शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतक-यांना मिळणार मदत

By admin | Updated: June 12, 2016 02:33 IST

पीक विमा न काढलेल्या अमरावती विभागातील शेतक-यांचा समावेश.

संतोष येलकर/अकोला राष्ट्रीय कृषी पीक विमा काढला नाही, अशा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना दुष्काळी परिस्थितीत पीक विमा रकमेच्या ५0 टक्के मदत शासनामार्फत दिली जाणार आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील पीक विमा न काढलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचा समावेश असून, विमा न काढलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांकडून तहसीलदारांना देण्यात आले आहेत.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, राज्यातील विविध जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, गतवर्षीच्या खरीप हंगामात राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढलेल्या शेतकर्‍यांपैकी पीक नुकसानभरपाईपोटी पात्र शेतकर्‍यांसाठी पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली. पीक विम्याची प्राप्त रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्ी प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळी परिस्थितीत पीक विमा योजनेंतर्गत विमा उतरविलेल्या शेतकर्‍यांना पीक नुकसानभरपाईच्या रकमेचा लाभ मिळत असला, तरी गतवर्षी ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा काढला, अशा शेतकर्‍यांना दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठी पीक विम्याच्या ५0 टक्के रकमेची मदत देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचा समावेश आहे. त्यानुसार विभागातील पाचही जिल्ह्यांतील कापूस व सोयाबीन पिकाचा विमा न काढलेल्या शेतकर्‍यांना पीक विम्याच्या ५0 टक्के मदतीची रक्कम शासनामार्फत देण्यात येणार आहे. त्यासाठी गतवर्षी पीक विमा न काढलेल्या शेतकर्‍यांची माहिती सादर करण्याचे निर्देश शासनामार्फत जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

शेतक-यांच्या याद्या तयार करा; जिल्हाधिका-यांचे निर्देश!गतवर्षी पीक विमा काढलेल्या व पीक विमा न काढलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या याद्या तयार करून तातडीने सादर करण्याचे निर्देश अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत जिल्हाधिकार्‍यांकडून तहसीलदारांना ९ जून रोजी देण्यात आले आहेत. याद्या तयार झाल्यानंतर पीक विमा न काढलेल्या शेतकर्‍यांची माहिती जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.