शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाने ठोठावली १९ तरुणांना स्वच्छतेची शिक्षा

By admin | Updated: February 24, 2016 02:01 IST

आपापसांत मारामारी करून पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्यासाठी आलेल्या मीरा- भार्इंदरच्या १९ तरुणांना उच्च न्यायालयाने अजब शिक्षा ठोठावली. उच्च न्यायालयाने एका गटाला

मुंबई : आपापसांत मारामारी करून पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्यासाठी आलेल्या मीरा- भार्इंदरच्या १९ तरुणांना उच्च न्यायालयाने अजब शिक्षा ठोठावली. उच्च न्यायालयाने एका गटाला तीन महिने दर रविवारी मीरारोड रेल्वे स्टेशन स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावली, तर दुसऱ्या गटाला तीन महिने दर रविवारी महापालिकेच्या दोन शाळा स्वच्छ करण्यास सांगितले. यावर स्टेशन मास्तर व मुख्याध्यापकांना लक्ष ठेवण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने मंगळवारी दिली.४ जानेवारी रोजी गोराई बीचजवळील फॉन्सेका रिसॉर्टवर मजा करायला गेलेल्या दोन गटांमध्ये ५ जानेवारी रोजी हाणामारी झाली. तक्रारदार अस्लीम अब्रोजच्या एका मित्राला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आशीष धावणे व त्याच्या मित्रांनी मारल्याने अब्रोजच्या मित्रांनी धावणे व त्याच्या मित्रांना मारण्यास सुरुवात केली. या प्रकाराबद्दल अस्लीम अब्रोजने आशीष धावणे व त्याच्या नऊ मित्रांविरुद्ध गोराई पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला, तर आशीष धावणेसह दहाजणांविरुद्ध गुन्हा नोंदवला.ही सर्वच मुले २०- २५ वर्षे वयोगटातील असल्याने त्यांच्या पालकांनी मध्यस्थी करून हे प्रकरण चर्चेद्वारे मिटवले. त्यामुळे या सर्वांनी एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे होती.एफआयआर असाच रद्द करण्यात येणार नाही. या सर्वांना काहीतरी समाजसेवा करावी लागेल, असे म्हणत खंडपीठाने अंब्रोज व त्याच्या मित्रांना तीन महिने दर रविवारी मीरारोड रेल्वे स्टेशन साफ करण्याची शिक्षा दिली. त्यावर स्टेशन मास्तरांना लक्ष ठेवण्यास सांगितले, तर धावणे व त्यांच्या मित्रांना महापालिकेच्या दोन शाळा तीन महिने दर रविवारी साफ करण्याची शिक्षा ठोठावली. त्यांच्या कामावर शाळेच्या मुख्याध्यापकांना लक्ष ठेवण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. (प्रतिनिधी)