शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसह राज्यभरात पावसाची दमदार हजेरी

By admin | Updated: July 28, 2014 11:24 IST

मुंबईसह ठाणे, कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा विविध भागात सोमवारी पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्यानेही मुंबईत येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २८ - मुंबईसह ठाणे, कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा विविध भागात सोमवारी पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील पालघर येथील पुल पाण्याखाली गेल्याने २५ गावांचा संपर्क तुटला आहे. हवामान खात्यानेही मुंबईत येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. 
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपासून पुन्हा कृपादृष्टी दाखवली आहे. मुंबई, मुंबई उपनगरासह ठाणे, कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. लोकल गाड्याही काहीशा विलंबानेच धावत असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. तर विदर्भात मुसळधार पावसामुळे अप्परवर्धा धरणाचे दरवाजे उघडावे लागले.  
डहाणू - पालघर भागात पावसामुळे २५ गावांशी संपर्क तुटला आहे. पालघरमधील सुर्या नदीवरील मासवण पुल पाण्याखाली गेल्याने २५ गावांशी संपर्क तुटला आहे. मरोठ मार्गावरील वाहतूकही ठप्प पडली आहे.