शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: May 12, 2014 03:40 IST

उन्हाचा पारा चढू लागताच वाडा येथील आदिवासींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तब्बल पाच बारमाही नद्या वाहत असतानादेखील पाणीटंचाईचे दुष्टचक्र संपण्याची चिन्हे नाहीत.

सात गावांना झळ : पाच बारमाही नद्या असूनही पाण्यासाठी वणवण

वाडा : उन्हाचा पारा जसजसा वाढू लागला आहे, तसतसे तालुक्यातील अनेक गावपाड्यांमध्ये आदिवासींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तब्बल पाच बारमाही नद्या वाहत असतानादेखील शासकीय अनास्थेमुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तालुक्यातून पिंजाळ, देहर्जे, गारगाई, तानसा, वैतरणा अशा पाच बारमाही वाहणार्‍या नद्यांची देणगी निसर्गाने दिली आहे. शासकीय अनास्थेमुळे व लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे येथील गावपाड्यांतील आदिवासींच्या घशाला २५ वर्षांपासून कोरड पडली आहे. तालुक्यातील उज्जैनी, गावठण, आंबेवाडी, साखरशेत, टोकरेपाडा, दिवेपाडा, सागमाळ या गावपाड्यांतील आदिवासींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. दुसरीकडे निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून या भागातील आदिवासींना पाण्याचे टँकर पुरवण्याबाबत शासन दिरंगाई करीत आहे. प्रशासनाने आजपर्यंत या भागात पाणीटंचाई रोखण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्प, पाणीपुरवठ्यांच्या विविध योजना, लहान-मोठे बंधारे बोअरवेल, सिंचन तलाव, विहिरी यासाठी करोडो रुपयांचा चुराडा केला आहे. मात्र, कागदोपत्री घोडे नाचवून विहिरी व खडकांवर पोखरलेल्या कोरड्या बोअरवेल याव्यतिरिक्त काही हाती आलेले नाही. गांध्रे येथे वैतरणा नदीवर मोठा बंधारा बांधून एका धनाढ्य कंपनी कवडीमोल दराने लाखो लीटर पाणी दररोज दिवसरात्र उपसते. या बंधार्‍यातून थेंबभर पाण्याचीही गळती होत नाही व कंपनीला कधीही पाणीटंचाई जाणवत नाही. मात्र, गोरगरीब जनतेला मार्चपासून पाण्यासाठी पायपीट करावी लागते. तहानेने व्याकूळ होऊन कंपनीने तयार केलेले मिनरल वॉटर विकत घेऊन प्यावे लागते, हे तालुक्यातील भूमिपुत्रांचे दुर्दैव आहे. टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी कार्यालयांचे खेटे घालत आहे. मंजुरीच्या प्रतीक्षेत च्अनेक गावांतील महिलांना पहाटेपासूनच पाण्याच्या शोधात निघावे लागते. अनेक गावपाड्यांतील विहिरींनी तळ गाठल्याचे ५ किमी दूर नदीवर पायपीट करावी लागत आहे. च्महिनाभर उशिराने तेही अनियमित पाणीपुरवठा करणारे टँकर येथील आदिवासींच्या वाट्याला आल्याची खंत येथील महिला व्यक्त करीत आहेत. वाडा तालुक्यात ७२ बोअरवेल मंजूर आहेत. मात्र, त्या प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात वाडा पंचायतीचे पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता के.बी. चिवरे म्हणाले, ७२ बोअरवेल मंजूर आहेत. मात्र, त्यांना प्रशासकीय मंजुरी नाही. शिवाय, टँकरसाठीचा प्रस्ताव पाठविला असून यावर लवकरच तोडगा निघेल, असे चिवरे यांनी सांगितले.