शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

रेल्वे प्रशासनाला हायकोर्टाची चपराक

By admin | Updated: April 10, 2016 02:18 IST

एखाद्या कर्मचाऱ्याने प्रशासनाची संमती न घेता दुसरा विवाह केल्यास अशा दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या अपत्यांना अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अपात्र ठरविणारा निर्णय सहा वर्षांपूर्वी

मुंबई : एखाद्या कर्मचाऱ्याने प्रशासनाची संमती न घेता दुसरा विवाह केल्यास अशा दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या अपत्यांना अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अपात्र ठरविणारा निर्णय सहा वर्षांपूर्वी कोलकाता उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द करूनही त्याच नियमास चिकटून बसण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या अप्राणिकपणास मुंबई उच्च न्यायालयाने चपराक दिली आहे.रेल्वेत नोकरी करणाऱ्या रामलखन त्रिपाठी या कामगाराचा २८ नोव्हेंबर २००९रोजी मृत्यू झाला. रामलखन यास दुसऱ्या पत्नीपासून झालेला मुलगा विवेक याने अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला. रेल्वेने त्यास नकार दिला म्हणून विवेक केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (कॅट) गेला. रेल्वेने विवेकच्या अर्जावर विचार करावा, असा आदेश ‘कॅट’ने दिला. यालाही रेल्वेने रिट याचिका करून आव्हान दिले. मुख्य न्यायाधीश न्या. डी.एच वाघेला व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने ती फेटाळली व विवेकच्या अर्जावर रेल्वेने तीन महिन्यांत निर्णय घ्यावा, असा आदेश दिला. ‘कॅट’च्या आदेशास रेल्वेने तीन मुद्द्यांवर आक्षेप घेतला होता. एक, वर उल्लेख केलेले रेल्वेचे जानेवारी १९९२ मधील परिपत्रक. दोन, दुसऱ्या पत्नीचा मुलगा असल्याने विवेकचे अनौरत्व आणि तीन, पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह करण्याचे रामलखन यांचे बेशिस्त वर्तन.न्यायालयाने म्हटले की, कोलकाता उच्च न्यायालयाने एप्रिल २०१२ मध्ये परिपत्रक रद्द केले. त्याविरुद्ध रेल्वे सर्वोच्च न्यायालयात गेली नाही. एवढेच नव्हे तर त्या प्रकरणातील दुसऱ्या पत्नीच्या मुलाला रेल्वेने नोकरीही दिली. त्यामुळे आता पुन्हा रेल्वे त्याच परिपत्रकाचा आधार घेऊ शकत नाही. हिंदू विवाह कायद्यानुसार दुसरा विवाह अवैध असला तरी दुसऱ्या पत्नीपासून होणारी अपत्ये अनौरस ठरत नाहीत. तिसरे असे की, दुसरा विवाह केल्याबद्दल रेल्वेने रामलखन यांच्याविरुद्ध सेवेत असताना कधीही शिस्तभंगाची कारवाई केली नाही. (विशेष प्रतिनिधी)दोन्ही पत्नींची सहमतीरामलखन यांचा आधी कुसुम यांच्याशी विवाह झाला. तिच्यापासून अपत्य झाले नाही. नंतर कुसुमच्याच आग्रहाखातर रामलखनने कांचन यांच्याशी दुसरा विवाह केला. कांचन यांच्यापासून त्यांना विवेक आणि अभिषेक हे दोन मुलगे आहेत. दोन्ही पत्नी व दोन्ही मुले एकत्र राहतात. कुसुम व कांचन या दोघींनी आपसात सहमतीनेच अनुकंपा नोकरीसाठी विवेकने अर्ज करावा, असे ठरविले होते. एवढेच नव्हे तर रामलखन यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पेन्शन व अन्य निवृत्तीलाभ रेल्वेने कुसुम व कांचन यांचा वाटून दिले होते. तसे करण्याआधी एस. एम. बोरकर या वरिष्ठ अधिकाऱ्याने अनूकूल अहवाल दिला होता.