शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

पुणे महापालिकेला उच्च न्यायालयाचा दणका

By admin | Updated: June 24, 2017 03:57 IST

नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्यास सक्षम नसलेल्या पुणे व ठाणे महापालिकेला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्यास सक्षम नसलेल्या पुणे व ठाणे महापालिकेला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. पुण्याच्या बाणेर व बालेवाडी परिसरात नव्या बांधकामांना तात्पुरती स्थगिती दिली आहे. ठाण्यातील घोडबंदर परिसरातील नव्या बांधकामांना दिलेल्या स्थगितीत वाढ केली आहे.न्यायालयाने या दोन्ही महापालिकांना या परिसरात सध्या किती नवी बांधकामे बांधण्यात येत आहेत, संबंधित बांधकामांसाठी घरगुती वापराचे पाणी वापरण्यात येते की बोअरवेलचे पाणी वापरण्यात येते, याबाबत तपशिलात माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. बाणेर व बालेवाडी परिसरातील नागरिकांना कोट्यवधी रुपये खर्च करून पाण्याचे टँकर खरेदी करावे लागतात. त्यामुळे महापालिकेला येथील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका अमोल बालवडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. ठाण्याच्या मंगेश शेलार यांनीही घोडबंदर परिसरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकांच्या सुनावणीत न्यायालयाने गुरुवारी दोन्ही महापालिकांना नागरिकांना पुरेसे पाणी पुरविण्यात येते की नाही, याबाबत विचारणा केली. त्यावर महापालिकांच्या वकिलाने पावसाळा असल्याने नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होईल, असे आश्वासन न्यायालयाला दिले. बाणेर व बालेवाडीची लोकसंख्या १ लाख १० हजार आहे. त्यानुसार, त्यांना १६५ लाख लीटर पाणी मिळणे आवश्यक आहे. मात्र, महापालिका केवळ ६० लाख लीटर पाणी पुरवत आहे, असे अ‍ॅड. अनुराग जैन यांनी न्यायालयाला सांगितले.‘आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद करणे अयोग्य आहे. महिन्यातून एकदा पाणीपुरवठा बंद करणे, आम्ही समजू शकतो,’ असे न्यायालयाने म्हटले. ‘आम्हाला सध्या किती नवी बांधकामे या परिसरात सुरू आहेत, याची आकडेवारी द्या, तसेच या बांधकामांसाठी बोअरवेल की घरगुती वापराचे पाणी वापरण्यात येते, तेही सांगा. तुम्ही (महापालिका) दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक पाणी विकासक वापरतो का, याचीही माहिती आम्हाला द्या,’ असे निर्देश देत, या दोन्ही याचिकांवरील सुनावणी एका आठवड्याने ठेवली आहे. ठाण्यातील घोडबंदर परिसरातील नव्या बांधकामांना दिलेल्या स्थगितीत वाढ केली आहे. ठाण्याच्या मंगेश शेलार यांनीही घोडबंदर परिसरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोन्ही याचिकांवरील सुनावणी एका आठवड्याने ठेवली आहे.अमोल बालवडकर यांच्यातर्फे अ‍ॅड. अनुराग जैन यांनी बाणेर व बालेवाडी परिसरातील नागरिकांना १०५ लाख लीटर पाण्याचा तुटवडा असल्याचे न्यायालयाला सांगितले. केंद्र सरकारच्या मागदर्शक तत्त्वानुसार दरडोई १५० लीटर पाणी देणे बंधनकारक आहे.