शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
3
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
4
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
5
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
6
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
7
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
8
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
9
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
10
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
11
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
12
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
13
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
14
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
15
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
16
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

मुसळधार पावसात रस्ते गेले वाहून

By admin | Updated: September 22, 2016 02:42 IST

अनंत चतुर्दशीपासून मुसळधार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा खड्ड्यात गेली आहे.

मुंबई : अनंत चतुर्दशीपासून मुसळधार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा खड्ड्यात गेली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये रोष वाढत असल्याने आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलेले नगरसेवक धास्तावले आहेत. किमान निवडणुकीपूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याचे साकडे त्यांनी प्रशासनाला घातले आहे. मात्र पावसाला दोष देत प्रशासनानेही हात वर केल्याने नगरसेवक हवालदिल झाले आहेत.मुंबई खड्डेमुक्त करण्याचे वचन पालिका पूर्ण करू न शकल्याने गणरायाचे आगमन खड्ड्यातून झाले. विसर्जनापूर्वी मुंबईत सर्व खड्डे भरले जातील, हा शब्दही प्रशासनाने पाळला नाही. त्यातच अनंत चतुर्दशीपासून मुंबईत सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मुंबई खड्ड्यात गेली आहे. बुजवलेल्या खड्ड्यांमधील मालही पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढली असून अपघाताचा धोकादेखील वाढला आहे. याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी उमटले. नागरिकांची गैरसोय होत आहे. मुंबईकरांमध्ये नाराजी वाढत आहे. मात्र तक्रार करूनही पालिका दखल घेत नाही. जनतेला मूर्ख बनविण्याचे काम पालिका करीत आहे, अशी नाराजी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी ज्या ठिकाणी खड्डे भरले होते, तेथेच पुन्हा खड्डे पडले आहेत. तरीही पालिकेला यावर अद्याप रामबाण उपाय सापडलेला नाही, असा संताप समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)>विरोधकांचा सभात्यागनगरसेवकांनी खड्ड्यांच्या तक्रारी करीत लवकरात लवकर खड्डे भरण्याची मागणी लावून धरली. मात्र खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. पण पावसापुढे नाइलाज होतोय, अशी सबब देत प्रशासनाने आपला बचाव केला. खड्डे भरण्याच्या कामात पाऊस व्यत्यय आणत आहे, असा बचाव अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी केला. प्रशासनाच्या या उत्तरामुळे नाराज पक्षांनी सभात्याग केला.