शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

प्रसारमाध्यमांचे ध्रुवीकरण झाले आहे, हायकोर्टाने सुनावले : पूर्वी पत्रकार तटस्थ होते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 07:07 IST

मुंबई : प्रसारमाध्यमांचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झाले आहे. यापूर्वी पत्रकार तटस्थ आणि जबाबदार होते, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी ...

मुंबई : प्रसारमाध्यमांचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झाले आहे. यापूर्वी पत्रकार तटस्थ आणि जबाबदार होते, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरील सुनावणी घेताना केली. 

‘नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न नाही. मर्यादा कुठे पाळायच्या, हे लोक विसरून गेले आहेत. तुम्हाला सरकारवर टीका करायची आहे, करा ! पण, येथे आरोप असा आहे की, एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही तपासात हस्तक्षेप करत आहात,’ असेही न्यायालयाने म्हटले.

सुशांतसिंहप्रकरणी ‘मीडिया ट्रायल’ होऊ नये व तपास सुरू असताना माध्यमांनी त्यात हस्तक्षेप करू नये, यासाठी उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल आहेत. त्यावरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. सुनावणीत ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीची बाजू ऐकताना न्यायालयाने वरील टिप्पणी केली. 

‘या देशात कायद्याचे राज्य आहे, बरोबर? मग इतरांना दोष देत फिरणारी व्यक्ती माध्यमांच्या स्वातंत्र्याचा आश्रय घेतेच कशी?’ असा सवाल न्यायालयाने केला. न्यायालयाने या याचिकांवरील पुढील सुनावणी २९ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आणखी एकाला अटक टीआरपी घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी पवईतून हरीश पाटील नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. घोटाळ्यातील पाहिजे असलेल्या आरोपीला पळविण्यासाठी मदत केली म्हणून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. टीआरपी घोटाळा प्रकरणातील ही नववी अटक आहे.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMediaमाध्यमेMumbaiमुंबई