शहरं
Join us  
Trending Stories
1
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
2
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
3
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
4
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकूण काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
5
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
6
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
7
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
8
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
9
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
10
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
11
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
12
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
13
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
14
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
15
₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
17
जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!
18
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
19
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
20
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण

वरसावे पुलावर अवजड वाहने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 03:44 IST

तिसऱ्यांदा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वरसावे पुलाला चिरीमिरीचा धोका निर्माण झाला आहे.

राजू काळे,

भार्इंदर- गेल्या २४ वर्षांत दोनवेळा दुरुस्ती झालेल्या आणि त्यानंतरही धोकादायक ठरल्याने तिसऱ्यांदा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वरसावे पुलाला चिरीमिरीचा धोका निर्माण झाला आहे. या पुलावरून हलक्या वाहनांनाच प्रवेश देण्यात आला असला, तसे फलक लावले असले; तरी वाहतूक पोलिसांच्या डोळ््यादेखत तेथून अवजड वाहनांची वाहतूक बिनदिक्कत सुरू आहे. काळोखाचा फायदा घेत या पुलावरून ही वाहने सोडली जात असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमुळे उघड झाले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मात्र असे काही सुरू असल्याबद्दल कानावर हात ठेवले आहेत. गुजरातला जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठवरील ४३ वर्षेे जुन्या वरसावे पुलाला धोका निर्माण झालेला असतानाही त्यावरून बिनदिक्कत वाहतूक सुरू असल्याने तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती आहे. बांधकाम क्षेत्रातील उच्चस्तरीय तज्ज्ञांकडून सध्या त्या पुलाची तपासणी सुरू आहे. त्यांच्या सल्ल्यानुसारच त्याची दुरूस्ती होईल. त्या काळात त्यावरील वाहतुक पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. सध्या या पुलावरुन फक्त हलक्या वाहनांना प्रवेश देण्याचे सक्त आदेश आहेत. तसेच वाहतुकीच्या वेगावरही नियंत्रण आणण्यात आले असून तो ताशी २० किमी इतका कमी करण्यात आला आहे. अवजड व दोनपेक्षा अधिक एक्सेलच्या वाहनांना माजिवडा जंक्शन- चिंचोटीमार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वर जाण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी ९ सप्टेंबरला दिले आहेत. बांधकामतज्ज्ञांनी अद्याप या पुलाच्या दुरुस्तीच्या सूचना एनएचएआयला दिल्या नसल्याने तेथून फक्त हलक्या वाहनांची वाहतुक सुरु आहे. परंतु, तिन्हीसांजेनंतर काळोखाचा फायदा उठवत वाहतूक शाखेच्या डोळ््यादेखत या पुलावरुन अवजड वाहतूक सुरू आहे. ही वाहने घोडबंदर गावात जाणाऱ्या रस्त्यावर तसेच आसपास रस्त्याकडेला थांबवली जातात. पुलावरुन जाण्यासाठी काळोख पडण्याची वाट पाहिली जाते. तो पडून लागला, की त्वरित एकामागोमाग एक अवजड वाहने पुलावरुन गुजरातच्या दिशेला सोडली जातात. चिरीमिरी घेतल्याशिवाय वाहने या पुलावरून जाणे शक्यच नाही, असा स्थानिकांचा आरोप आहे. अन्यथा वाहतूक शाखेच्या डोळ्यादेखत अवजड वाहने कशी जाऊ शकतात, असा त्यांचा प्रश्न आहे. >२४ वर्षांत दुरूस्तीची तिसरी मोहीमअगोदरच कमकुवत झालेल्या पुलाच्या दुरुस्तीसाठी २०१३-१४ मध्ये हा पूल तब्बल दीड वर्षे बंद ठेवण्यात आला होता. तत्पूर्वी १९९२ मध्ये तो दुरुस्तीसाठी दोन महिने बंद ठेवण्यात आला होता. १९७३ मध्ये बांधण्यात आलेला हा पुल अवघ्या १९ वर्षातच दुरूस्तीसाठी बंद राहू लागल्याने त्वाहापासूनच त्याच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या पुलासाठी गेल्या २४ वर्षांतील ही तिसरी दुरुस्तीची मोहीम आहे. या पुलाच्या दोन्ही बाजुंचे कठडे जीर्ण झाले आहेत. गर्डरमधील काही ठिकाणचे सांधे कमकुवत झाले आहेत. त्यामुळेच त्यावरून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पण काळोखाचा फायदा घेत ती बिनदिक्कत सुरू आहे. हलक्याच वाहनांना प्रवेशएनएचएआयचे प्रभारी व्यवस्थापक दिनेश अग्रवाल म्हणाले, तज्ज्ञांकडून पुलाची पाहणी होईल. त्यांच्या सूचनांनुसारच पुलाची दुरुस्ती हाती घेण्यात येईल. तूर्तास या पुलावरून केवळ हलक्या वाहनांची वाहतूक तीही नियंत्रित वेगात सुरु आहे.