शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

११ जणांच्या अपिलावर सुनावणी

By admin | Updated: July 16, 2016 03:13 IST

२००२ बिल्कीस बानू सामुहिक बलात्कारप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या ११ जणांच्या अपिलावरील सुनावणीस शुक्रवारपासून उच्च न्यायालयात सुरुवात झाली.

मुंबई : २००२ बिल्कीस बानू सामुहिक बलात्कारप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या ११ जणांच्या अपिलावरील सुनावणीस शुक्रवारपासून उच्च न्यायालयात सुरुवात झाली. त्याचबरोबर सीबीआयने ११ पैकी तीन जणांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी केलेल्या अपिलावरही सुनावणी घेण्यात येणार आहे.२००२ गोध्रा हत्याकाडांनंतर बिल्कीस बानूवर सामुहिक बलात्कार करून तिच्या कुटुंबातील सात जणांची हत्या केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने २००८ मध्ये ११ जणांना दोषी ठरवले. या ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा रद्द करण्यात यावी, यासाठी या सर्वांनी उच्च न्यायालयात अपील केला. तर सीबीआयने ११ आरोपींपैकी तीन जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. न्या. व्ही. के. ताहिलरमाणी व न्या. मृदूला भाटकर यांच्या खंडपीठापुढे या अपिलांवर सुनावणी होती.सीबीआयचे वकील हितेन वेणेगावकर समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने उच्च न्यायालयाने वेणेगावकर यांनाच धारेवर धरले. बिल्कीस बानूच्या कुटुंबातील सात जणांच्या मृत्यूचे कारण खंडपीठाने विचारल्यावर अ‍ॅड. वेणेगावकर याचे उत्तर देऊ शकले नाहीत. ‘शवविच्छेदन अहवाल गुजराती भाषेत असल्याने आपल्याला ते कारण कळू शकले नाही,’ असे अ‍ॅड. वेणेगावकर यांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने नाराजी व्यक्त करत म्हटले की, तुम्ही (वेणेगावकर) असे कसे म्हणू शकता? केसला सुरुवात करताना तुम्हाला याची माहिती करून घ्यायला हवी होती. आता दोन दिवस सुटी आहे तर केसचा नीट अभ्यास करा आणि मगच केसला सुरुवात करा.सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, २००२ च्या गोध्रा दंगलीनंतर ३ मार्च २००२ रोजी अहमदाबादजवळील राधिकानगर येथे बिल्कीस बानूच्या कुटूंबियांवर हल्ला करण्यात आला. त्यावेळी बिल्कीस पाच महिन्यांची गरोदर होती. अशा अवस्थेत तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. तिच्या कुटूंबातील सहा जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. अहमदाबादमध्ये या खटल्यास सुरुवात झाली. मात्र बिल्कीसने साक्षीदारांवर दबाव आणण्याची आणि सीबीआयने सादर केलेल्या पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते, अशी भीती बिल्कीसने व्यक्त केल्याने सर्वोच्च न्यायालयाने आॅगस्ट २००४ मध्ये हा खटला मुंबई न्यायालयाकडे वर्ग केला.सीबीआयच्या म्हणण्यानुसार, शैलेश भट या आरोपीने बिल्कीसच्या तीन वर्षाच्या मुलाला खेचून त्याची हत्या केली. तर जसवंतभाई नै, गोविंदभाई नै आणि नरेश मोरधिया यांनी बिल्कीसला एका झाडापर्यंत खेचत नेले आणि तिथे तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. तसेच आरोपींनी बिल्कीसच्या अन्य नातेवाईकांनाही मारहाण केली.जसवंतभाई, गोविंधभाई, शैलेश भट, राधेश्याम शहा, बिपीनचंद्र जोशी, केसरभाई वोहानिया, प्रदीप मोरधिया, बाकाभाई वोहानिया, राजुभाई सोनी, मितेश भट आणि रमेश चंदन अशी या ११ आरोपींची नावे आहेत. त्यापैकी जसवंतभाई, गोविंदभाई आणि राधेश्याम शाह यांनी बिल्कीसवर बलात्कार केल्याने त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी सीबीआयने मागणी केली आहे. (प्रतिनिधी)