शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

शिरोली परिसरात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: May 18, 2016 01:21 IST

अधिक भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ या वर्षीच्या दुष्काळात शिरोली बुद्रुक आणि परिसरातील शेतकरीवर्गावर आली

ओझर : १९७२मध्ये पडलेल्या दुष्काळात जेवढी भयानक स्थिती नव्हती त्यापेक्षा अधिक भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ या वर्षीच्या दुष्काळात शिरोली बुद्रुक आणि परिसरातील शेतकरीवर्गावर आली आहे. पाण्यासाठी विहिरींची खोदकामे करून खडकाशी झुंज या परिसरातील शेतकरीवर्ग देत आहेत.शिरोली बुद्रुक गावाचा पश्चिम भाग शिरोली खुर्द, कुमशेत, महाबरेवाडी, गोळेगाव, अलदरे, पिंपळगाव सिद्धनाथ ही कुकडी नदीच्या काठवरची गावे आहेत. या नदीवर असलेल्या माणिकडोह धरणात जेमतेम फक्त पिण्यासाठीचा पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असताना रब्बी हंगामातच सर्व धरण मोकळे केले. वर्षानुवर्षे तालुक्यात बागायत गावे म्हणून ओळख असलेली ही गावे गेली तीन महिने पाणीटंचाईचा सामना करत आहेत. या गावांसाठी कुकडी नदीवर असणारे तीन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तीन महिन्यांपूर्वी कोरडे पडले आहेत. ना मायबाप सरकार काही करत, ना निसर्गाची साथ अशा कात्रीत या गावांतील शेतकरीवर्ग सापडला आहे. कर्ज काढून विहिरींची खोदकामे शेतकरी करीत आहे. परंतु भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली असल्यामुळे खडकाशी झुंज देऊनही पाणी मिळत नाही. शेतमाल पाण्याअभावी अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र जागोजागी पाहावयास मिळत आहे.न्याय कोणाकडे मागावा..?या वर्षी शेतकऱ्यांना कांद्याने रडवले. या पिकाचा उत्पादन खर्चदेखील वसूल होत नाही. नीचांकी दराची पातळी कांद्याने गाठली आहे. उन्हाळी हंगामातील पिकांवर सर्व अर्थकारण सावरले असते. परंतु पाण्याने धोका दिल्यामुळे या गावांतील शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला असल्याचे चित्र आहे. पूर्वीचा बागायत गावाचा शिक्का असल्यामुळे महसूल विभागाच्या पैसेवारींच्या गणितामुळे ही गावे दुष्काळग्रस्त गावांमध्ये मोडत नाहीत. परंतु सध्या दुष्काळाचा सामना करीत असलेल्या या गावांतील शेतकऱ्यांना न्याय कोणाकडे मागावा अशी अडचण निर्माण झाली आहे.पाण्याअभावी काही शेतकऱ्यांनी जमिनी पडीक ठेवल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी धडपड करून उन्हाळी टोमॅटो घेतले. परंतु त्यांना सिजेंटा कंपनीच्या सदोष बियाणांनी धोका दिला. या गावांतील शेतकऱ्यांनी विघ्नहरने अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना दुष्काळी परिस्थितीतून सावरण्यासाठी साकडे घातले आहे. शिरोली बुद्रुक कृषक सेवा या दहा गावांच्या सोसायटीच्या माध्यमातून विघ्नहरने अध्यक्ष तथा या सोसायटीचे अध्यक्ष सत्यशील शेरकर या गावांतील शेतकऱ्यांसाठी दुष्काळात देवदूताची भूमिका बजावत आहेत.