शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पावसाची जोरदार हजेरी

By admin | Updated: September 19, 2016 01:31 IST

मावळासह कामशेत शहरात पावसाची संततधार सुरूअसून, शुक्रवारी व शनिवारी पावसाचा जोर वाढला होता.

कामशेत : मावळासह कामशेत शहरात पावसाची संततधार सुरूअसून, शुक्रवारी व शनिवारी पावसाचा जोर वाढला होता. जोरदार पडणाऱ्या या पावसामुळे मावळ परिसरातील शेतकरी सुखावला आहे. तसेच, या वेळी नाणे मावळातील वडिवळे धरणातून सात तास पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे कुंडलिका व इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढली आहे.मागील अनेक दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने मावळातील भातपीक संकटात आले होते. पावसाअभावी भातपीक सुकण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे भातपिकाला पाण्याची आवश्यकता होती. शुक्रवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने मावळातील भात पिकावरील संकट टळले. भातपीक अनेक रोगांपासून वाचण्यासाठी या पावसाचा फायदाच झाला आहे. तसेच डोंगरावरील चाराही सुकत चालला होता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. या पावसाने चाऱ्याला फुटवे येऊन जनावरांसाठी चांगला चारा तयार होईल. नाणे मावळातील वडिवळे धरण परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. गुरुवार पासून पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे धरण प्रशासनाने भोंगा वाजवून नदीकिनारी असणाऱ्या भाजगाव, उकसान, सोमवडी, कोळवाडी, उंबरवाडी, वळवंती, गोवित्री, करंजगाव आदी गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. शनिवारी (दि. १७) सातपासून ते रविवारी रात्री उशिरा २ वाजेपर्यंत २७२९ क्युसेक पाणी सोडण्यात आले होते, अशी माहिती धरण प्रशासनाने दिली. धरणातून पाणी सोडल्यामुळे कुंडलिका व इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढली होती. सांगिसे पुलाला नदीचे पाणी लागले होते. मागील १५ दिवसांपासून पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे अनेक भागातील भातपिके धोक्यात आली होती. पण शुक्रवारपासून पडत असलेला पाऊस लाभदायक ठरणार आहे. हा पाऊस आठ दिवस उशिरा झाल्याने उत्पादनात ५ ते १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे कृषी अधिकारी विनायक कोथिंबिरे यांनी सांगितले.(वार्ताहर)तळेगाव : आठवडा बाजारात धांदलतळेगाव दाभाडे : तळेगावममध्ये रविवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. तसेच पावसामुळे थंडी तापाच्या रुग्णामध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यामध्ये रुग्णाची गर्दी दिसत आहे. आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले. तसेच दिवसभर कोणीही फिरकले नसल्याने शेतकऱ्यांना माल पर न्यावा लागला. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.