शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

संरक्षक भिंत तोडण्यास हायकोर्टाची स्थगिती

By admin | Updated: August 21, 2016 02:11 IST

कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडभोवती असलेली संरक्षक भिंत तोडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी दिला होता. मात्र शुक्रवारी उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती

मुंबई : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडभोवती असलेली संरक्षक भिंत तोडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी दिला होता. मात्र शुक्रवारी उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिल्यामुळे महापालिकेला दिलासा मिळाला आहे.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर पुन्हा एकदा विचार करावा, यासाठी महापालिकेने उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने जून २०१६मध्ये दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली.२०१३मध्ये केंद्रीय पर्यावरण व वन विभागाने महापालिकेला कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडभोवती घातलेली संरक्षक भिंत पाडण्याचा आदेश दिला. केंद्र सरकारच्या आदेशाला महापालिकेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र उच्च न्यायालयानेही महापालिकेने बेकायदेशीररीत्या संरक्षक भिंत उभारल्याचे निरीक्षण नोंदवत भिंत पाडण्याचा आदेश महापालिकेला दिला. त्याविरुद्ध महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेला उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मुभा दिली. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडची ५२ हेक्टर जागा सीआरझेडमध्ये मोडते. संरक्षक भिंत पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणी उभारल्याने या ठिकाणील खारफुटी नष्ट झाली आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने आदेश देताना नोंदवले होते. सीआरझेडमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई असतानाही महापालिकेने कायद्याचे उल्लंघन केले. मात्र महापालिकेने या भागात अतिक्रमण होऊ नये, यासाठी संरक्षक भिंत घातल्याचे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाला दिले. मात्र उच्च न्यायालयाने महापालिकेने उभारलेली संरक्षक भिंत बेकायदेशीर असून, तीन महिन्यांत पाडण्याचा आदेश जून २०१६मध्ये दिला होता. (प्रतिनिधी)नियम काय आहे...- केंद्र सरकारने महापालिकेला कचऱ्याचे विघटन करण्यासाठी आणि डम्पिंग ग्राउंडमध्ये वाहने जाण्याकरिता रस्ता उपलब्ध करण्यासाठी ६५ हेक्टर जागा वापरण्याची परवानगी दिली होती. मात्र महापालिकेने संपूर्ण डम्पिंग ग्राउंडभोवती संरक्षक भिंत उभारली.