शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

खटला अन्यत्र चालविण्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2016 00:44 IST

पानसरे हत्या प्रकरण : जिल्हा व सत्र न्यायालयातील खटल्याची सुनावणी २२ जानेवारीपर्यंत लांबणीवर

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित समीर विष्णू गायकवाड याच्यावरील खटला कोल्हापुरात चालवायचा की अन्यत्र याबाबतच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज, गुरुवारी सुनावणी होणार असल्याने बुधवारी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी खटल्याची सुनावणी २२ जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर खटल्याच्या सुनावणीसाठी समीर गायकवाडला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले. न्यायाधीश बिले यांनी समीरला विचारले, तुझ्या बाजूने वकील पटवर्धन यांनी वकीलपत्र दाखल केले आहे. तुला काही सांगायचे आहे काय? त्यावर त्याने मला काही सांगायचे नाही, असे उत्तर दिले. जिल्हा व सत्र न्यायाधीश बेले यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील खटल्याची पूर्तता करता येईल यासाठी २२ जानेवारीस पुढील सुनावणी ठेवल्याचे त्याला सांगितले. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी १४ डिसेंबर २०१५ रोजी आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात समीर गायकवाडवर दोषारोपपत्र दाखल झाले. त्यानंतर न्यायाधिश आर. डी. डांगे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समीरशी संवाद साधला. यावेळी तुझ्याविरोधात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. ते ३९२ पानांचे असल्याने हा खटला या न्यायालयात चालू शकत नाही. त्यामुळे हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करत असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायाधिश डांगे यांनी सत्र न्यायालयाकडे हा खटला वर्ग केला. जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्याच्या सुनावणीसाठी पोलीस समीरला हजर करण्याची दाट शक्यता होती; परंतु याही सुनावणीस त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बिले यांनी समीरला विचारले, तुझ्या बाजूने एस. व्ही. पटवर्धन यांनी वकीलपत्र दाखल केले आहे. तुला काही सांगायचे आहे काय? त्यावर त्याने मला काही सांगायचे नाही, असे उत्तर दिले. त्यानंतर न्यायाधीशांनी समीरला तुझ्या विरोधातील खटला कोल्हापूर, सांगली व सातारा येथील न्यायालये वगळून अन्यत्र चालवावा, अशी याचिका तुझ्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. त्या अर्जाची चौकशी लवकरात लवकर करून घे, त्याचा निर्णय आम्हाला कळू दे, असेही सांगितले. दरम्यान, समीरच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होत आहे. यावेळी पानसरे कुटुंबीयातर्फे उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील अभय नेवगी तर शासनातर्फे अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या हे आपली बाजू मांडणार आहेत. सुनावणीस सहाय्यक सरकारी वकील चंद्रकांत बुधले, अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, समीरचे वकील अ‍ॅड. एस. व्ही. पटवर्धन, अ‍ॅड. एम. एम. सुवासे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) समीरच्या जामिनासाठी अर्ज समीर गायकवाडला जामीन मिळावा, यासाठी अ‍ॅड. एस. व्ही. पटवर्धन यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यावर २२ तारखेला होणाऱ्या सुनावणीदरम्यान निर्णय घ्यावा, अशी विनंतीही करण्यात आली. पानसरे कुटुंबीयांचे प्रतिज्ञापत्र दरम्यान समीर गायकवाड याचा खटला अन्यत्र चालविण्याच्या याचिकेमध्ये आम्हालाही पक्षकार करून घ्यावे, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र पानसरे कुटुंबीयांच्यावतीने मेघा पानसरे यांनी ज्येष्ठ विधीज्ञ अभय नेवगी यांच्यामार्फत बुधवारी न्यायालयात दाखल केले. आजच्या सुनावणीसही त्या स्वत: हजर राहणार आहेत. मागणी केल्यास उत्तर देऊ सरकारी वकील बुधले यांनी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, लिगल हेड व क्रिमिनल बार असोसिएशन यांना गायकवाडच्या बाजूने वकीलपत्र दाखल करण्यास कोणी तयार आहात काय, अशी लेखी विचारणा केली. त्यावर त्यांनी समीरने आमच्याकडे कोणत्याही वकिलाची मागणी केलेली नाही. वकिलांची मागणी केल्यास आम्ही त्यावर उत्तर देऊ, असे सांगितले आहे. १५८ साक्षीदार पानसरे हत्याप्रकरणी ‘एसआयटी’ने केलेल्या तपासामध्ये १५८ साक्षीदारांचे जबाब घेतले आहेत. उच्च न्यायालयाने हा खटला कोल्हापूर सोडून अन्यत्र वर्ग केल्यास साक्षीदारांना त्याचा त्रास होणार आहे. उच्च न्यायालयाने कोल्हापुरातच हा खटला चालविण्याचे आदेश दिल्यास त्याची पुढील सुनावणी २२ जानेवारीला ठेवण्यात आली आहे.