शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

धरणक्षेत्रात पावसाची दमदार हजेरी

By admin | Updated: August 3, 2016 00:56 IST

गेली दोन दिवसांपासून जिल्ह्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला असून, धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावली आहे.

 

पुुणे : गेली दोन दिवसांपासून जिल्ह्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला असून, धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावली आहे. १५ दिवसांपूर्वी ५0 ते ६0 टक्क्यांवर आलेली धरणे दोन दिवसांत २0 टक्क्यांपर्यंत भरली असून, वेल्हेतील गुंजवणी धरण १00 टक्के भरून वाहू लागले आहे. चासकमान धरण ८0 टक्क्यांवर गेले असून, येडगाव, वडज ही धरणेही ९0 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहेत. नीरा देवघर ६६.८१ टक्के, तर भाटघर धरण ६४.७९ टक्के भरले आहे. खडकवासला धरण साखळीत १ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. पावसाचा जोर असाच राहिला, तर या महिन्यातच धरणं भरून वाहू लागतील.>मार्गासनी : दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधारेमुळे ४८ तासांत वेल्ह्यामध्ये १६७ मिमी पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गुंजवणी धरण १०० टक्के भरले असल्याची माहिती गुंजवणी प्राधिकरण प्रकल्पाचे अभियंता बी. आर. पवार यांनी दिली. वेल्ह्याच्या तहसीलदार डॉ. वनश्री लाभले लाभशेटवार यांनी पोलीस यंत्रणा व प्रत्येक विभागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. याबाबत अभियंता पवार अधिका माहिती देताना म्हणाले, की गुंजवणी धरणातील पाणी साठवण क्षमता ३.७० टीएमसी एवढी आहे. आतापर्यंत झालेल्या बांधकामाच्या १०० टक्के पाणीसाठा धरणामध्ये झाला आहे. आज सकाळपर्यंत पाणी सांडव्याला लागले होते, तर दुपारी पावसाचा जोर धरणक्षेत्रामध्ये वाढल्याने दुपारनंतर पाणी धरणाच्या सांडव्यावरून वाहू लागले आहे. आजपर्यंत गुंजवणी धरणात २.२० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गुंजवणी धरणाच्या सांडव्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, पाण्याची पातळी वाढत असल्याने तहसीलदार डॉ. वनश्री लाभशेटवार यांनी पोलीस यंत्रणा व सर्व विभागप्रमुखांना नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्यासाठी कळविण्याकामी सूचित करण्याचे आदेश दिले आहेत व त्याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. गुंजवणी धरण जरी १०० टक्के भरले असले, तरी गुंजवणीमधील धरणग्रस्तांचे १०० टक्के पुनर्वसन झाले नसल्याने धरणग्रस्तांचे पुनर्वसन लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी गुंजवणी धरणग्रस्त करीत आहेत. (वार्ताहर)>तालुक्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शेवटच्या टप्प्यात आलेल्या लावण्या पावसाअभावी रखडल्या होत्या. तर, डोंगराजवळील व पाण्याच्या कमतरतेअभावी लावणी झालेल्या भातखाचरांमध्ये पाणी कमी पडू लागले होते; परंतु गेल्या दोन दिवसांत वेल्हे तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या पावसामुळे भातशेती बेणणीला व खते टाकण्याची शेतकऱ्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे. तर, धरण १०० टक्के भरले आहे.