शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

धरणक्षेत्रात पावसाची दमदार हजेरी

By admin | Updated: August 3, 2016 00:56 IST

गेली दोन दिवसांपासून जिल्ह्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला असून, धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावली आहे.

 

पुुणे : गेली दोन दिवसांपासून जिल्ह्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला असून, धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावली आहे. १५ दिवसांपूर्वी ५0 ते ६0 टक्क्यांवर आलेली धरणे दोन दिवसांत २0 टक्क्यांपर्यंत भरली असून, वेल्हेतील गुंजवणी धरण १00 टक्के भरून वाहू लागले आहे. चासकमान धरण ८0 टक्क्यांवर गेले असून, येडगाव, वडज ही धरणेही ९0 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहेत. नीरा देवघर ६६.८१ टक्के, तर भाटघर धरण ६४.७९ टक्के भरले आहे. खडकवासला धरण साखळीत १ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. पावसाचा जोर असाच राहिला, तर या महिन्यातच धरणं भरून वाहू लागतील.>मार्गासनी : दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधारेमुळे ४८ तासांत वेल्ह्यामध्ये १६७ मिमी पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गुंजवणी धरण १०० टक्के भरले असल्याची माहिती गुंजवणी प्राधिकरण प्रकल्पाचे अभियंता बी. आर. पवार यांनी दिली. वेल्ह्याच्या तहसीलदार डॉ. वनश्री लाभले लाभशेटवार यांनी पोलीस यंत्रणा व प्रत्येक विभागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. याबाबत अभियंता पवार अधिका माहिती देताना म्हणाले, की गुंजवणी धरणातील पाणी साठवण क्षमता ३.७० टीएमसी एवढी आहे. आतापर्यंत झालेल्या बांधकामाच्या १०० टक्के पाणीसाठा धरणामध्ये झाला आहे. आज सकाळपर्यंत पाणी सांडव्याला लागले होते, तर दुपारी पावसाचा जोर धरणक्षेत्रामध्ये वाढल्याने दुपारनंतर पाणी धरणाच्या सांडव्यावरून वाहू लागले आहे. आजपर्यंत गुंजवणी धरणात २.२० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गुंजवणी धरणाच्या सांडव्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, पाण्याची पातळी वाढत असल्याने तहसीलदार डॉ. वनश्री लाभशेटवार यांनी पोलीस यंत्रणा व सर्व विभागप्रमुखांना नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्यासाठी कळविण्याकामी सूचित करण्याचे आदेश दिले आहेत व त्याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. गुंजवणी धरण जरी १०० टक्के भरले असले, तरी गुंजवणीमधील धरणग्रस्तांचे १०० टक्के पुनर्वसन झाले नसल्याने धरणग्रस्तांचे पुनर्वसन लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी गुंजवणी धरणग्रस्त करीत आहेत. (वार्ताहर)>तालुक्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शेवटच्या टप्प्यात आलेल्या लावण्या पावसाअभावी रखडल्या होत्या. तर, डोंगराजवळील व पाण्याच्या कमतरतेअभावी लावणी झालेल्या भातखाचरांमध्ये पाणी कमी पडू लागले होते; परंतु गेल्या दोन दिवसांत वेल्हे तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या पावसामुळे भातशेती बेणणीला व खते टाकण्याची शेतकऱ्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे. तर, धरण १०० टक्के भरले आहे.