शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पाणीप्रश्नामुळे हृदयविकाराचा झटका

By admin | Updated: April 21, 2016 02:25 IST

पेंडसेनगरातील ‘विजयस्मृती सोसायटी’मधील एका विंगमध्ये पुरेसा पाणीपुरवठा न झाल्याने काही उच्चभ्रू सभासदांनी सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद चिवलकर यांना रात्री घरी जाऊन जाब विचारल्याने

डोंबिवली : पेंडसेनगरातील ‘विजयस्मृती सोसायटी’मधील एका विंगमध्ये पुरेसा पाणीपुरवठा न झाल्याने काही उच्चभ्रू सभासदांनी सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद चिवलकर यांना रात्री घरी जाऊन जाब विचारल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. चिवलकर यांच्यावर खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. पाणीटंचाईमुळे सुशिक्षितांच्या या सांस्कृतिकनगरीत कसे संघर्षाचे प्रसंग उभे राहू लागले आहेत, त्याचे हे हिमनगाचे टोक आहे.भीषण पाणीकपातीमुळे सध्या डोंबिवलीत सगळीकडे टंचाई आहे. पेंडसेनगरात अन्य काही विभागांच्या तुलनेत बरी परिस्थिती असली तरी सोसायटीच्या एकाच विंगला पाणी आले नाही. त्यामुळे काही सभासद रात्रीच्यावेळी सोसायटी अध्यक्ष चिवलकर यांना जाब विचारायला गेले. त्याचा धसका चिवलकर यांनी घेतला व त्यांनाहृदयविकाराचा झटका आला. चिवलकरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून २१ एप्रिल रोजी त्यांच्यावर तातडीने बायपास शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शहराच्या पूर्व भागातील पेंडसेनगरातील विजयस्मृती सोसायटीत जवळपास २५० सदनिका आहेत. सात विंग आहेत. सोसायटीचे अध्यक्ष चिवलकर हे नोकरीतून निवृत्त झाले आहेत. त्यांचे वय ५५ वर्षे आहे. चिवलकर हे सौम्य प्रकृतीचे गृहस्थ असून एकाच विंगला कमी दाबाने पाणी आले, त्याचा चढ्या आवाजात व तिखट भाषेत जाब विचारण्यात आल्याने तेअस्वस्थ झाले. अशी दमदाटीची भाषा ऐकण्याची सवय नसल्याने चिवलकर यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना त्यांचा मुलगा व पत्नीने तातडीने डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या केल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे चिवलकर यांच्या मुलाने पुढील उपचारासाठी वडिलांना मुलुंडच्या एका बड्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. चिवलकर यांच्यावरील शस्त्रक्रियेचा लाखो रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रकरणी चिवलकर यांचा मुलगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे.सकाळी व सायंकाळी कष्टाचा लोकल प्रवास करून घरी परतलेल्या डोंबिवलीकराला पाणी न आल्याची भुणभुण ऐकायला मिळाली की, त्याचे माथे भडकते. त्यामुळे पाणीटंचाईने अनेक घरांत व पर्यायाने सोसायट्यांमध्ये संघर्षाचे सुरुंग पेरण्यास सुरुवात केली आहे. पुढील किमान दोन महिने या टंचाईला तोंड द्यायचे असल्याने या शहरातील सफेद कॉलर मंडळी एकमेकांची कॉलर पकडून मारामाऱ्या करण्याची वेळ येणार नाही, याची खबरदारी पालिका व पोलीस प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. या सगळ्या प्रकाराची कल्याण-डोंबिवली महापालिकेने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. पाणीगळती, चोरी व नादुरुस्त पाइपलाइन यामुळे वाया जाणारे पाणी जर महापालिकेने वाचवले तरी सोसायट्यांमधील असे समरप्रसंग टळतील, अशी भावना स्थानिक रहिवासी व लोकप्रतिनिधी व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)