शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्नामुळे हृदयविकाराचा झटका

By admin | Updated: April 21, 2016 02:25 IST

पेंडसेनगरातील ‘विजयस्मृती सोसायटी’मधील एका विंगमध्ये पुरेसा पाणीपुरवठा न झाल्याने काही उच्चभ्रू सभासदांनी सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद चिवलकर यांना रात्री घरी जाऊन जाब विचारल्याने

डोंबिवली : पेंडसेनगरातील ‘विजयस्मृती सोसायटी’मधील एका विंगमध्ये पुरेसा पाणीपुरवठा न झाल्याने काही उच्चभ्रू सभासदांनी सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद चिवलकर यांना रात्री घरी जाऊन जाब विचारल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. चिवलकर यांच्यावर खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. पाणीटंचाईमुळे सुशिक्षितांच्या या सांस्कृतिकनगरीत कसे संघर्षाचे प्रसंग उभे राहू लागले आहेत, त्याचे हे हिमनगाचे टोक आहे.भीषण पाणीकपातीमुळे सध्या डोंबिवलीत सगळीकडे टंचाई आहे. पेंडसेनगरात अन्य काही विभागांच्या तुलनेत बरी परिस्थिती असली तरी सोसायटीच्या एकाच विंगला पाणी आले नाही. त्यामुळे काही सभासद रात्रीच्यावेळी सोसायटी अध्यक्ष चिवलकर यांना जाब विचारायला गेले. त्याचा धसका चिवलकर यांनी घेतला व त्यांनाहृदयविकाराचा झटका आला. चिवलकरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून २१ एप्रिल रोजी त्यांच्यावर तातडीने बायपास शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शहराच्या पूर्व भागातील पेंडसेनगरातील विजयस्मृती सोसायटीत जवळपास २५० सदनिका आहेत. सात विंग आहेत. सोसायटीचे अध्यक्ष चिवलकर हे नोकरीतून निवृत्त झाले आहेत. त्यांचे वय ५५ वर्षे आहे. चिवलकर हे सौम्य प्रकृतीचे गृहस्थ असून एकाच विंगला कमी दाबाने पाणी आले, त्याचा चढ्या आवाजात व तिखट भाषेत जाब विचारण्यात आल्याने तेअस्वस्थ झाले. अशी दमदाटीची भाषा ऐकण्याची सवय नसल्याने चिवलकर यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना त्यांचा मुलगा व पत्नीने तातडीने डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या केल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे चिवलकर यांच्या मुलाने पुढील उपचारासाठी वडिलांना मुलुंडच्या एका बड्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. चिवलकर यांच्यावरील शस्त्रक्रियेचा लाखो रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रकरणी चिवलकर यांचा मुलगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे.सकाळी व सायंकाळी कष्टाचा लोकल प्रवास करून घरी परतलेल्या डोंबिवलीकराला पाणी न आल्याची भुणभुण ऐकायला मिळाली की, त्याचे माथे भडकते. त्यामुळे पाणीटंचाईने अनेक घरांत व पर्यायाने सोसायट्यांमध्ये संघर्षाचे सुरुंग पेरण्यास सुरुवात केली आहे. पुढील किमान दोन महिने या टंचाईला तोंड द्यायचे असल्याने या शहरातील सफेद कॉलर मंडळी एकमेकांची कॉलर पकडून मारामाऱ्या करण्याची वेळ येणार नाही, याची खबरदारी पालिका व पोलीस प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. या सगळ्या प्रकाराची कल्याण-डोंबिवली महापालिकेने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. पाणीगळती, चोरी व नादुरुस्त पाइपलाइन यामुळे वाया जाणारे पाणी जर महापालिकेने वाचवले तरी सोसायट्यांमधील असे समरप्रसंग टळतील, अशी भावना स्थानिक रहिवासी व लोकप्रतिनिधी व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)