शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

पुणे महापालिकेला उच्च न्यायालयाचा दणका

By admin | Updated: June 24, 2017 03:57 IST

नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्यास सक्षम नसलेल्या पुणे व ठाणे महापालिकेला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्यास सक्षम नसलेल्या पुणे व ठाणे महापालिकेला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. पुण्याच्या बाणेर व बालेवाडी परिसरात नव्या बांधकामांना तात्पुरती स्थगिती दिली आहे. ठाण्यातील घोडबंदर परिसरातील नव्या बांधकामांना दिलेल्या स्थगितीत वाढ केली आहे.न्यायालयाने या दोन्ही महापालिकांना या परिसरात सध्या किती नवी बांधकामे बांधण्यात येत आहेत, संबंधित बांधकामांसाठी घरगुती वापराचे पाणी वापरण्यात येते की बोअरवेलचे पाणी वापरण्यात येते, याबाबत तपशिलात माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. बाणेर व बालेवाडी परिसरातील नागरिकांना कोट्यवधी रुपये खर्च करून पाण्याचे टँकर खरेदी करावे लागतात. त्यामुळे महापालिकेला येथील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका अमोल बालवडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. ठाण्याच्या मंगेश शेलार यांनीही घोडबंदर परिसरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकांच्या सुनावणीत न्यायालयाने गुरुवारी दोन्ही महापालिकांना नागरिकांना पुरेसे पाणी पुरविण्यात येते की नाही, याबाबत विचारणा केली. त्यावर महापालिकांच्या वकिलाने पावसाळा असल्याने नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होईल, असे आश्वासन न्यायालयाला दिले. बाणेर व बालेवाडीची लोकसंख्या १ लाख १० हजार आहे. त्यानुसार, त्यांना १६५ लाख लीटर पाणी मिळणे आवश्यक आहे. मात्र, महापालिका केवळ ६० लाख लीटर पाणी पुरवत आहे, असे अ‍ॅड. अनुराग जैन यांनी न्यायालयाला सांगितले.‘आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद करणे अयोग्य आहे. महिन्यातून एकदा पाणीपुरवठा बंद करणे, आम्ही समजू शकतो,’ असे न्यायालयाने म्हटले. ‘आम्हाला सध्या किती नवी बांधकामे या परिसरात सुरू आहेत, याची आकडेवारी द्या, तसेच या बांधकामांसाठी बोअरवेल की घरगुती वापराचे पाणी वापरण्यात येते, तेही सांगा. तुम्ही (महापालिका) दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक पाणी विकासक वापरतो का, याचीही माहिती आम्हाला द्या,’ असे निर्देश देत, या दोन्ही याचिकांवरील सुनावणी एका आठवड्याने ठेवली आहे. ठाण्यातील घोडबंदर परिसरातील नव्या बांधकामांना दिलेल्या स्थगितीत वाढ केली आहे. ठाण्याच्या मंगेश शेलार यांनीही घोडबंदर परिसरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोन्ही याचिकांवरील सुनावणी एका आठवड्याने ठेवली आहे.अमोल बालवडकर यांच्यातर्फे अ‍ॅड. अनुराग जैन यांनी बाणेर व बालेवाडी परिसरातील नागरिकांना १०५ लाख लीटर पाण्याचा तुटवडा असल्याचे न्यायालयाला सांगितले. केंद्र सरकारच्या मागदर्शक तत्त्वानुसार दरडोई १५० लीटर पाणी देणे बंधनकारक आहे.