शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
4
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
5
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
6
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
7
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
8
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
9
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
10
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
11
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
12
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
13
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
14
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
15
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
16
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
17
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
18
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
19
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

उच्च न्यायालय ‘सुप्रीम’ निर्णयावर ठाम

By admin | Updated: July 2, 2015 01:08 IST

सुप्रीम कोर्टाने दहीहंडीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता त्यात बदल होणार नाहीत. त्यामुळे खंडपीठाने आज पुनर्विचार अर्जही फेटाळला.

मुंबई : सुप्रीम कोर्टाने दहीहंडीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता त्यात बदल होणार नाहीत. त्यामुळे खंडपीठाने आज पुनर्विचार अर्जही फेटाळला. उच्च न्यायालयाने गेल्यावर्षी गोविंदावर निर्बंध आणले. याची उंची २० फुटांची असावी व १८ वर्षांखालील मुलांना यात सहभागी करू नये, तसेच या उत्सावात सुरक्षेचे उपाय करावेत, असे आदेश ११ आॅगस्ट २०१४ रोजी न्या. व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठाने दिले. त्यावेळी काही मंडळांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती मिळवली. परिणामी गेल्यावर्षीच्या उत्सवात उंच थरही लागले व १८ वर्षांखालील मुलेदेखील सहभागी झाली.त्यानंतर मंडळांच्या विशेष याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले. दरम्यानच्या काळात शासनानेही उच्च न्यायालयातच स्वतंत्र अर्ज करून न्या. कानडे यांच्या आदेशांचा फेरविचार व्हावा, अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयानेच शिक्कामोर्तब केल्याने शासनाने हा अर्ज मागे घेतला.तरीही उच्च न्यायालयाच्या आदेशात काही बदल केले जावेत, अशी मागणी करणारा अर्ज मालाड येथील ग्यानमुर्ती रामचंद्र शर्मा यांनी केला होता. गोविंदाची उंची वाढवून १४ वर्षांवरील मुलांच्या सहभागास परवानगी द्यावी, अशी मागणीही या अर्जात करण्यात आली होती.न्या. पी. व्ही. हरदास व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. तसेच या आदेशांचा पुनर्विचार व्हावा, यासाठी केलेला अर्जही शासनाने मागे घेतला आहे. त्यामुळे आता हा अर्ज ग्राह्य धरणे योग्य ठरणार नाही, असा युक्तिवाद सरकारी वकील मानकुंवर देशमुख यांनी केला. तो ग्राह्य धरीत न्यायालयाने हा अर्ज फेटाळला.दहीहंडीबाबतचा अर्ज काय ? सुरक्षेसाठी न्यायालयाने सुचवलेले उपाय स्वागतार्ह आहेत. पण उंची कमी केल्याने या उत्सावात जिवंतपणा राहणार नाही. तेव्हा किमान याची उंची ३५ फूट करावी, जेणेकरून किमान सात थर तरी लागतील. सर्कस व साहसी क्रीडा प्रकारात अल्पवयीन मुले सहभागी होतात. असे असताना व सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेतली जात असताना दहीहंडीत १८ वर्षांखालील मुलांना या उत्सवासाठी निर्बंध घालणे व्यवहार्य नाही, असे शर्मा यांचे म्हणणे होते.