शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

१० हजारांसाठी अन्य बँकांची मदत

By admin | Updated: June 16, 2017 04:30 IST

खरीप हंगामासाठी तातडीने १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यासाठी पैसे नाहीत, अशी भूमिका काही जिल्हा बँकांनी घेतलेली असताना त्याचा फटका शेतकऱ्यांना

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : खरीप हंगामासाठी तातडीने १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यासाठी पैसे नाहीत, अशी भूमिका काही जिल्हा बँकांनी घेतलेली असताना त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू नये म्हणून अशा जिल्हा बँकांच्या मदतीसाठी तेथील राष्ट्रीयीकृत आणि व्यावसायिक बँकांची मदत घेण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यादृष्टीने कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आली आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, सोलापूर, परभणी, हिंगोली, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा या १६ बँका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. शेतकऱ्यांना १० हजारांपर्यंतचे कर्ज देण्यात त्यांना अडचणी आहेत. त्यामुळे त्यांनी अशी असमर्थता व्यक्त केली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज ‘लोकमत’ला सांगितले की ज्या बँकांना कर्जवाटपात अडचणी आहेत त्यांना स्थानिक जिल्ह्यातील लीड बँका वा राष्ट्रीयकृत/व्यावसायिक बँकांची मदत घेण्यास सांगितले आहे. सहकार विभागाचे अधिकारी त्यासाठी समन्वय साधत आहेत. सर्व कर्जाची थकहमी राज्य सरकारने दिलेली आहे. सर्व शेतकऱ्यांना १० हजारापर्यंतचे कर्ज मिळेल. त्यासाठी विविध सहकारी सोसायट्या या एजन्ट म्हणून काम करतील त्यांना त्याचे कमिशन दिले जाईल. सुलभी पीक कर्ज योजना असे या योजनेला नाव दिले असून शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन कर्जाचे फॉर्म गोळा करण्यात येतील. या कर्जासाठी शेतकऱ्यांनी प्रतिज्ञापत्र भरण्याची आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. नोकरदार, आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, निवृत्तीवेतनधारक व्यक्ती, करदाते, डॉक्टर, वकील, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी दूध संघ यांचे संचालक आणि या संस्थांचे अधिकारी, कामगार यांना हे कर्ज मिळणार नाही.- १० हजार रुपयांचे कर्ज देण्यासाठी श्रीमंत व्यक्ती, करदाते यांना वगळण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून तसे शपथपत्र घेतले जात आहे. मात्र आता शपथपत्राची सक्ती नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात सांगितले.