शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

प्रदूषणाचा उच्चांक

By admin | Updated: May 20, 2015 02:49 IST

औद्योगिक विभागातील औरंगाबाद, नवी मुंबई, डोंबिवली आणि चंद्रपूर या चार शहरांनी प्रदूषणाची धोकादायक पातळी ओलांडल्यामुळे या शहरांचा विकास ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धोक्याची पातळी ओलांडली : औद्योगिक पट्ट्यातील औरंगाबाद, नवी मुंबई, डोंबिवली आणि चंद्रपूरचा समावेशअतुल कुलकर्णी - मुंबईशहरातील जीवनमान अधिक सुखकारक व्हावे, यासाठी ‘स्मार्ट सिटी’ची संकल्पना राबविण्याचा संकल्प केंद्र आणि राज्य सरकारने सोडलेला असतानाच औद्योगिक विभागातील औरंगाबाद, नवी मुंबई, डोंबिवली आणि चंद्रपूर या चार शहरांनी प्रदूषणाची धोकादायक पातळी ओलांडल्यामुळे या शहरांचा विकास ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.केंद्रीय पर्यावरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार देभरातील ८८ औद्योगिक क्लस्टर्सचा अभ्यास केला गेला. त्यापैकी ४३ क्लस्टर्स प्रदूषणाच्या बाबतीत अतिसंवेदनशील (क्रिटिकली पोल्युटेड एरिया) म्हणून घोषित केले गेले. त्यात महाराष्ट्रातील वरील चार औद्योगिक विभागांचा समावेश आहे. सर्वंकष प्रदूषण निर्देशांकानुसार (कॉम्प्रेहेन्सिव्ह एन्व्हायरमेंटल पोल्युशन इंडेक्स) चंद्रपूरचे गुण ८० हून अधिक आहेत, तर त्या खालोखाल औरंगाबादचे ७७.४४ एवढे गुण आहेत. नवी मुंबई आणि डोंबिवली शहराचे गुणही ७६ ते ७७ आहेत. पन्नासहून अधिक निर्देशांक असलेली शहरं प्रदूषणाच्या बाबतीत धोकादायक समजली जातात. प्रदूषणाची धोकादायक पातळी ओलांडलेल्या या शहरांना प्रदूषण कमी करण्याबाबत कृती आराखडा देण्यात आलेला होता. दूषित हवा, कचरा प्रकल्प, केमिकल्सची विल्हेवाट लावण्याचे प्रकल्प तत्काळ हाती घेण्याचे बंधन घातले गेले.पाच वर्षांची मुदत संपली तरी प्रदूषण कमी केले नाही. त्यामुळे तेथे विकास योजना राबविताना मर्यादा येणार आहेत. प्रदूषण कमी करण्याबाबत आपण चारही शहरांतील मनपा अधिकाऱ्यांना बजावण्यात आलेले आहे. सुधारणा करण्यास वेळ दिला जात आहे. दिलेल्या मुदतीत ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर संबंधित शहरांच्या विकासावर बंधने येतील.- सीताराम कुंटे, प्रधान सचिव, पर्यावरण विभाग