शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

उच्च न्यायालयाने ठोठावली १९ तरुणांना स्वच्छतेची शिक्षा

By admin | Updated: February 24, 2016 02:01 IST

आपापसांत मारामारी करून पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्यासाठी आलेल्या मीरा- भार्इंदरच्या १९ तरुणांना उच्च न्यायालयाने अजब शिक्षा ठोठावली. उच्च न्यायालयाने एका गटाला

मुंबई : आपापसांत मारामारी करून पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्यासाठी आलेल्या मीरा- भार्इंदरच्या १९ तरुणांना उच्च न्यायालयाने अजब शिक्षा ठोठावली. उच्च न्यायालयाने एका गटाला तीन महिने दर रविवारी मीरारोड रेल्वे स्टेशन स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावली, तर दुसऱ्या गटाला तीन महिने दर रविवारी महापालिकेच्या दोन शाळा स्वच्छ करण्यास सांगितले. यावर स्टेशन मास्तर व मुख्याध्यापकांना लक्ष ठेवण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने मंगळवारी दिली.४ जानेवारी रोजी गोराई बीचजवळील फॉन्सेका रिसॉर्टवर मजा करायला गेलेल्या दोन गटांमध्ये ५ जानेवारी रोजी हाणामारी झाली. तक्रारदार अस्लीम अब्रोजच्या एका मित्राला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आशीष धावणे व त्याच्या मित्रांनी मारल्याने अब्रोजच्या मित्रांनी धावणे व त्याच्या मित्रांना मारण्यास सुरुवात केली. या प्रकाराबद्दल अस्लीम अब्रोजने आशीष धावणे व त्याच्या नऊ मित्रांविरुद्ध गोराई पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला, तर आशीष धावणेसह दहाजणांविरुद्ध गुन्हा नोंदवला.ही सर्वच मुले २०- २५ वर्षे वयोगटातील असल्याने त्यांच्या पालकांनी मध्यस्थी करून हे प्रकरण चर्चेद्वारे मिटवले. त्यामुळे या सर्वांनी एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे होती.एफआयआर असाच रद्द करण्यात येणार नाही. या सर्वांना काहीतरी समाजसेवा करावी लागेल, असे म्हणत खंडपीठाने अंब्रोज व त्याच्या मित्रांना तीन महिने दर रविवारी मीरारोड रेल्वे स्टेशन साफ करण्याची शिक्षा दिली. त्यावर स्टेशन मास्तरांना लक्ष ठेवण्यास सांगितले, तर धावणे व त्यांच्या मित्रांना महापालिकेच्या दोन शाळा तीन महिने दर रविवारी साफ करण्याची शिक्षा ठोठावली. त्यांच्या कामावर शाळेच्या मुख्याध्यापकांना लक्ष ठेवण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. (प्रतिनिधी)