शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शिरोली परिसरात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: May 18, 2016 01:21 IST

अधिक भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ या वर्षीच्या दुष्काळात शिरोली बुद्रुक आणि परिसरातील शेतकरीवर्गावर आली

ओझर : १९७२मध्ये पडलेल्या दुष्काळात जेवढी भयानक स्थिती नव्हती त्यापेक्षा अधिक भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ या वर्षीच्या दुष्काळात शिरोली बुद्रुक आणि परिसरातील शेतकरीवर्गावर आली आहे. पाण्यासाठी विहिरींची खोदकामे करून खडकाशी झुंज या परिसरातील शेतकरीवर्ग देत आहेत.शिरोली बुद्रुक गावाचा पश्चिम भाग शिरोली खुर्द, कुमशेत, महाबरेवाडी, गोळेगाव, अलदरे, पिंपळगाव सिद्धनाथ ही कुकडी नदीच्या काठवरची गावे आहेत. या नदीवर असलेल्या माणिकडोह धरणात जेमतेम फक्त पिण्यासाठीचा पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असताना रब्बी हंगामातच सर्व धरण मोकळे केले. वर्षानुवर्षे तालुक्यात बागायत गावे म्हणून ओळख असलेली ही गावे गेली तीन महिने पाणीटंचाईचा सामना करत आहेत. या गावांसाठी कुकडी नदीवर असणारे तीन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तीन महिन्यांपूर्वी कोरडे पडले आहेत. ना मायबाप सरकार काही करत, ना निसर्गाची साथ अशा कात्रीत या गावांतील शेतकरीवर्ग सापडला आहे. कर्ज काढून विहिरींची खोदकामे शेतकरी करीत आहे. परंतु भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली असल्यामुळे खडकाशी झुंज देऊनही पाणी मिळत नाही. शेतमाल पाण्याअभावी अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र जागोजागी पाहावयास मिळत आहे.न्याय कोणाकडे मागावा..?या वर्षी शेतकऱ्यांना कांद्याने रडवले. या पिकाचा उत्पादन खर्चदेखील वसूल होत नाही. नीचांकी दराची पातळी कांद्याने गाठली आहे. उन्हाळी हंगामातील पिकांवर सर्व अर्थकारण सावरले असते. परंतु पाण्याने धोका दिल्यामुळे या गावांतील शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला असल्याचे चित्र आहे. पूर्वीचा बागायत गावाचा शिक्का असल्यामुळे महसूल विभागाच्या पैसेवारींच्या गणितामुळे ही गावे दुष्काळग्रस्त गावांमध्ये मोडत नाहीत. परंतु सध्या दुष्काळाचा सामना करीत असलेल्या या गावांतील शेतकऱ्यांना न्याय कोणाकडे मागावा अशी अडचण निर्माण झाली आहे.पाण्याअभावी काही शेतकऱ्यांनी जमिनी पडीक ठेवल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी धडपड करून उन्हाळी टोमॅटो घेतले. परंतु त्यांना सिजेंटा कंपनीच्या सदोष बियाणांनी धोका दिला. या गावांतील शेतकऱ्यांनी विघ्नहरने अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना दुष्काळी परिस्थितीतून सावरण्यासाठी साकडे घातले आहे. शिरोली बुद्रुक कृषक सेवा या दहा गावांच्या सोसायटीच्या माध्यमातून विघ्नहरने अध्यक्ष तथा या सोसायटीचे अध्यक्ष सत्यशील शेरकर या गावांतील शेतकऱ्यांसाठी दुष्काळात देवदूताची भूमिका बजावत आहेत.