शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

दुष्काळग्रस्तांना आठवडाभरात मदत

By admin | Updated: November 20, 2014 02:41 IST

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या निकषानुसार दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक शेतात जाऊन पंचनामे करण्याची अट शिथिल करण्याची राज्य सरकारची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे.

मुंबई : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या निकषानुसार दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक शेतात जाऊन पंचनामे करण्याची अट शिथिल करण्याची राज्य सरकारची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्तांना मदत मिळण्यास आता दोन महिन्यांऐवजी जेमतेम आठवडा लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला.भाजपाच्या सदस्य नोंदणी मोहिमेचा आरंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते म्हणाले की, दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यावर आतापर्यंत पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर न करण्याकडे मागील राज्यकर्त्यांचा कल राहिला होता. मात्र या वेळी आमच्या सरकारने वस्तुनिष्ठ आकडेवारी सादर करण्यास सांगितले. त्यामुळेच महाराष्ट्रातील १९ हजारांहून अधिक गावे दुष्काळाच्या छायेत असल्याचे गंभीर चित्र दिसत आहे. आता केंद्राकडे मदतीकरिता सरकारचे निवेदन जाईल. त्यानंतर सरकारचे पथक येऊन प्रत्येक शेतीचे पंचनामे करील, अशी अट होती. मात्र लोकांना तत्काळ दिलासा देण्याकरिता अट काढून टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा १७०० मे. वॅट वीजनिर्मितीचे प्रकल्प कोळशाअभावी बंद होते आणि २००० मे. वॅट वीजनिर्मितीचे प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर होते. केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी तातडीने कोळसा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील दोन तासांचे लोडशेडिंग बंद झाले आहे, याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले. राज्यातील आठ जिल्ह्यांतील २,५०० ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाले होते व बदलण्याकरिता एकही ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नव्हता. त्यामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र उद्यापासून ट्रान्सफॉर्मरचा साठा येत असून ते बदलण्यास सुरुवात झाली आहे, असे ते म्हणाले.