शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पुष्पगुच्छऐवजी हेल्मेट द्या भेट!

By admin | Updated: April 23, 2017 02:11 IST

लग्नसमारंभ अथवा वाढदिवस आदी कार्यक्रम म्हटले की, संबंधितांना आपण पुष्पगुच्छ भेट देतो. परंतु या पारंपरिक पद्धतीला फाटा देत पुष्पगुच्छऐवजी आयुष्य सुरक्षित

नाशिक : लग्नसमारंभ अथवा वाढदिवस आदी कार्यक्रम म्हटले की, संबंधितांना आपण पुष्पगुच्छ भेट देतो. परंतु या पारंपरिक पद्धतीला फाटा देत पुष्पगुच्छऐवजी आयुष्य सुरक्षित ठेवणारे हेल्मेट भेट देण्याचा अभिनव उपक्रम नाशिक पोलिसांनी हाती घेतला असून, ‘लोकमत’च्या वर्धापनदिनाप्रसंगी त्याचा शुभारंभ करण्यात आला.दुचाकींचे वाढते अपघात व त्यामधील मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या शहरात वाढत आहे. यामुळे वाहन चालविताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे, ही बाब लक्षात घेऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ‘लोकमत’च्या २२ व्या वर्धापनदिनास आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह शुभेच्छा द्यावयास आलेले पोलीस आयुक्त डॉ़ रविंद्र कुमार सिंगल यांनी ‘लोकमत’चे सहाय्यक उपाध्यक्ष बी. बी. चांडक व निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्याकडे हेल्मेट सुपुर्द करत उपक्रमाचा शुभारंभ केल्याची घोषणा केली. याप्रसंगी सदर हेल्मेट सिंगल यांच्याच हस्ते छायाचित्रकार नीलेश तांबे यांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त विजय पाटील, दत्तात्रय कराळे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, जयंत बजबळे आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने रस्ता सुरक्षा सप्ताह तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून हेल्मेट वापराबद्दल जनजागृती चालविली आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांवर कारवाई करताना ‘हेल्मेटचे महत्त्व’ या विषयावर निबंध लिहून घेतानाच हेल्मेट वापरणाऱ्या चालकांना चौकाचौकात गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्याचा अनोखा उपक्रमही राबविण्यात आला. (प्रतिनिधी)प्रत्येकाचे जीवन महत्त्वाचे आहे. ते असे अपघातातून संपू नये, यासाठी दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. आपण लग्नकार्य, वाढदिवस अशा विविध कार्यक्रमांना पुप्षगुच्छ व इतर भेटवस्तू देतो. त्याऐवजी आपल्या आप्तेष्टांना अनपेक्षित अपघातांतून जीवनदान देण्यासाठी हेल्मेट भेट देण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. - डॉ. रवींद्र कुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक.