शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अमोल यादवच्या कंपनीला मदत

By admin | Updated: April 1, 2017 03:47 IST

आपल्या घराच्या गच्चीवर विमान तयार करणाऱ्या अमोल यादव या तरुणाला सरकारी मदतीचे पंख मिळाले आहेत

मुंबई : आपल्या घराच्या गच्चीवर विमान तयार करणाऱ्या अमोल यादव या तरुणाला सरकारी मदतीचे पंख मिळाले आहेत. यादव यांना राज्य सरकारकडून पालघरमध्ये १५७ एकरचा भुखंड मिळणार असून, तेथे सहा आसनी आणि वीस आसनी विमान बनविण्याचा कारखाना तो उभा करणार आहे. जेट एअरवेजमध्ये डेप्युटी चिफ पायलट असलेल्या अमोलने कांदिवलीतील चारकोप येथील घराच्या गच्चीवर सहा आसनी विमान बनविले होते. गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या मेक इन इंडिया सप्ताहात हे विमान ठेवण्यात आले होते. यादव यांची कल्पकता पाहून प्रभावित झालेल्या राज्य सरकारने आता त्यांना १५७ एकर जमीन पालघरमध्ये देऊ केली आहे. तेथे ते आपल्या थ्रस्ट इंडिया कंपनीमार्फत सहा आसनी आणि वीस आसनी विमानांची निर्मिती करणारा उद्योग उभा करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यादव यांना सरकार मदत करीत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, यादव यांच्यासोबतच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनाही बोलावण्यात आले आहे. डीजीसीएच्या विमान सुरक्षा अधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. यादव यांनी सांगितले की, माझे स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे. १९९५मध्ये मी अमेरिकेत प्रशिक्षणासाठी गेलो होतो. जुन्या विमानांचे सुटे भाग वापरून स्वत:चे विमान तयार करणारे असंख्य लोक मला तिथे भेटले. त्यात अनेक जण मध्यमवर्गीय होते. तेथून मला प्रेरणा मिळाली. आपण आपली विमाने स्वत: बनवायला लागलो, तर भारतीय विमान उड्डाण क्षेत्रात क्रांती येईल.यादव म्हणाले की, माझ्यासमोरील या पुढचा मोठा प्रश्न भांडवलाचा राहणार आहे. मी एकच सहा आसनी विमान बनविले. त्यावर काही कोटी रुपये खर्च झाले. यावरून खर्चाची कल्पना यावी. सरकारकडून बीज भांडवल मिळाल्यास मला मदत होईल.असे आहे विमानहे विमान १,५00 फूट प्रति मिनीट या वेगाने १३ हजार फूट उंच झेप घेऊ शकते. ते एका वेळी २ हजार किमी उड्डाण करू शकते. त्याची गती प्रतितास १८५ हवाई मैल आहे. ते सध्या धुळ््याच्या विमानतळावर ठेवले आहे.