शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अरे संसार संसार, नाथजोगींचं कुटूंब उघड्यावरं!

By admin | Updated: August 10, 2016 17:49 IST

वर्षातील आठ महिने रानोमाळ भटकंती करून उघड्या आकाशाखाली मिळेल, तिथं जमेल तसं रहायचं असं जीवन असलेल्या नाथजोगी समाजाची ही कथा

सुनील काकडे : वाशिम
वर्षातील आठ महिने रानोमाळ भटकंती करून उघड्या आकाशाखाली मिळेल, त्या जागेवर चार कोपºयाला खिळे ठोकायचे अन् त्यावर कापडी पाल बांधला की झाले घर तयार...चार घरी भिक्षा मागायची अन् आपली व मुलाबाळांच्या पोटाची खळगी भरायची...ऊन, वारा, पावसाची कुठलीच तमा न बाळगता अठराविश्व दारिद्रयात जीवन जगणाºया नाथजोगी समाजाची ही करून कहाणी आजच्या ‘हायटेक’ जमान्यातील सुखासाठी वाट्टेल ते करणाºयांसमोर एकप्रकारचे आव्हान उभे करणारी ठरत आहे.
शैक्षणिक, सामाजीक, आर्थिक अशा सर्वच पातळ्यांवर प्रचंड प्रमाणात माघारलेला घटक म्हणून ओळखल्या जाणारा तद्वतच सुख, सुविधांपासून कोसोदूर असल्याने सुखी संसाराची स्वप्न पाहण्याचाही अधिकार नसलेल्या महाराष्ट्रातील नाथजोगी समाजाची उत्तरोत्तर अधोगतीच होत आहे. आज इथे; तर उद्या तिथे भटकंती करून मिळणाºया भिक्षेवर आपला उदरनिर्वाह करणाºया या समाजातील अनेक कुटूंब आजही उघड्यावर वास्तव्य करित आहेत.
 

 
 
मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील परमेश्वर भोसले, प्रकाश भोसले आणि यशवंत भोसले या नाथपंथी डवरी गोसावी समाजातील तीघांचे कुटूंब आपल्या बायका-पोरांसह वाशिम रेल्वेस्थानकानजिकच्या उघड्या जागेवर पाल ठोकून वास्तव्य करित आहे. कधी पावसाने चूल विझते; तर कधी कडक उन्हाने अंग भाजून निघते. मात्र, या जुलमी जमान्यात वावरणाºया कुणालाही याची तमा नाही, असे शल्य परमेश्वर भोसले याने बोलून दाखविले. नाथजोगी समाजाकरिता शासनस्तरावरून कुठल्याही ठोस योजना, विशेष सवलती नसल्यामुळे विकास म्हणजे नेमके काय, हेच या कुटूंबियांना ठावूक नसल्याचेही यावेळी त्यांच्या बोलण्यातून जाणवून आले.
पावसाळ्याचे दिवस असल्याने उघड्यावर वास्तव्य करणाºया या कुटूंबातील चिमुकल्यांना विविध आजारांनी पछाडले असून त्यांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. वर्षातील ८ महिने भटकंती करावी लागत असल्याने मुलाबाळांच्या शिक्षणाचा मुख्य प्रश्न ऐरणीवर आला असून शासनाने त्यांच्या शिक्षणाचा देखील गांभीर्याने विचार करून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता विशेष प्रयत्न करणे नितांत गरजेचे आहे.