शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

जवखेडा हत्याकांड तपासाचे हायकोर्टास हवे प्रतिज्ञापत्र

By admin | Updated: February 3, 2015 01:30 IST

अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या तपासाची माहिती प्रतिज्ञापत्र करून सादर करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

मुंबई : अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या तपासाची माहिती प्रतिज्ञापत्र करून सादर करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.याचा तपास सीबीआयकडे सोपवावा, यासाठी केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत सरकारतर्फे तपासाची माहिती तोंडी देण्यात आली. मात्र त्याच्या योग्यतेविषयी अर्जदाराच्या वकिलानेशंका उपस्थित केल्यावर सरकारला प्रतिज्ञापत्रावर माहिती देण्यास सांगण्यात आले.गेल्यावर्षी झालेल्या या हत्याकांडाने महाराष्ट्र सुन्न झाला होता. विविध संघटनांनी यातील आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन केले़ त्याचवेळी याचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी प्रोफेसर अनंत कदम, दीपक वाघमारे, प्रतीक कांबळे, सागर झेंडे व सुनील पवार यांनी याचिकेद्वारे केली होती़न्या़ व्ही़ एम़ कानडे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली़ त्यात याचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले असून, यातील आरोपीला पकडल्याचे शासनाने न्यायालयात सांगितले़ एखाद्या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी राज्याबाहेरील पोलिसांचे पथक नेमायला हवे़ या हत्याकांडाच्या तपासासाठी येथील पोलिसांचेच विशेष पथक नेमले़ त्यामुळे पारदर्शक तपास झाला असावा का, यावर प्रश्नचिन्हच आहे़ तसेच यातील आरोपी पकडणाऱ्या पोलिसांची नार्को टेस्ट झाली पाहिजे़ कारण याद्वारे या पोलिसांनी खरे आरोपी पकडले की नाही हे सिद्ध होईल, असा युक्तिवाद अ‍ॅड़ गुणरत्न यांनी केला़ उभय पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने वरील आदेश देऊन ही सुनावणी तहकूब केली़ (प्रतिनिधी)