शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
2
कीपॅड मोबाईल, ओटीपी नाही, युपीआय नाही, तरीही पैसे गायब; गिरणी कामगाराचे ७ लाख सायबर चोरट्याकडून लंपास
3
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
4
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
5
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
6
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
7
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
8
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
9
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
10
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
11
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
12
लग्नाच्या दिवशी वधूचा अपघात, डॉक्टरांच्या साक्षीने हॉस्पिटलमध्येच नवरदेवाने बांधली लग्नगाठ  
13
IND vs SA : 'आत्मनिर्भर' बुमराह! मार्करमला बोल्ड केल्यावर KL राहुलसोबतचं सेलिब्रेशन ठरलं खास (VIDEO)
14
हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
15
'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
16
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
17
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
18
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
19
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालय ‘सुप्रीम’ निर्णयावर ठाम

By admin | Updated: July 2, 2015 01:08 IST

सुप्रीम कोर्टाने दहीहंडीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता त्यात बदल होणार नाहीत. त्यामुळे खंडपीठाने आज पुनर्विचार अर्जही फेटाळला.

मुंबई : सुप्रीम कोर्टाने दहीहंडीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता त्यात बदल होणार नाहीत. त्यामुळे खंडपीठाने आज पुनर्विचार अर्जही फेटाळला. उच्च न्यायालयाने गेल्यावर्षी गोविंदावर निर्बंध आणले. याची उंची २० फुटांची असावी व १८ वर्षांखालील मुलांना यात सहभागी करू नये, तसेच या उत्सावात सुरक्षेचे उपाय करावेत, असे आदेश ११ आॅगस्ट २०१४ रोजी न्या. व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठाने दिले. त्यावेळी काही मंडळांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती मिळवली. परिणामी गेल्यावर्षीच्या उत्सवात उंच थरही लागले व १८ वर्षांखालील मुलेदेखील सहभागी झाली.त्यानंतर मंडळांच्या विशेष याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले. दरम्यानच्या काळात शासनानेही उच्च न्यायालयातच स्वतंत्र अर्ज करून न्या. कानडे यांच्या आदेशांचा फेरविचार व्हावा, अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयानेच शिक्कामोर्तब केल्याने शासनाने हा अर्ज मागे घेतला.तरीही उच्च न्यायालयाच्या आदेशात काही बदल केले जावेत, अशी मागणी करणारा अर्ज मालाड येथील ग्यानमुर्ती रामचंद्र शर्मा यांनी केला होता. गोविंदाची उंची वाढवून १४ वर्षांवरील मुलांच्या सहभागास परवानगी द्यावी, अशी मागणीही या अर्जात करण्यात आली होती.न्या. पी. व्ही. हरदास व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. तसेच या आदेशांचा पुनर्विचार व्हावा, यासाठी केलेला अर्जही शासनाने मागे घेतला आहे. त्यामुळे आता हा अर्ज ग्राह्य धरणे योग्य ठरणार नाही, असा युक्तिवाद सरकारी वकील मानकुंवर देशमुख यांनी केला. तो ग्राह्य धरीत न्यायालयाने हा अर्ज फेटाळला.दहीहंडीबाबतचा अर्ज काय ? सुरक्षेसाठी न्यायालयाने सुचवलेले उपाय स्वागतार्ह आहेत. पण उंची कमी केल्याने या उत्सावात जिवंतपणा राहणार नाही. तेव्हा किमान याची उंची ३५ फूट करावी, जेणेकरून किमान सात थर तरी लागतील. सर्कस व साहसी क्रीडा प्रकारात अल्पवयीन मुले सहभागी होतात. असे असताना व सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेतली जात असताना दहीहंडीत १८ वर्षांखालील मुलांना या उत्सवासाठी निर्बंध घालणे व्यवहार्य नाही, असे शर्मा यांचे म्हणणे होते.