शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

गरीब मुलांच्या आरोग्यासाठी मदत करा!

By admin | Updated: November 19, 2016 02:22 IST

गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या चिमुरड्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी हातभार लावण्याचे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.

मुंबई : गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या चिमुरड्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी हातभार लावण्याचे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे. आरोग्य कार्ड या सामाजिक उपक्रमाचे प्रेस क्लब येथे उद्घाटन करताना देसाई बोलत होते.मुंबई महानगरपालिका, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि ज्येष्ठ गायक पंकज उधास यांच्या पॅरेन्ट्स असोसिएशन आॅफ थॅलेसिसीम युनिट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य कार्ड हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाविषयी देसाई म्हणाले की, जीवन कष्टात जात असल्याने गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या पालकांना त्यांच्या मुलांकडे लक्ष देता येत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्याच्या कामात स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी हातभार लावला पाहिजे. मुलांचे आहाराकडे होणारे दुर्लक्ष, मुलींमधील लोहाचे कमी होणारे प्रमाण, वाढत्या वयानुसार होणारे बदल त्यानुसार समस्या या विषयांकडे ध्यान देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.मुंबई महानगरपालिकेच्या आठवी ते दहावीपर्यंतच्या अंदाजे ५२ हजार मुलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांचा रक्तगट व रक्त तपासणी केली जाईल. अ‍ॅनेमिया, थॅलेसेमिया, रक्तगट अशा १८ प्रकारच्या चाचण्या करून प्रत्येक मुलांचे संगणकीय आरोग्य कार्ड तयार करण्यात येईल. त्यानुसार त्यांच्या व्याधीचे निदान करून त्याच्यावर योग्य उपचार व मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे वेळीच त्याच्या आरोग्याची काळजी घेणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)