शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

अरे, उठाऽऽ उठाऽऽ दिवाळी आली..!

By admin | Updated: October 20, 2014 22:28 IST

सरकारनामा

श्रीनिवास नागेधडाऽऽड धूऽऽम : औट, सुतळी बॉम्ब, लक्ष्मी तोटे-चिमणी तोटे, भुईनळे, बाण, लवंगी फटाके उडू लागले!दारावर टकटक झाली आणि ‘उठा उठाऽऽ दिवाळी आली, अभ्यंगस्नानाची वेळ झाली!’ अशी हाक ऐकू आली. संजयकाकांना हे नवीनच होतं. अभ्यंगस्नान (कुठनं काढलाय राव हा शब्द? म्हणताना जिभेचे तुकडे पडताहेत!) ही काय भानगड, बघूया तरी, म्हणून ते उठलेच. (हल्ली संघवाल्यांच्या संगतीनं काय-काय करायला लागतंय, नाही?) बघतात तो समोर ‘कमळ’ छाप उटणं आलं. सोबत नरेंद्रभाई-अमितभाई कंपनीचा सुवासिक साबण. गुलालानं माखलेल्या काकांनी उटणं लावलं. खसाखसा साबण लावून कढत पाण्यानं आंघोळ (नव्हे अभ्यंगस्नान...) केली. जगतापसाहेब, सुधीरदादा, खाडे यांनी पाण्याच्या घंगाळाखाली जाळ लावला होता. (नाईकसाहेब मात्र राजूभार्इंना ‘नाग’ छाप तेल देत होते. ते काकांकडं फिरकलेही नाहीत म्हणे!)काकांनी कुर्ता चढवला, तोच कानठळ्या बसवणारा आवाज झाला. ‘कोण रे त्यो?’ असं विचारत काका पुढं आले, पण तिथंच थिजले. आबांनी कवठेएकंदचे औट लावायला सुरुवात केली होती. त्या आवाजानं कानाला दडे गेल्यानं घोरपडे सरकारांनी कधीचाच पळ काढला होता. ‘काका, मला वाचवाऽऽ’ म्हणायलाही त्यांना वेळ मिळाला नाही!! आबांची दिवाळी बघून ‘आता पाच वर्षं परत ह्येचं औट ऐकायचं... ह्यो तेवढा पडायला पाह्यजे होता रे...’ असं म्हणत काकांनी बसकण मारली. तेवढ्यात ‘सण्णऽऽऽ’ करत कानाजवळून बाण गेला. अनिलभाऊंनी एका हातात धनुष्यबाण घेऊन दुसऱ्या हातातनं सोडलेले रॉकेट बाण, भुईनळे पार खानापुरातनं तासगावपर्यंत फिरत होते. काकांनी निरखून बघितलं, भाऊंनी बाण उडवण्यासाठी ‘अंजनी मेड बॉटल’ वापरली होती. कोपऱ्यात उभं राहून सुभाषआप्पा फुगे फोडत होते. त्या फुग्यांचा आवाजही फटाक्यांच्या माळांसारखा येत होता. अनिलभाऊंचे बाण टोपी आणि गोपी यांच्या गोटात घुसत होते. गोपीकडं दिलेल्या कमळाच्या पार चिंध्या झाल्या होत्या. टोपीही काळवंडली होती.तिकडं कदमसाहेबांचे सुतळी बॉम्ब पलूस-कडेगावमध्ये फुटत होते, पण त्यांचा आवाज जिल्हाभर घुमत होता. टेंभूचे फुसके बार घेऊन पृथ्वीराजबाबा कमळाच्या तलावाभोवती फिरत होते. शेवटी सगळे बार फुसके निघाल्यानं त्यांनी ते तलावात टाकून दिले.‘आता आम्हीबी दाखवतो,’ असं म्हणत काकांनी इशारा केला. त्यावर जगतापसाहेबांनी तोटे लावले. धडाऽऽड धूऽऽम... या तोट्यांचा आवाज तासगाव आणि पलूस-कडेगावपर्यंत गेला. तो ऐकताच कदमसाहेबांनी पाहुण्यांकडच्या सावंतांच्या पोराला गावाकडं जायला सांगितलं. आबा मात्र शेंडग्यांच्या प्रकाशअण्णांना हुडकत होते. प्रकाशअण्णांनी केव्हाच मुंबईची गोदी गाठली होती. पुन्हा कधीही जतला यायचं नाही, असं ठरवून!दिवाळीत असा रंग चढत असताना इस्लामपूरकर कसे मागे राहतील! त्यांनी पंच्याहत्तर हजाराची माळच लावली. त्या फटक्यांनी ‘एकास एक’ म्हणणाऱ्यांची पळता भुई थोडी झाली! प्रतीकदादा तर गायबच झाले, पण राजूभाई आणि सदाभाऊही उसाच्या फडात लपून बसले. अभिजितआबा आणि जितेंदरला इस्लामपूरकरांनी पळवून लावलं होतं. जितेंदरनं मनोमन ठरवलं की, बोरगाववरनं हायवेकडं जाताना इस्लामपूर ओलांडायचं नाही... आणि अभिजितआबांनी निश्चय केला की, चिकुर्डेकडनं वाळव्यात जाताना इस्लामपूरमार्गे न जाता येलूर, कामेरीमार्गे रानातनं जायचं! महाडिक कंपनीनं मात्र हुशारीनं इस्लामपूर सोडून शिराळ्याचा रस्ता धरला. तिथं नाईकसाहेब ‘झाड’, ‘भुईनळे’ लावत होते. लख्खं प्रकाशानं सगळं उजळून निघत होतं. महाडिक कंपनीनं फुलबाजे हातात घेऊन फिरवायला सुरुवात केली. दोघा भाऊंच्या (मानसिंग आणि सत्यजित हो!) लवंगी फटाक्यांच्या माळा आधीच विझल्या होत्या. (इस्लामपूरकरांनी कुणाच्या माळांना बत्ती दिली आणि कुणाच्या माळांची वात काढली, हे मात्र दोघा भाऊंना अजून समजलेलं नाही.)खाडेंनी मिरजेत ‘लक्ष्मी’ तोटे, ‘चिमणी’ तोटे लावले होते. तेवढ्या आवाजानंही जाधव मास्तर, सांगलीकर वकील आणि होनमोरे खुर्चीखाली दडून बसले. जाधव मास्तर आणि सांगलीकर वकील अजूनही एकमेकांची कशी जिरवली, या अविर्भावात होते. (त्यांना काय माहीत, की जिरवाजिरवीत आपलीच जिरली ते!) मदनभाऊ सांगलीतल्या बंगल्यात भुईचक्र लावून त्याभोवती स्वत:च गरगर फिरत होते. सगळ्यांनीच असं कसं फिरवलं? इस्लामपूरकरांची ‘गेम’ लक्षात कशी आली नाही? आपल्या पप्पूनं दगा का दिला? तीन नंबरवरचं ‘कमळ’ वर आलंच कसं? हे प्रश्नही त्यांच्या डोक्यात गरगर फिरू लागले. मग त्यांनी आणखी भुईचक्रं लावली. ती बंगल्यातनं बाहेर रस्त्यावर गेली आणि खड्ड्यांमध्ये रूतून बसली. ‘महापालिकेनं रस्त्यांची पार वाट लावलीय...’ असं ते म्हणाले, पण लगेच जीभ चावली. महापालिका तर आपल्याच ताब्यात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.संभाजीआप्पांनी सांगलीच्या मारुती चौकात फटक्यांच्या माळा मागवल्या होत्या. त्यातल्या काही प्रतीकदादांनीच दिल्या होत्या म्हणे! पण सराफकट्ट्यावरनं रंगीबेरंगी भुईनळे आकाशात उडू लागल्याचं दिसताचं आप्पांनी पृथ्वीराजभैय्याला सगळ्या माळा वखारभागात न्यायला लावल्या. पुढच्या वेळी येतील कामाला, असं सांगत त्यांनी पोरांची समजूत घातली.जाता-जाता : सराफकट्ट्यावरनं रंगीबेरंगी भुईनळे आकाशात झेपावू लागले. त्यातल्या काही ‘क्रॅकर्स’मधून वेगवेगळे आवाज येत होते. नेमके काय आवाज येत होते, ते समजलं नाही, पण दिनकरतात्यांना वाटलं की, ‘पेढीवर चला‘, ‘पेढीवर चला’ असा आवाज त्यातनं येतोय! त्यांनी सांगलीवाडीकडनं सराफकट्टा गाठला. गाडगीळांच्या पेढीपुढं चिक्कार गर्दी. ‘सोनं घ्या सोनं... उरलेलं सोनं’ असा बोर्ड पेढीच्या दारात लावला होता. पांढरा सदरा-खाकी चड्डीवाल्यांचा भरणा जास्त होता. तात्या बिरजे, दीपकबाबा, भारतीताई एकेकाला रांगेतनं सोडत होते. नीताताई कट्ट्यावर बसल्या होत्या. ‘माझा क्लेम’... ‘माझा क्लेम’ असं काहीतरी बडबडत होत्या म्हणे! दिनकरतात्या आत घुसले, तोच समोरनं इनामदारांचा शेखर आला. आत एसी केबीनमध्ये बसून सुधीरदादा सगळ्यांना आपट्याची पानं (हेच ते सोनं, बरं का!) देत होते... ‘प्रचाराच्या गडबडीत दसऱ्याचं सोनं द्यायचं राह्यलं. म्हणून आता...’ दिनकरतात्यांच्या लक्षात आलं. ही सगळी इनामदारांच्या शेखरची शाळा! ते मागं फिरले आणि मागच्या दाराला गेले. तिथं दिलीप पैलवानही ‘साथीदारां’ना घेऊन आले होते. दिनकरतात्या आणि पैलवान आत निघाले, तोच इस्लामपूरकरांची गाडी मागच्या बाजूनं बाहेर पडली. गाडीत संजयकाका आणि माधवनगरचे पप्पूशेठही दिसले. दिनकरतात्या आणि पैलवानांनी काय समजायचं ते समजलं. दोघंही आल्या पावली मागं फिरले... आत काही शिल्लक नसणार. हे सोनं इस्लामपूरकरांनी कधीच लुटलं असणार, याची त्यांना पक्की खात्री होती!!

‘त्यांच्या’ केपाही उडाल्या नाहीत!

 

नितीनराजे आणि स्वातीताई, खाड्यांचे सुधाकर, जतच्या कोळेकरांचे भाऊसाहेब आणि त्यांच्यासोबतचे दोघे-तिघे ‘रेल्वे इंजिन’ छाप ‘केपा’ दगडावर उडवत बसले होते. पण ओल्या झाल्यामुळं एक ‘केप’ उडेल तर शपथ! शेवटी त्यांनी तोही नाद सोडून दिला.‘बकरा’ छाप फटाकेयंदा बाजारात ‘बकरा छाप’ फटाके नव्यानं आलेत. मोठा आवाज न होता केवळ ‘फुस्सऽऽ’ असा आवाज त्यातनं येतो म्हणे! सांगलीचे सुरेशअण्णा, शेंडग्यांचे प्रकाशअण्णा, त्यांचे बंधू सुरेश, होनमोरे, सुरेखाताई यांच्याकडं त्या माळा असल्याचं समजलं. आटपाडीचे अमरबापू आणि गोपीचंद, मिरजेचे जाधव मास्तर, जितेंदर, शिराळ्याचे सत्तूभाऊ यांनीही ‘बकरा छाप’ फटाक्यांची आॅर्डर दिल्याचं आता समोर येऊ लागलंय.(‘सरकारनामा’मधील सर्व पात्रं खरी आहेत, कुणाला ती काल्पनिक वाटल्यास निव्वळ योगायोग समजावा.)