शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

जवखेडा हत्याकांड तपासाचे हायकोर्टास हवे प्रतिज्ञापत्र

By admin | Updated: February 3, 2015 01:30 IST

अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या तपासाची माहिती प्रतिज्ञापत्र करून सादर करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

मुंबई : अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या तपासाची माहिती प्रतिज्ञापत्र करून सादर करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.याचा तपास सीबीआयकडे सोपवावा, यासाठी केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत सरकारतर्फे तपासाची माहिती तोंडी देण्यात आली. मात्र त्याच्या योग्यतेविषयी अर्जदाराच्या वकिलानेशंका उपस्थित केल्यावर सरकारला प्रतिज्ञापत्रावर माहिती देण्यास सांगण्यात आले.गेल्यावर्षी झालेल्या या हत्याकांडाने महाराष्ट्र सुन्न झाला होता. विविध संघटनांनी यातील आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन केले़ त्याचवेळी याचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी प्रोफेसर अनंत कदम, दीपक वाघमारे, प्रतीक कांबळे, सागर झेंडे व सुनील पवार यांनी याचिकेद्वारे केली होती़न्या़ व्ही़ एम़ कानडे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली़ त्यात याचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले असून, यातील आरोपीला पकडल्याचे शासनाने न्यायालयात सांगितले़ एखाद्या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी राज्याबाहेरील पोलिसांचे पथक नेमायला हवे़ या हत्याकांडाच्या तपासासाठी येथील पोलिसांचेच विशेष पथक नेमले़ त्यामुळे पारदर्शक तपास झाला असावा का, यावर प्रश्नचिन्हच आहे़ तसेच यातील आरोपी पकडणाऱ्या पोलिसांची नार्को टेस्ट झाली पाहिजे़ कारण याद्वारे या पोलिसांनी खरे आरोपी पकडले की नाही हे सिद्ध होईल, असा युक्तिवाद अ‍ॅड़ गुणरत्न यांनी केला़ उभय पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने वरील आदेश देऊन ही सुनावणी तहकूब केली़ (प्रतिनिधी)