शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

हृदयदावक! बळीराजानं औताला जुंपलं नातू आणि मुलाला

By admin | Updated: June 25, 2017 07:16 IST

शेतकामासाठी बैजजोडी नसल्याने एका शेतक-यावर स्वत:च्या मुलाला आणि नातवाला औताला जुंपण्याची वेळ आल्याची

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 25 - राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावल्यानंतर बळीराजाने शेतीच्या मशागतीचं काम सुरु केलं आहे. शेतकामासाठी बैजजोडी नसल्याने जळगावात एका शेतक-यावर स्वत:च्या मुलाला आणि नातवाला औताला जुंपण्याची वेळ आल्याची धक्कादायक आणि हृदयदावक घटना समोर आली आहे. गरीबीमुळे बैलजोडी खरेदी करणे आणि पाळणे त्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे शेत जमिनीच्या मशागतीची कामं त्यांचा मुलगा आणि नातू करत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने अनेकांचे काळीज पिळवटळे आहे. त्यामुळे सरकारनं काल कर्जमाफी केली असली तरी त्यातून शेतकऱ्यांचा प्रश्न खरचं सुटला का असा प्रश्न उभा राहतोय. जळगावजिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील निंभोरा गावातील हिरामण पाटील या वयोवृद्ध शेतकऱ्यावर आपल्या नातवाला आणि मुलाला औताला जुंपण्याची वेळ आली आहे. या तिघांचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरामण पाटील या वयोवृद्ध शेतकऱ्याकडे वडिलोपार्जित असलेल्या दीड एकर शेती आहे. त्यांनी यावर्षी कापसाची लागवड केली आहे. मात्र अल्पभूधारक खातेदार असल्याने त्यांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नाही. परिणामी मशागतीसाठी लागणारी बैलजोडी पाळणे त्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे हिरामण स्वतःच्या काळजावर दगड ठेवून बैलांऐवजी मुलगा आणि नातवंडाला औताला जुंपून शेतीच्या मशागतीची कामे करत आहेत. एवढेच नव्हे तर इतर शेतकऱ्यांकडे मोलमजुरी करून पाटील कुटुंब घरची शेती कसतात.दरम्यान, कर्जाला आणि सततच्या नापिकीला कंटाळून अनेक शेतकरी सध्या आत्महत्येचा मार्ग स्वीकारताना दिसत आहे. परंतू असे असताना पाटील मात्र जगण्यासाठी शेतीत घाम गाळत आहे. त्यांची ही बाब कौतुकास्पद असल्याने त्याची नोंद ठेवणे गरजेचे आहे.