शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

मुसळधार पावसात रस्ते गेले वाहून

By admin | Updated: September 22, 2016 02:42 IST

अनंत चतुर्दशीपासून मुसळधार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा खड्ड्यात गेली आहे.

मुंबई : अनंत चतुर्दशीपासून मुसळधार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा खड्ड्यात गेली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये रोष वाढत असल्याने आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलेले नगरसेवक धास्तावले आहेत. किमान निवडणुकीपूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याचे साकडे त्यांनी प्रशासनाला घातले आहे. मात्र पावसाला दोष देत प्रशासनानेही हात वर केल्याने नगरसेवक हवालदिल झाले आहेत.मुंबई खड्डेमुक्त करण्याचे वचन पालिका पूर्ण करू न शकल्याने गणरायाचे आगमन खड्ड्यातून झाले. विसर्जनापूर्वी मुंबईत सर्व खड्डे भरले जातील, हा शब्दही प्रशासनाने पाळला नाही. त्यातच अनंत चतुर्दशीपासून मुंबईत सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मुंबई खड्ड्यात गेली आहे. बुजवलेल्या खड्ड्यांमधील मालही पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढली असून अपघाताचा धोकादेखील वाढला आहे. याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी उमटले. नागरिकांची गैरसोय होत आहे. मुंबईकरांमध्ये नाराजी वाढत आहे. मात्र तक्रार करूनही पालिका दखल घेत नाही. जनतेला मूर्ख बनविण्याचे काम पालिका करीत आहे, अशी नाराजी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी ज्या ठिकाणी खड्डे भरले होते, तेथेच पुन्हा खड्डे पडले आहेत. तरीही पालिकेला यावर अद्याप रामबाण उपाय सापडलेला नाही, असा संताप समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)>विरोधकांचा सभात्यागनगरसेवकांनी खड्ड्यांच्या तक्रारी करीत लवकरात लवकर खड्डे भरण्याची मागणी लावून धरली. मात्र खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. पण पावसापुढे नाइलाज होतोय, अशी सबब देत प्रशासनाने आपला बचाव केला. खड्डे भरण्याच्या कामात पाऊस व्यत्यय आणत आहे, असा बचाव अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी केला. प्रशासनाच्या या उत्तरामुळे नाराज पक्षांनी सभात्याग केला.