शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

अतिवृष्टीचा भातपिकाला फटका

By admin | Updated: July 22, 2016 01:07 IST

आंबेगाव तालुक्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्याच्या आदिवासी भागातील भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले

डिंभे : मागील आठवड्यात आंबेगाव तालुक्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्याच्या आदिवासी भागातील भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भातखाचरांचे बांध वाहून गेले, तर नुकतीच उगवू लागलेली भातरोपे अतिवृष्टीमुळे सडून नुकसान झाल्याने यंदा आंबेगाव तालुक्याच्या भीमाशंकर, पाटण व आहुपे खोऱ्यांतील मोठे भातक्षेत्र लागवडीपासन वंचित राहणार आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याच्या आदिवासी भागातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. भीमाशंकर खोऱ्यातील गोहे, आहुपे व पाटण खोऱ्यांतील असाण, अडिवरे, पाटण, महाळुंगे, बेंढारवाडी येथील शेतकऱ्यांच्या भातखाचरांचे बांध फुटून ती वाहून गेली आहेत. तर पोखरी, फुलवडे, राजपूर, जांभोरी, तळेघर, कोंढवळ, आहपे, डोण, तिरपाड, न्हावेड, कोंढरे या भागात नुकत्याच उगवू लागलेल्या भातरोपांत पाणी साठल्याने कोवळी भातरोपे सडून गेली आहेत. यामुळे यंदा लागडीसाठी रोपेच उपलब्ध नसल्याने लागवड कशी करायची, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. याचा परिणाम तालुक्यातील एकूणच भातक्षेत्रावर होणार आहे. यामुळे यंदा आंबेगाव तालुक्यातील भातक्षेत्र लागवडीपासून वंचित राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पाटाने पाणी देऊन शेतकऱ्यांनी कशीबशी भातरोपे जगवली होती. मात्र, ऐन भातरोपे उगवण्याच्या काळातच तब्बल आठवडाभर पावसाने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात मुसळधार हजेरी लावली. भातखाचरे तुडुंब भरली. आठवडाभर रोपांतील पाणी काढून-काढून शेतकरी मेटाकुटीला आले, तरीही रोपांत तलावासारखी स्थिती निर्माण झाली. यामुळे नुकतीच उगवू लागलेली कोवळी रोपे सडून गेली आहेत. तर, अतिवृष्टीमुळे भातखाचरांचे बांध फुटून भात उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची शेतकरी मागणी करू लागले असून, नुकसान झालेल्या शेतीची भरपायी मिळण्याची शेतऱ्यांकडून मागणी होऊ लागली आहे.>५,५०० हेक्टर क्षेत्र : लागवड घटलीआंबेगाव तालुक्यात एकूण ५,५०० हेक्टर एवढे एकूण भातक्षेत्र आहे. या क्षेत्रावर तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून आहे. भातशेती हेच या भागातील शेतकऱ्यांचे एकमेव व मुख्य पीक आहे. मात्र, यंदा भातपेरणीपासूनच भातशेती संकटात सापडू लागली आहे. कशाबशा शेतकऱ्यांनी भातपेरण्या केल्या होत्या, त्या वेळी शेतकऱ्यांना पावसाची अपेक्षा होती तेव्हा पाऊस झाला नाही.