शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

रेल्वे प्रशासनाला हायकोर्टाची चपराक

By admin | Updated: April 10, 2016 02:18 IST

एखाद्या कर्मचाऱ्याने प्रशासनाची संमती न घेता दुसरा विवाह केल्यास अशा दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या अपत्यांना अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अपात्र ठरविणारा निर्णय सहा वर्षांपूर्वी

मुंबई : एखाद्या कर्मचाऱ्याने प्रशासनाची संमती न घेता दुसरा विवाह केल्यास अशा दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या अपत्यांना अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अपात्र ठरविणारा निर्णय सहा वर्षांपूर्वी कोलकाता उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द करूनही त्याच नियमास चिकटून बसण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या अप्राणिकपणास मुंबई उच्च न्यायालयाने चपराक दिली आहे.रेल्वेत नोकरी करणाऱ्या रामलखन त्रिपाठी या कामगाराचा २८ नोव्हेंबर २००९रोजी मृत्यू झाला. रामलखन यास दुसऱ्या पत्नीपासून झालेला मुलगा विवेक याने अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला. रेल्वेने त्यास नकार दिला म्हणून विवेक केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (कॅट) गेला. रेल्वेने विवेकच्या अर्जावर विचार करावा, असा आदेश ‘कॅट’ने दिला. यालाही रेल्वेने रिट याचिका करून आव्हान दिले. मुख्य न्यायाधीश न्या. डी.एच वाघेला व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने ती फेटाळली व विवेकच्या अर्जावर रेल्वेने तीन महिन्यांत निर्णय घ्यावा, असा आदेश दिला. ‘कॅट’च्या आदेशास रेल्वेने तीन मुद्द्यांवर आक्षेप घेतला होता. एक, वर उल्लेख केलेले रेल्वेचे जानेवारी १९९२ मधील परिपत्रक. दोन, दुसऱ्या पत्नीचा मुलगा असल्याने विवेकचे अनौरत्व आणि तीन, पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह करण्याचे रामलखन यांचे बेशिस्त वर्तन.न्यायालयाने म्हटले की, कोलकाता उच्च न्यायालयाने एप्रिल २०१२ मध्ये परिपत्रक रद्द केले. त्याविरुद्ध रेल्वे सर्वोच्च न्यायालयात गेली नाही. एवढेच नव्हे तर त्या प्रकरणातील दुसऱ्या पत्नीच्या मुलाला रेल्वेने नोकरीही दिली. त्यामुळे आता पुन्हा रेल्वे त्याच परिपत्रकाचा आधार घेऊ शकत नाही. हिंदू विवाह कायद्यानुसार दुसरा विवाह अवैध असला तरी दुसऱ्या पत्नीपासून होणारी अपत्ये अनौरस ठरत नाहीत. तिसरे असे की, दुसरा विवाह केल्याबद्दल रेल्वेने रामलखन यांच्याविरुद्ध सेवेत असताना कधीही शिस्तभंगाची कारवाई केली नाही. (विशेष प्रतिनिधी)दोन्ही पत्नींची सहमतीरामलखन यांचा आधी कुसुम यांच्याशी विवाह झाला. तिच्यापासून अपत्य झाले नाही. नंतर कुसुमच्याच आग्रहाखातर रामलखनने कांचन यांच्याशी दुसरा विवाह केला. कांचन यांच्यापासून त्यांना विवेक आणि अभिषेक हे दोन मुलगे आहेत. दोन्ही पत्नी व दोन्ही मुले एकत्र राहतात. कुसुम व कांचन या दोघींनी आपसात सहमतीनेच अनुकंपा नोकरीसाठी विवेकने अर्ज करावा, असे ठरविले होते. एवढेच नव्हे तर रामलखन यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पेन्शन व अन्य निवृत्तीलाभ रेल्वेने कुसुम व कांचन यांचा वाटून दिले होते. तसे करण्याआधी एस. एम. बोरकर या वरिष्ठ अधिकाऱ्याने अनूकूल अहवाल दिला होता.