शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

मदत दूरच, मंत्रालयात मिळाला मार

By admin | Updated: March 24, 2017 16:06 IST

गारपिटीत २०१५ साली रोपवाटिकेचे २५ लाखांचे नुकसान झाले. पंचनामाही झाला. मात्र मदत काही मिळाली नाही. ती मिळेल या आशेने मंत्रालय गाठले.

सुरेश चव्हाण/ऑनलाइन लोकमत

कन्नड (जि. औरंगाबाद), दि. 24 - गारपिटीत २०१५ साली रोपवाटिकेचे २५ लाखांचे नुकसान झाले. पंचनामाही झाला. मात्र मदत काही मिळाली नाही. ती मिळेल या आशेने मंत्रालय गाठले. मदत दूरच, तिथे पोलिसांचा मार मिळाला... कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथील रामेश्वर हरिभाऊ भुसारे (३२) या शेतकऱ्याची ही व्यथा.

भुसारे यांनी त्यांच्या शेतजमीन गट क्र.४५ मध्ये आधुनिक पध्दतीने रोपवाटीका उभारली होती. त्यासाठी त्यांनी १ एकर क्षेत्रावर स्वखर्चाने नेट हाऊस तयार केले होते. मात्र ११ व १२ एप्रिल २०१५ रोजी झालेल्या गारपिटीमुळे त्यांच्या म्हणण्यानुसार २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. पंचनामा होऊनही नुकसान भरपाईच्या यादीत नाव आले नाही म्हणून भुसारे यांनी कृषी अधिकारी, तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. नेटशेडच्या नवीन उभारणीसाठी शासनाच्या योजनेच्या माध्यमातून मदत मिळावी अशी मागणी केले. सर्व शासकीय यंत्रणांकडे अर्जफाटे करून थकल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागण्यासाठी त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. मंत्रालयात मदत तर मिळाली नाही, पोलिसांचा मार मात्र मिळाला.

कृषी विभागाचे म्हणणे काय?नैसर्गिक आपत्तीची नुकसानभरपाई ही केवळ पिकांसाठी दिली जाते, असे भुसारे यांना कृषी विभागाने सांगितले होते. ही नेटशेड त्यांनी स्वत:च्या पैशातून उभारली होती. कुठल्याही शासकीय योजनेतून उभारली नव्हती. मात्र, नियमात तशी तरतूद नसल्याने नुकसानभरपाई देता येणे शक्य नव्हते. कृषी विभागाने शासकीय योजनेसाठी अर्ज करण्यास सांगितले. त्यानुसार शेडनेटसाठी डिसेंबर २०१६ मध्ये वर्कआॅर्डर देण्यात आली. मात्र त्यांनी संधी वापरली नाही. या योजनेत ५० टक्के अनुदान दिले जाते. आता मार्चअखेरीस हा निधी खर्च करणे आवश्यक असल्याने त्यांच्याकडे कृषी विभागाने विचारणा केली असता पैसे नसल्याचे सांगितले. कृषी अधिकाऱ्यांनी त्यांना बँकेकडून १६ लाख रुपये कर्जाची सवलत उपलब्ध करून दिली. यातील १२ लाख नेटशेडसाठी तर ४ लाख रुपये पीककर्ज म्हणून आहेत. मात्र, बँकेने २५ टक्के रक्कम भरण्याची अट घातल्याने त्यांना याचाही लाभ घेता आला नाही.

....मग गांजाच्या शेतीसाठी परवानगी द्या !मोठे नुकसान होऊनही भरपाई मिळत नाही. त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकार मदत देऊ शकत नसेल, तर मला गांजाची शेती करण्याची तरी परवानगी द्यावी, अशी मागणी रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांनी कृषी विभागाकडे अलिकडेच केली होती. अपेक्षेप्रमाणे त्यांना ही परवानगी नाकारण्यात आली होती.

आत्महत्येचाही दिला होता इशारा३० सप्टेंबर २०१६ रोजी सदर शेतकऱ्याने कृषी राज्यमंत्र्यांनाही निवेदन देऊन आपल्यावरील अन्यायाची गाथा त्यात कथन केली होती. कृषी विभाग न्याय देत नसेल तर मला नाईलाजास्तव आत्महत्या करावी लागेल, असे या निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर ४ आॅक्टोबर २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी निवेदन पाठविले होते.