शहरं
Join us  
Trending Stories
1
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
2
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
3
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
4
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
5
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
6
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
7
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
8
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
9
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
10
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
11
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
12
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
13
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
14
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
15
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
16
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
17
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
18
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
19
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
20
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर

शिरोली परिसरात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: May 18, 2016 01:21 IST

अधिक भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ या वर्षीच्या दुष्काळात शिरोली बुद्रुक आणि परिसरातील शेतकरीवर्गावर आली

ओझर : १९७२मध्ये पडलेल्या दुष्काळात जेवढी भयानक स्थिती नव्हती त्यापेक्षा अधिक भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ या वर्षीच्या दुष्काळात शिरोली बुद्रुक आणि परिसरातील शेतकरीवर्गावर आली आहे. पाण्यासाठी विहिरींची खोदकामे करून खडकाशी झुंज या परिसरातील शेतकरीवर्ग देत आहेत.शिरोली बुद्रुक गावाचा पश्चिम भाग शिरोली खुर्द, कुमशेत, महाबरेवाडी, गोळेगाव, अलदरे, पिंपळगाव सिद्धनाथ ही कुकडी नदीच्या काठवरची गावे आहेत. या नदीवर असलेल्या माणिकडोह धरणात जेमतेम फक्त पिण्यासाठीचा पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असताना रब्बी हंगामातच सर्व धरण मोकळे केले. वर्षानुवर्षे तालुक्यात बागायत गावे म्हणून ओळख असलेली ही गावे गेली तीन महिने पाणीटंचाईचा सामना करत आहेत. या गावांसाठी कुकडी नदीवर असणारे तीन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तीन महिन्यांपूर्वी कोरडे पडले आहेत. ना मायबाप सरकार काही करत, ना निसर्गाची साथ अशा कात्रीत या गावांतील शेतकरीवर्ग सापडला आहे. कर्ज काढून विहिरींची खोदकामे शेतकरी करीत आहे. परंतु भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली असल्यामुळे खडकाशी झुंज देऊनही पाणी मिळत नाही. शेतमाल पाण्याअभावी अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र जागोजागी पाहावयास मिळत आहे.न्याय कोणाकडे मागावा..?या वर्षी शेतकऱ्यांना कांद्याने रडवले. या पिकाचा उत्पादन खर्चदेखील वसूल होत नाही. नीचांकी दराची पातळी कांद्याने गाठली आहे. उन्हाळी हंगामातील पिकांवर सर्व अर्थकारण सावरले असते. परंतु पाण्याने धोका दिल्यामुळे या गावांतील शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला असल्याचे चित्र आहे. पूर्वीचा बागायत गावाचा शिक्का असल्यामुळे महसूल विभागाच्या पैसेवारींच्या गणितामुळे ही गावे दुष्काळग्रस्त गावांमध्ये मोडत नाहीत. परंतु सध्या दुष्काळाचा सामना करीत असलेल्या या गावांतील शेतकऱ्यांना न्याय कोणाकडे मागावा अशी अडचण निर्माण झाली आहे.पाण्याअभावी काही शेतकऱ्यांनी जमिनी पडीक ठेवल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी धडपड करून उन्हाळी टोमॅटो घेतले. परंतु त्यांना सिजेंटा कंपनीच्या सदोष बियाणांनी धोका दिला. या गावांतील शेतकऱ्यांनी विघ्नहरने अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना दुष्काळी परिस्थितीतून सावरण्यासाठी साकडे घातले आहे. शिरोली बुद्रुक कृषक सेवा या दहा गावांच्या सोसायटीच्या माध्यमातून विघ्नहरने अध्यक्ष तथा या सोसायटीचे अध्यक्ष सत्यशील शेरकर या गावांतील शेतकऱ्यांसाठी दुष्काळात देवदूताची भूमिका बजावत आहेत.