शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

‘चित्री’च्या उंचीचा प्रस्ताव लालफितीतच!

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

गडहिंग्लजचा पूर्व भाग : खेडी हक्काच्या पाण्यापासून वंचित

राम मगदूम - गडहिंग्लज -आजरा, गडहिंग्लजसह सीमाभागाला वरदान ठरलेल्या चित्री धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव शासनाच्या लालफितीत अडकून पडला आहे. गडहिंग्लजच्या पूर्वेकडील शेतीला बारमाही पाणी मिळण्यासाठी या प्रस्तावाला नव्या सरकारने त्वरित मंजुरी द्यावी, अशी सीमाभागातील जनतेची आग्रही मागणी आहे. कृष्णा-गोदावरी लवादानुसार आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यांसाठी उपलब्ध पाणी वापरात आणण्यासाठी चित्री धरणाची उंची वाढविण्याचा मुद्दा अजूनही मागे पडला होता. मात्र, अलीकडे राज्यात पडणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रेंगाळलेला हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  दरवर्षी चित्री धरणक्षेत्रात सरासरी ३०८९ मि. मी. इतका पाऊस पडतो. धरण भरल्यानंतर उर्वरित पाणी वाहून जाते. त्याचा उपयोग पाण्यापासून वंचित गावांना होण्यासाठी चित्री धरणाची उंची वाढविण्याची गरज आहे. गडहिंंग्लजच्या पूर्वेकडील खेड्यांच्या नळ योजनांसाठी दूरवरच्या अंतरावरून पाणी आणावे लागते. चित्रीची उंची वाढल्यास विजेच्या खर्चाची बचत होऊन संबंधित गावांना पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे. उंची वाढविल्यानंतर२२५७ द.ल.घ.फू . पाणीसाठा होईल. ३७५ द.ल.घ.फू. जादा पाणी साठणार ९६० हेक्टर सिंचन क्षमता वाढेल. (२५,००० एकराला पाणी मिळेल)चित्री धरणाची सद्य:स्थिती पाणी साठवणूक क्षमता - १८८२ द.ल.घ.फू.सिंचन क्षमता - ५८५० हेक्टर (१५ हजार एकर)लाभक्षेत्र - निलजी बंधाऱ्यापर्यंतशासनाच्या तिजोरीवर बोजा पडणार नाहीकर्नाटकातील संकेश्वरसह पलीकडील सहा गावांनादेखील शेती व पिण्यासाठी बारमाही पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र, चित्री धरणाची उंची वाढविण्यासाठीचा अंदाजित २५ कोटींचा बोजा महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर पडू नये, यासाठी लाभार्थी कर्नाटक शासनाकडून ही रक्कम घ्यावी, असेही प्रस्तावातून सूचित करण्यात आले आहे. सहा महिन्यांपूर्वी प्रस्ताव हिरण्यकेशी काठावरील निलजी बंधाऱ्यापुढील कर्नाटक हद्दीपर्यंतच्या खेड्यांनाही बारमाही शेती व पिण्याचे पाणी मिळावे. यासाठी चित्री पाटबंधारे मध्यम प्रकल्पाची उंची ३.६० मीटरने वाढवावी, अशी मागणी चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांकडे खास पत्राद्वारे केली आहे. त्यानंतर माजी जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनीही त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, या प्रस्तावास अद्याप मंजुरी मिळालेली नाही.बाधित क्षेत्र व पुनर्वसनाचा प्रश्न३० हेक्टर जमीन बाधित होईल. त्यापैकी दहा हेक्टर वनजमीन असून, उर्वरित २० हेक्टर पैकी आवंडी व आजरा येथील दहा हेक्टर, धनगरवाडीची सहा हेक्टर व राजेवाडीची चार हेक्टर.आवंडी येथील भावेश्वरी मंदिर बाधित होईल. त्यामुळे नव्याने मंदिर बांधावे लागेल.धनगरवाड्याकडे जाणाऱ्या २ कि. मी. रस्त्याची नव्याने बांधणी करावी लागेल. एकाही गावठाणाचे पुनर्वसन करावे लागणार नाही.१२ गावांना मिळणार पाणी.