शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
2
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
3
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
4
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
5
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
6
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
7
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
8
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
9
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
10
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
11
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
12
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
13
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
14
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
15
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
16
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
17
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
18
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
19
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
20
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा

आश्रमशाळांच्या दुरवस्थेबाबत उच्च न्यायालयाने खडसावले

By admin | Updated: June 13, 2017 01:15 IST

राज्यातील आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीबद्दल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फैलावर घेतले. आवश्यक सुविधांच्या अभावामुळे आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे मृत्यू होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीबद्दल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फैलावर घेतले. आवश्यक सुविधांच्या अभावामुळे आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे मृत्यू होत आहेत. गेल्या दशकात ७९३ विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले. त्यामुळे राज्य सरकारला याबाबत योग्य आदेश द्यावेत, यासाठी नाशिकच्या रवींद्र तळपे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यावरील सुनावणी आर. एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती. ‘थंड पाण्याने आंघोळ केल्याने, उंदीर- घुशींनी खाल्लेले अन्न मुलांना दिल्याने किंवा सर्प- विंचूदंशाने मुलांचा मृत्यू होत आहे, ही दयनीय अवस्था आहे. ती सुधारायला हवी. आश्रमशाळांसाठीचा प्रशासनाकडे पडून असलेला निधी या सुविधांसाठी खर्च व्हायला हवा,’ असे न्यायालयाने म्हटले. याचिकाकर्त्यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सचा (टिस) यासंदर्भातील अहवाल सादर केला. ‘अहवालात नमूद केलेल्या आश्रमशाळांतील कमतरता निदर्शनास आणून देण्याचे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविण्याचे निर्देश न्यायालयाने अ‍ॅड. वारुंजीकर यांना दिले. आश्रमशाळांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी गेल्या वर्षी मे महिन्यात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीबाबतही माहिती देण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.