शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीचा भातपिकाला फटका

By admin | Updated: July 22, 2016 01:07 IST

आंबेगाव तालुक्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्याच्या आदिवासी भागातील भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले

डिंभे : मागील आठवड्यात आंबेगाव तालुक्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्याच्या आदिवासी भागातील भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भातखाचरांचे बांध वाहून गेले, तर नुकतीच उगवू लागलेली भातरोपे अतिवृष्टीमुळे सडून नुकसान झाल्याने यंदा आंबेगाव तालुक्याच्या भीमाशंकर, पाटण व आहुपे खोऱ्यांतील मोठे भातक्षेत्र लागवडीपासन वंचित राहणार आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याच्या आदिवासी भागातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. भीमाशंकर खोऱ्यातील गोहे, आहुपे व पाटण खोऱ्यांतील असाण, अडिवरे, पाटण, महाळुंगे, बेंढारवाडी येथील शेतकऱ्यांच्या भातखाचरांचे बांध फुटून ती वाहून गेली आहेत. तर पोखरी, फुलवडे, राजपूर, जांभोरी, तळेघर, कोंढवळ, आहपे, डोण, तिरपाड, न्हावेड, कोंढरे या भागात नुकत्याच उगवू लागलेल्या भातरोपांत पाणी साठल्याने कोवळी भातरोपे सडून गेली आहेत. यामुळे यंदा लागडीसाठी रोपेच उपलब्ध नसल्याने लागवड कशी करायची, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. याचा परिणाम तालुक्यातील एकूणच भातक्षेत्रावर होणार आहे. यामुळे यंदा आंबेगाव तालुक्यातील भातक्षेत्र लागवडीपासून वंचित राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पाटाने पाणी देऊन शेतकऱ्यांनी कशीबशी भातरोपे जगवली होती. मात्र, ऐन भातरोपे उगवण्याच्या काळातच तब्बल आठवडाभर पावसाने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात मुसळधार हजेरी लावली. भातखाचरे तुडुंब भरली. आठवडाभर रोपांतील पाणी काढून-काढून शेतकरी मेटाकुटीला आले, तरीही रोपांत तलावासारखी स्थिती निर्माण झाली. यामुळे नुकतीच उगवू लागलेली कोवळी रोपे सडून गेली आहेत. तर, अतिवृष्टीमुळे भातखाचरांचे बांध फुटून भात उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची शेतकरी मागणी करू लागले असून, नुकसान झालेल्या शेतीची भरपायी मिळण्याची शेतऱ्यांकडून मागणी होऊ लागली आहे.>५,५०० हेक्टर क्षेत्र : लागवड घटलीआंबेगाव तालुक्यात एकूण ५,५०० हेक्टर एवढे एकूण भातक्षेत्र आहे. या क्षेत्रावर तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून आहे. भातशेती हेच या भागातील शेतकऱ्यांचे एकमेव व मुख्य पीक आहे. मात्र, यंदा भातपेरणीपासूनच भातशेती संकटात सापडू लागली आहे. कशाबशा शेतकऱ्यांनी भातपेरण्या केल्या होत्या, त्या वेळी शेतकऱ्यांना पावसाची अपेक्षा होती तेव्हा पाऊस झाला नाही.