शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

१० हजारांसाठी अन्य बँकांची मदत

By admin | Updated: June 16, 2017 04:30 IST

खरीप हंगामासाठी तातडीने १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यासाठी पैसे नाहीत, अशी भूमिका काही जिल्हा बँकांनी घेतलेली असताना त्याचा फटका शेतकऱ्यांना

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : खरीप हंगामासाठी तातडीने १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यासाठी पैसे नाहीत, अशी भूमिका काही जिल्हा बँकांनी घेतलेली असताना त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू नये म्हणून अशा जिल्हा बँकांच्या मदतीसाठी तेथील राष्ट्रीयीकृत आणि व्यावसायिक बँकांची मदत घेण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यादृष्टीने कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आली आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, सोलापूर, परभणी, हिंगोली, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा या १६ बँका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. शेतकऱ्यांना १० हजारांपर्यंतचे कर्ज देण्यात त्यांना अडचणी आहेत. त्यामुळे त्यांनी अशी असमर्थता व्यक्त केली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज ‘लोकमत’ला सांगितले की ज्या बँकांना कर्जवाटपात अडचणी आहेत त्यांना स्थानिक जिल्ह्यातील लीड बँका वा राष्ट्रीयकृत/व्यावसायिक बँकांची मदत घेण्यास सांगितले आहे. सहकार विभागाचे अधिकारी त्यासाठी समन्वय साधत आहेत. सर्व कर्जाची थकहमी राज्य सरकारने दिलेली आहे. सर्व शेतकऱ्यांना १० हजारापर्यंतचे कर्ज मिळेल. त्यासाठी विविध सहकारी सोसायट्या या एजन्ट म्हणून काम करतील त्यांना त्याचे कमिशन दिले जाईल. सुलभी पीक कर्ज योजना असे या योजनेला नाव दिले असून शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन कर्जाचे फॉर्म गोळा करण्यात येतील. या कर्जासाठी शेतकऱ्यांनी प्रतिज्ञापत्र भरण्याची आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. नोकरदार, आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, निवृत्तीवेतनधारक व्यक्ती, करदाते, डॉक्टर, वकील, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी दूध संघ यांचे संचालक आणि या संस्थांचे अधिकारी, कामगार यांना हे कर्ज मिळणार नाही.- १० हजार रुपयांचे कर्ज देण्यासाठी श्रीमंत व्यक्ती, करदाते यांना वगळण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून तसे शपथपत्र घेतले जात आहे. मात्र आता शपथपत्राची सक्ती नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात सांगितले.