शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

हेमा-चिंतनच्या नात्यामध्ये आला ‘अभिमान’

By admin | Updated: December 18, 2015 01:24 IST

सुप्रसिद्ध शिल्पकार हेमा उपाध्याय (४२) आणि त्यांचे वकील हरिश भंबानी (६५) यांच्या हत्येप्रकरणी गुरुवारी हेमाच्या कुटुंबीयांनी मौन तोडले. अमिताभ बच्चन आणि जया भादुरी

मुंबई : सुप्रसिद्ध शिल्पकार हेमा उपाध्याय (४२) आणि त्यांचे वकील हरिश भंबानी (६५) यांच्या हत्येप्रकरणी गुरुवारी हेमाच्या कुटुंबीयांनी मौन तोडले. अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांची मुख्य भूमिका असलेला हिंदी चित्रपट ‘अभिमान’सारखेच हेमा आणि चिंतनचे आयुष्य होते. हेमाची वाढती प्रसिद्धी चिंतनला बघवत नसल्याने, तिला तो दु:ख द्यायचा. त्यामुळेच लग्नाच्या वाढदिवशी फार आनंदात असताना, त्याने हेमाला घटस्फोटाची नोटीस दिली होती, असा आरोप हेमाच्या कुटुंबीयांनी केला आहे.हेमा आणि चिंतनच्या लग्नाचा वाढदिवस ३१ आॅक्टोबरला होता. २००९ या वर्षी खूप आनंदात असताना चिंतनने तिला लग्नाची भेट म्हणून घटस्फोटाची नोटीस पाठवली होती, असे हेमाचे चुलत भाऊ दीपक प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रसाद हे मूळचे चेंबूर येथील राहणारे असून, सध्या कामाच्या निमित्ताने ते आणि त्यांचे कुटुंबीय बँकॉकमध्ये वास्तव्यास आहेत. गुरुवारी त्यांनी हेमाचा पती चिंतन उपाध्याय याच्यावरच हेमाच्या हत्येचा आरोप लावत, या दोघांच्या कौटुंबिक संबंधांतील माहिती उघड केली. हेमा आणि चिंतन मुंबईला आले, तेव्हा सुरुवातीला संघर्षमय आयुष्य असताना ते दहिसरला राहत होते. त्यानंतर थोडासा जम बसल्यानंतर बोरीवलीमध्ये त्यांनी भाडेतत्त्वावर एक घर घेतले. या ठिकाणी त्यांचा व्यवसाय सुरू झाला. त्यामुळे २००५ साली त्यांनी जुहूमध्ये स्वत:चे एक घर घेतले. या ठिकाणी त्यांचा स्टुडिओदेखील होता. मात्र, २००६ मध्ये या दोघांमध्ये लहान-मोठ्या कारणावरून खटके उडू लागले. २००८ मध्ये चिंतनची आई त्यांच्या घरी राहायला आली. तेव्हा हेमा घर सोडून निघून गेली आणि जवळपास सात महिने ती चिंतनपासून वेगळी बोरीवलीमध्ये पुन्हा त्याच भाड्याच्या घरात राहू लागली. हेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी होऊ लागली. मात्र, चिंतनचा व्यवसायात जम बसत नव्हता. त्यामुळे त्याने तिला परदेशातील ग्राहकांशी ओळख करून देण्यास सांगितले, ज्याचा तिने विरोध केला. चिंतन हा हेमाची त्याच्या मित्रांसमोर खिल्ली उडवायचा, तसेच तिला अपमानीतही करायचा. त्यामुळे त्याचे मित्रदेखील तिची थट्टामस्करी करायचे.एकदा वडाळ्यात एका कार्यक्रमाला जाताना या दोघांचे किरकोळ कारणावरून आपापसात भांडण झाले. तेव्हा चिंतनने तिला गाडीतून जबरदस्ती उतरविले आणि तो निघून गेला. घरी पोहोचल्यावर हेमा बेडवर जेवत असताना त्याने तिला लाथेने उडविले. अशा प्रकारे तो तिला अन्यायकारक वागणूक देत असल्याचे सांगताना प्रसादचे डोळे भरून आले.चिंतन विरोधात पुरावे देणार होता गोटू चिंतनशी संबंधित आलेले सर्व संपर्क तोडून टाकण्याचा सल्ला प्रसादनी हेमाला दिला होता. गोटूसोबतही ती गेल्या दीड वर्षांपासून काम करत नव्हती. तिने गोटूला दोन वर्षांपूर्वी दोन लाख रुपये मदत म्हणून दिले होते. हत्येच्या २० दिवस आधी गोटू तिच्या अंधेरीतील लक्ष्मी इंडस्ट्रीमध्ये असलेल्या स्टुडिओत आला, तेव्हा त्याने कर्मचाऱ्यांकडून हेमाचा मोबाइल क्रमांक मागितला. मात्र, तेव्हाच हेमा तिथे आली. त्यावेळी तिने दिलेल्या कर्जापैकी दहा हजार रुपये परत करण्यासाठी आपण आल्याचे गोटूने सांगितले. त्यावेळी ‘मी पैसे मागितले नसून तू इथून निघून जा,’ असे हेमाने सांगितले. या माणसाला पुन्हा इथे प्रवेश देऊ नका, असे स्टाफला बजावले. मात्र, चिंतन विरोधात त्याच्याकडे काही पुरावे असल्याचे तिला कळाले. तेव्हा विद्याधर राजभर उर्फ गोटूकडे ती भंबानी यांना घेऊन गेली. चिंतनविरुद्ध न्यायालयात वापरता येतील, असे काही पुरावे तो तिला देईल, अशी तिला आशा होती, पण त्यासाठी त्याला आर्थिक मोबदला हवा होता. कांदिवलीला हेमाला बोलावून त्याने तिचा विश्वासघात केल्याचेही प्रसाद यांचे म्हणणे आहे. हेमा १५ लाखांची अंगठी घालायची. त्यामुळे तिने गोटूचे पाच लाख रखडवल्याची बाब खोटी आहे. तिने नोकरांसाठीदेखील दोन दोन लाख रुपये ठेवले होते. तिचे काही बरेवाईट झाल्यास ते नोकरांना द्यावे, असे तिने आईला सांगून ठेवल्याचेही प्रसाद यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)सीबीआय चौकशीची मागणीहेमाच्या घरच्यांना एफआयआरची प्रत अजून मिळालेली नाही, तसेच त्यात संबंधित कलमेदेखील लावण्यात आलेली नाहीत. त्याचप्रमाणे, त्यात चिंतनच्या नावाचा देखील उल्लेख करणे गरजेचे आहे, असे प्रसाद यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपण या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. घटस्फोटासाठी चिंतन वेगळा : चिंतनने हेमाकडून घटस्फोट मागितला. मात्र, जर ते एकत्र राहिले असते, तर त्यांना घटस्फोट मिळाला नसता. त्यामुळेच तो दिल्लीला जाऊन राहू लागल्याचे प्रसाद यांचे म्हणणे आहे. हेमामध्ये दोष असल्याने तिला मूल होणे शक्य नसल्याचे डॉक्टरांचे मत होते. त्यामुळे तिने चिंतनलादेखील त्याची तपासणी करून घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्याचा ‘इगो’ दुखावला होता.