शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

प्रसारमाध्यमांचे ध्रुवीकरण झाले आहे, हायकोर्टाने सुनावले : पूर्वी पत्रकार तटस्थ होते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 07:07 IST

मुंबई : प्रसारमाध्यमांचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झाले आहे. यापूर्वी पत्रकार तटस्थ आणि जबाबदार होते, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी ...

मुंबई : प्रसारमाध्यमांचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झाले आहे. यापूर्वी पत्रकार तटस्थ आणि जबाबदार होते, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरील सुनावणी घेताना केली. 

‘नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न नाही. मर्यादा कुठे पाळायच्या, हे लोक विसरून गेले आहेत. तुम्हाला सरकारवर टीका करायची आहे, करा ! पण, येथे आरोप असा आहे की, एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही तपासात हस्तक्षेप करत आहात,’ असेही न्यायालयाने म्हटले.

सुशांतसिंहप्रकरणी ‘मीडिया ट्रायल’ होऊ नये व तपास सुरू असताना माध्यमांनी त्यात हस्तक्षेप करू नये, यासाठी उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल आहेत. त्यावरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. सुनावणीत ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीची बाजू ऐकताना न्यायालयाने वरील टिप्पणी केली. 

‘या देशात कायद्याचे राज्य आहे, बरोबर? मग इतरांना दोष देत फिरणारी व्यक्ती माध्यमांच्या स्वातंत्र्याचा आश्रय घेतेच कशी?’ असा सवाल न्यायालयाने केला. न्यायालयाने या याचिकांवरील पुढील सुनावणी २९ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आणखी एकाला अटक टीआरपी घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी पवईतून हरीश पाटील नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. घोटाळ्यातील पाहिजे असलेल्या आरोपीला पळविण्यासाठी मदत केली म्हणून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. टीआरपी घोटाळा प्रकरणातील ही नववी अटक आहे.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMediaमाध्यमेMumbaiमुंबई