शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

दारूकांडप्रकरणी उच्चस्तरीय समिती

By admin | Updated: July 14, 2015 01:51 IST

राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या मालवणी विषारी दारूकांडप्रकरणाची चौकशी करण्यासाठी गृह विभागाला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला. या दुर्घटनेमागील नेमके कारण

- जमीर काझी, मुंबईराज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या मालवणी विषारी दारूकांडप्रकरणाची चौकशी करण्यासाठी गृह विभागाला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला. या दुर्घटनेमागील नेमके कारण शोधून आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी अपर मुख्य सचिव (गृह) के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली पाच उच्च पदस्थ सनदी अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. तीन महिन्यांत समितीने अहवाल सादर करायचा आहे. पावसाळी अधिवेशनात मालवणी विषारी दारूकांडप्रकरणी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता असल्याने अधिवेशनापूर्वी तातडीने चौकशी समिती स्थापून सरकारने बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. राज्यभरात गावठी दारूभट्ट्यांविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र शासकीय अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे राजरोसपणे सुरू असलेल्या विषारी दारूविक्रीमागील मुख्य सूत्रधार अद्याप पडद्याआडच आहेत.मालवणी, मालाड येथे १८ जूनला विषारी दारूकांडाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश पाटील यांच्यासह ८ पोलिसांना निलंबित केले. तर उत्पादन शुल्क विभागाने दोघा निरीक्षकांसह चार जणांवर कारवाई केली. या प्रकरणाची व्याप्ती वाढत राहिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार तब्बल महिन्याभरानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने १० आॅक्टोबरपर्यंत अहवाल शासनाला सादर करायचा आहे. त्यांच्या शिफारशीनुसार शासनाकडून कारवाई करण्यात येईल, असे गृह विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. - चौकशी समितीमध्ये गृह सचिव के.पी. बक्षी यांच्याशिवाय विधी व न्याय विभाग, महसूल, समाज कल्याण आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिवांचा समावेश आहे. समितीला चौकशीच्या अनुषंगाने कोणत्याही व्यक्ती, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याला पाचारण करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.