शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

प्रसारमाध्यमांचे ध्रुवीकरण झाले आहे, हायकोर्टाने सुनावले : पूर्वी पत्रकार तटस्थ होते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 07:07 IST

मुंबई : प्रसारमाध्यमांचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झाले आहे. यापूर्वी पत्रकार तटस्थ आणि जबाबदार होते, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी ...

मुंबई : प्रसारमाध्यमांचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झाले आहे. यापूर्वी पत्रकार तटस्थ आणि जबाबदार होते, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरील सुनावणी घेताना केली. 

‘नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न नाही. मर्यादा कुठे पाळायच्या, हे लोक विसरून गेले आहेत. तुम्हाला सरकारवर टीका करायची आहे, करा ! पण, येथे आरोप असा आहे की, एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही तपासात हस्तक्षेप करत आहात,’ असेही न्यायालयाने म्हटले.

सुशांतसिंहप्रकरणी ‘मीडिया ट्रायल’ होऊ नये व तपास सुरू असताना माध्यमांनी त्यात हस्तक्षेप करू नये, यासाठी उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल आहेत. त्यावरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. सुनावणीत ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीची बाजू ऐकताना न्यायालयाने वरील टिप्पणी केली. 

‘या देशात कायद्याचे राज्य आहे, बरोबर? मग इतरांना दोष देत फिरणारी व्यक्ती माध्यमांच्या स्वातंत्र्याचा आश्रय घेतेच कशी?’ असा सवाल न्यायालयाने केला. न्यायालयाने या याचिकांवरील पुढील सुनावणी २९ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आणखी एकाला अटक टीआरपी घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी पवईतून हरीश पाटील नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. घोटाळ्यातील पाहिजे असलेल्या आरोपीला पळविण्यासाठी मदत केली म्हणून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. टीआरपी घोटाळा प्रकरणातील ही नववी अटक आहे.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMediaमाध्यमेMumbaiमुंबई