शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

प्रदूषणाचा उच्चांक

By admin | Updated: May 20, 2015 02:49 IST

औद्योगिक विभागातील औरंगाबाद, नवी मुंबई, डोंबिवली आणि चंद्रपूर या चार शहरांनी प्रदूषणाची धोकादायक पातळी ओलांडल्यामुळे या शहरांचा विकास ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धोक्याची पातळी ओलांडली : औद्योगिक पट्ट्यातील औरंगाबाद, नवी मुंबई, डोंबिवली आणि चंद्रपूरचा समावेशअतुल कुलकर्णी - मुंबईशहरातील जीवनमान अधिक सुखकारक व्हावे, यासाठी ‘स्मार्ट सिटी’ची संकल्पना राबविण्याचा संकल्प केंद्र आणि राज्य सरकारने सोडलेला असतानाच औद्योगिक विभागातील औरंगाबाद, नवी मुंबई, डोंबिवली आणि चंद्रपूर या चार शहरांनी प्रदूषणाची धोकादायक पातळी ओलांडल्यामुळे या शहरांचा विकास ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.केंद्रीय पर्यावरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार देभरातील ८८ औद्योगिक क्लस्टर्सचा अभ्यास केला गेला. त्यापैकी ४३ क्लस्टर्स प्रदूषणाच्या बाबतीत अतिसंवेदनशील (क्रिटिकली पोल्युटेड एरिया) म्हणून घोषित केले गेले. त्यात महाराष्ट्रातील वरील चार औद्योगिक विभागांचा समावेश आहे. सर्वंकष प्रदूषण निर्देशांकानुसार (कॉम्प्रेहेन्सिव्ह एन्व्हायरमेंटल पोल्युशन इंडेक्स) चंद्रपूरचे गुण ८० हून अधिक आहेत, तर त्या खालोखाल औरंगाबादचे ७७.४४ एवढे गुण आहेत. नवी मुंबई आणि डोंबिवली शहराचे गुणही ७६ ते ७७ आहेत. पन्नासहून अधिक निर्देशांक असलेली शहरं प्रदूषणाच्या बाबतीत धोकादायक समजली जातात. प्रदूषणाची धोकादायक पातळी ओलांडलेल्या या शहरांना प्रदूषण कमी करण्याबाबत कृती आराखडा देण्यात आलेला होता. दूषित हवा, कचरा प्रकल्प, केमिकल्सची विल्हेवाट लावण्याचे प्रकल्प तत्काळ हाती घेण्याचे बंधन घातले गेले.पाच वर्षांची मुदत संपली तरी प्रदूषण कमी केले नाही. त्यामुळे तेथे विकास योजना राबविताना मर्यादा येणार आहेत. प्रदूषण कमी करण्याबाबत आपण चारही शहरांतील मनपा अधिकाऱ्यांना बजावण्यात आलेले आहे. सुधारणा करण्यास वेळ दिला जात आहे. दिलेल्या मुदतीत ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर संबंधित शहरांच्या विकासावर बंधने येतील.- सीताराम कुंटे, प्रधान सचिव, पर्यावरण विभाग