शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

संरक्षक भिंत तोडण्यास हायकोर्टाची स्थगिती

By admin | Updated: August 21, 2016 02:11 IST

कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडभोवती असलेली संरक्षक भिंत तोडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी दिला होता. मात्र शुक्रवारी उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती

मुंबई : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडभोवती असलेली संरक्षक भिंत तोडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी दिला होता. मात्र शुक्रवारी उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिल्यामुळे महापालिकेला दिलासा मिळाला आहे.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर पुन्हा एकदा विचार करावा, यासाठी महापालिकेने उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने जून २०१६मध्ये दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली.२०१३मध्ये केंद्रीय पर्यावरण व वन विभागाने महापालिकेला कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडभोवती घातलेली संरक्षक भिंत पाडण्याचा आदेश दिला. केंद्र सरकारच्या आदेशाला महापालिकेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र उच्च न्यायालयानेही महापालिकेने बेकायदेशीररीत्या संरक्षक भिंत उभारल्याचे निरीक्षण नोंदवत भिंत पाडण्याचा आदेश महापालिकेला दिला. त्याविरुद्ध महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेला उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मुभा दिली. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडची ५२ हेक्टर जागा सीआरझेडमध्ये मोडते. संरक्षक भिंत पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणी उभारल्याने या ठिकाणील खारफुटी नष्ट झाली आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने आदेश देताना नोंदवले होते. सीआरझेडमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई असतानाही महापालिकेने कायद्याचे उल्लंघन केले. मात्र महापालिकेने या भागात अतिक्रमण होऊ नये, यासाठी संरक्षक भिंत घातल्याचे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाला दिले. मात्र उच्च न्यायालयाने महापालिकेने उभारलेली संरक्षक भिंत बेकायदेशीर असून, तीन महिन्यांत पाडण्याचा आदेश जून २०१६मध्ये दिला होता. (प्रतिनिधी)नियम काय आहे...- केंद्र सरकारने महापालिकेला कचऱ्याचे विघटन करण्यासाठी आणि डम्पिंग ग्राउंडमध्ये वाहने जाण्याकरिता रस्ता उपलब्ध करण्यासाठी ६५ हेक्टर जागा वापरण्याची परवानगी दिली होती. मात्र महापालिकेने संपूर्ण डम्पिंग ग्राउंडभोवती संरक्षक भिंत उभारली.