऱ्याच भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली.विदर्भात महामार्गांवरील २,१२६ दारूची दुकाने बंद झाली असून, नागपूर जिल्ह्यातील ८७१ परमिट रूम, बार, विदेशी व देशी दारूची दुकाने आणि बीअर शॉपींना सील ठोकण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात सुमारे ४०० दारू दुकाने बंद करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील २४९ पैकी २१९ दुकाने बंद झाली. बुलडाणा जिल्ह्यातील ३६१, वाशिम जिल्ह्यातील १६२ आणि अकोला जिल्ह्यातील २२१ दुकानांना टाळे लावण्यात आले वा मालकांनी स्वत:च ती बंद ठेवली. जवळपास १४ अधिकाऱ्यांसह ५० जणांच्या चमूने शनिवारी विदर्भात कारवाई केली. चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीच आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील ८८७ दुकानांना टाळे लावण्यात आले. सांगली जिल्ह्यातील ६२४ दुकाने बंद झाली. सातारा जिल्ह्यातील दुकानेही बंद होती. सोलापूर जिल्ह्यातील ८९५ पैकी तब्बल ६४६ बार, रेस्टॉरण्टस व दुकानांना टाळे ठोकण्यात आले़ यापैकी ५२३ दुकाने सोलापूर शहरातील आहेत़ पुणे शहरानजीकची जवळपास ८० टक्के दारूची दुकाने बंद झाली. शहरात महामार्गांलगत १९५० बार असून, जवळपास पाचशे वाइन्स शॉप आहेत. त्यातील केवळ २० टक्केच आता सुरू राहणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी दिली. कोकणातील दुकानेही सील करण्यात आली. रत्नागिरीतील २९४ तर सिंधुदुर्गात २३२ दुकानांना टाळे लागले. अहमदनगर जिल्ह्यातील ८२५ पैकी ६७५ दुकाने बंद करण्यात आली. मराठवाड्यातही धडक मोहीम राबवून दुकाने बंद करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील ४९४, हिंगोली जिल्ह्यातील १६५ आणि परभणी जिल्ह्यातील २१६ दुकाने बंद करण्यात आली. गोव्यात पहिल्यांदा बंदपणजी : गोव्यातील ३ हजार २१० दारूची दुकाने शनिवारी बंदच होती. गोवा हे पर्यटन राज्य आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे ३ हजार २१० मद्यालये बंद राहाण्याचा अनुभव राज्याला प्रथमच येत आहे. या दुकानांना पाचशे मीटर अंतराच्या बाहेर स्थलांतर करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.परवाने रद्द केलेले नाहीतआम्ही दारूविक्रीचे परवाने रद्द केलेले नाहीत. महामार्गापासून ५०० मीटर अंतरापुढे बार आणि दारूची दुकाने अन्यत्र हलविण्याची परवानाधारकांना मोकळीक आहे. दारूचा साठा नसलेल्यांना ‘नील’चे प्रमाणपत्र दिले जात आहे, तर बार व रेस्टॉरन्ट एकत्र असलेल्या ठिकाणी दारूच्या गोदामाला सील लावले आहे, असे राज्य उत्पादन शुल्क (नागपूर विभाग)च्या अधीक्षिका स्वाती काकडे म्हणाल्या.हॉटेलमध्ये जाऊन मद्यपान करणाऱ्यांची संख्या ७० टक्के आहे. केवळ ३० लोक दुकानांमधून मद्य खरेदी करतात. या निर्णयामुळे राज्यातील ८० टक्के बार व दुकाने बंद झाली आहेत. खरे तर वाइन आणि इतर मद्य असा फरक सरकारने केला पाहिजे, असे इंडियन ग्रेप असोसिएशन बोर्डाचे माजी अध्यक्ष जगदीश होळकर यांनी सांगितले.खान्देशात नंदुरबार वगळता, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील अनुक्रमे ६०० आणि २६० दुकाने बंद करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील बहुसंख्य दुकाने महामार्गापासून ५०० मीटर दूर असल्याने, ती सुरूच राहिली. नाशिक जिल्ह्यातील ७८० दुकानांवर कारवाई करण्यात आली.