शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

मुसळधार पावसात रस्ते गेले वाहून

By admin | Updated: September 22, 2016 02:42 IST

अनंत चतुर्दशीपासून मुसळधार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा खड्ड्यात गेली आहे.

मुंबई : अनंत चतुर्दशीपासून मुसळधार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा खड्ड्यात गेली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये रोष वाढत असल्याने आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलेले नगरसेवक धास्तावले आहेत. किमान निवडणुकीपूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याचे साकडे त्यांनी प्रशासनाला घातले आहे. मात्र पावसाला दोष देत प्रशासनानेही हात वर केल्याने नगरसेवक हवालदिल झाले आहेत.मुंबई खड्डेमुक्त करण्याचे वचन पालिका पूर्ण करू न शकल्याने गणरायाचे आगमन खड्ड्यातून झाले. विसर्जनापूर्वी मुंबईत सर्व खड्डे भरले जातील, हा शब्दही प्रशासनाने पाळला नाही. त्यातच अनंत चतुर्दशीपासून मुंबईत सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मुंबई खड्ड्यात गेली आहे. बुजवलेल्या खड्ड्यांमधील मालही पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढली असून अपघाताचा धोकादेखील वाढला आहे. याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी उमटले. नागरिकांची गैरसोय होत आहे. मुंबईकरांमध्ये नाराजी वाढत आहे. मात्र तक्रार करूनही पालिका दखल घेत नाही. जनतेला मूर्ख बनविण्याचे काम पालिका करीत आहे, अशी नाराजी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी ज्या ठिकाणी खड्डे भरले होते, तेथेच पुन्हा खड्डे पडले आहेत. तरीही पालिकेला यावर अद्याप रामबाण उपाय सापडलेला नाही, असा संताप समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)>विरोधकांचा सभात्यागनगरसेवकांनी खड्ड्यांच्या तक्रारी करीत लवकरात लवकर खड्डे भरण्याची मागणी लावून धरली. मात्र खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. पण पावसापुढे नाइलाज होतोय, अशी सबब देत प्रशासनाने आपला बचाव केला. खड्डे भरण्याच्या कामात पाऊस व्यत्यय आणत आहे, असा बचाव अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी केला. प्रशासनाच्या या उत्तरामुळे नाराज पक्षांनी सभात्याग केला.