शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मदत दूरच, मंत्रालयात मिळाला मार

By admin | Updated: March 24, 2017 16:06 IST

गारपिटीत २०१५ साली रोपवाटिकेचे २५ लाखांचे नुकसान झाले. पंचनामाही झाला. मात्र मदत काही मिळाली नाही. ती मिळेल या आशेने मंत्रालय गाठले.

सुरेश चव्हाण/ऑनलाइन लोकमत

कन्नड (जि. औरंगाबाद), दि. 24 - गारपिटीत २०१५ साली रोपवाटिकेचे २५ लाखांचे नुकसान झाले. पंचनामाही झाला. मात्र मदत काही मिळाली नाही. ती मिळेल या आशेने मंत्रालय गाठले. मदत दूरच, तिथे पोलिसांचा मार मिळाला... कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथील रामेश्वर हरिभाऊ भुसारे (३२) या शेतकऱ्याची ही व्यथा.

भुसारे यांनी त्यांच्या शेतजमीन गट क्र.४५ मध्ये आधुनिक पध्दतीने रोपवाटीका उभारली होती. त्यासाठी त्यांनी १ एकर क्षेत्रावर स्वखर्चाने नेट हाऊस तयार केले होते. मात्र ११ व १२ एप्रिल २०१५ रोजी झालेल्या गारपिटीमुळे त्यांच्या म्हणण्यानुसार २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. पंचनामा होऊनही नुकसान भरपाईच्या यादीत नाव आले नाही म्हणून भुसारे यांनी कृषी अधिकारी, तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. नेटशेडच्या नवीन उभारणीसाठी शासनाच्या योजनेच्या माध्यमातून मदत मिळावी अशी मागणी केले. सर्व शासकीय यंत्रणांकडे अर्जफाटे करून थकल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागण्यासाठी त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. मंत्रालयात मदत तर मिळाली नाही, पोलिसांचा मार मात्र मिळाला.

कृषी विभागाचे म्हणणे काय?नैसर्गिक आपत्तीची नुकसानभरपाई ही केवळ पिकांसाठी दिली जाते, असे भुसारे यांना कृषी विभागाने सांगितले होते. ही नेटशेड त्यांनी स्वत:च्या पैशातून उभारली होती. कुठल्याही शासकीय योजनेतून उभारली नव्हती. मात्र, नियमात तशी तरतूद नसल्याने नुकसानभरपाई देता येणे शक्य नव्हते. कृषी विभागाने शासकीय योजनेसाठी अर्ज करण्यास सांगितले. त्यानुसार शेडनेटसाठी डिसेंबर २०१६ मध्ये वर्कआॅर्डर देण्यात आली. मात्र त्यांनी संधी वापरली नाही. या योजनेत ५० टक्के अनुदान दिले जाते. आता मार्चअखेरीस हा निधी खर्च करणे आवश्यक असल्याने त्यांच्याकडे कृषी विभागाने विचारणा केली असता पैसे नसल्याचे सांगितले. कृषी अधिकाऱ्यांनी त्यांना बँकेकडून १६ लाख रुपये कर्जाची सवलत उपलब्ध करून दिली. यातील १२ लाख नेटशेडसाठी तर ४ लाख रुपये पीककर्ज म्हणून आहेत. मात्र, बँकेने २५ टक्के रक्कम भरण्याची अट घातल्याने त्यांना याचाही लाभ घेता आला नाही.

....मग गांजाच्या शेतीसाठी परवानगी द्या !मोठे नुकसान होऊनही भरपाई मिळत नाही. त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकार मदत देऊ शकत नसेल, तर मला गांजाची शेती करण्याची तरी परवानगी द्यावी, अशी मागणी रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांनी कृषी विभागाकडे अलिकडेच केली होती. अपेक्षेप्रमाणे त्यांना ही परवानगी नाकारण्यात आली होती.

आत्महत्येचाही दिला होता इशारा३० सप्टेंबर २०१६ रोजी सदर शेतकऱ्याने कृषी राज्यमंत्र्यांनाही निवेदन देऊन आपल्यावरील अन्यायाची गाथा त्यात कथन केली होती. कृषी विभाग न्याय देत नसेल तर मला नाईलाजास्तव आत्महत्या करावी लागेल, असे या निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर ४ आॅक्टोबर २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी निवेदन पाठविले होते.