शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सुना सुना शोकप्रस्ताव.!

By admin | Updated: June 4, 2014 00:56 IST

गोपीनाथ मुंडे यांच्या धक्कादायक अपघाती निधनानंतर मांडला गेलेला शोकप्रस्ताव मात्र कायदेशीर आणि तांत्रिक कचाटय़ात अडकला.

विधान भवनच्या भिंती त्यांच्या घणाघाती भाषणाच्या साक्षीदार होत्या़ माइकना त्यांच्या खुमासदार भाषणांची, किश्श्यांची सवय लागलेली होती़ सभागृहातल्या बाकांनी त्यांच्या भाषणांमुळे स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती़ त्या गोपीनाथ मुंडे यांच्या धक्कादायक अपघाती निधनानंतर मांडला गेलेला शोकप्रस्ताव मात्र कायदेशीर आणि तांत्रिक कचाटय़ात अडकला. त्याहीपेक्षा दुर्दैव म्हणजे सभागृहाचे नेते, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शोकप्रस्ताव मांडत असतानाच विरोधी बाकावरील भाजपा-सेनेचे सदस्य उठून बाहेर गेलेले पाहणो याच सभागृहाच्या नशिबी आले. एकेकाळी हेच सभागृह गाजविणा:या नेत्याचा शोकप्रस्ताव देखील मुका मुकाच राहिला..
 
अतुल कुलकर्णी ल्ल मुंबई
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची बातमी सकाळीच आली होती, मात्र सरकारला अधिकृत सूचना मिळाली नव्हती. त्यामुळे सभागृह सुरू झाल्यानंतर आधी एक तासासाठी तहकूब केले गेले. अध्यक्ष दिलीप वळसे- पाटील यांच्या दालनात बैठक झाली. सभागृहाचे कामकाज आज तहकूब करा, उद्या अंत्ययात्रेसाठी जायचे असल्याने सभागृहाला सुटी द्या आणि परवा शोकप्रस्ताव मांडा, असे विरोधकांचे मत होत़े मात्र तीन दिवस सभागृह कसे बंद ठेवायचे, असा मुद्दा पुढे आला आणि चर्चा सुरू झाली तोच राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी केंद्राने पाठवलेले नोटिफिकेशन घेऊन आले. 
मुंडे यांचे निधन झाल्याची अधिकृत सूचना सभागृहाला मिळालेली होती. अशावेळी शोकप्रस्ताव न मांडता सभागृहाचे कामकाज कसे बंद पाडायचे, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. शोकप्रस्ताव मुख्यमंत्री मांडतील आणि श्रद्धांजली अर्पण करून सभागृहाचे कामकाज तहकूब केले जाईल, असे ठरले. दरम्यान, पुन्हा एकदा विधानसभेचे कामकाज एक तासासाठी तहकूब केले गेले. तिकडे विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकप्रस्ताव वाचण्यास सुरुवात केली होती. तेथे गृहराज्यमंत्री सतेज पाटील निरोप घेऊन गेले आणि परिषदेचे कामकाजही एक तासासाठी तहकूब केले गेले. 
खडसे यांची भूमिका स्पष्ट होती. ते म्हणत होते, जोर्पयत अंत्यसंस्कार होत नाहीत तोर्पयत शोकप्रस्ताव आणू नये. त्यावर गृह खात्याचे नोटिफिकेशन आल्यानंतर असा प्रस्ताव मांडता येतो असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणो होते. आम्ही आमच्या दु:खात आहोत. आपण सभागृह तहकूब करा, अशी मागणी खडसे यांनी केली. गिरीश बापट यांचाही प्रस्ताव मांडण्यास विरोध होता. विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. त्यांना या प्रस्तावावर बोलता येणार नाही, असेही सांगून झाले. आम्ही सभागृह तहकूब करण्यासाठी काय कारण सांगायचे, असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी बापट यांना विचारला. 
अखेर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात शोकप्रस्ताव मांडला. तो मांडत असताना विरोधी बाकावर बसलेले काही सदस्य उठून निघून गेले. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा अध्यक्ष वळसे-पाटील म्हणाले, आता प्रस्ताव मांडून झाला आहे. सेंट्रल हॉलमध्ये सगळ्यांची एकत्रित शोकसभा घ्यायची आहे. तेव्हा आता चर्चा नको, असे सांगितले. ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख काही बोलत असतानाच नारायण राणो म्हणाले, सभागृहात जे बोलले जाईल ते रेकॉर्डवर येते, सेंट्रल हॉलमध्ये झालेली भाषणो रेकॉर्डवर कशी येणार? तर अनिल गोटे यांनी विरोधी पक्ष सभागृहात नसताना कसा काय शोकप्रस्ताव येऊ शकतो, असा मुद्दा उपस्थित केला. 
 
अध्यक्षांनी शोकप्रस्ताव मंजूर करीत श्रद्धांजली अर्पण करून सभागृहाचे कामकाज मंगळवारी दिवसभरासाठी तहकूब करून टाकले. विधान परिषदेत मात्र हा प्रस्ताव मांडला गेला आणि तेथे सदस्यांनी भाषणो देखील सुरू केली. एका लोकनेत्याचा मृत्यू, त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने दोन दिवस सभागृह बंद ठेवून मनाचा मोठेपणा दाखवला असता, तर त्यात सरकारच मोठे झाले असते; पण ही संधी सरकारने गमावली हेच खरे.
 
विधान परिषदेत आदरांजली
मुंबई : सामान्य कुंटुंबात जन्मलेल्या गोपीनाथ मुंडे आपल्या अथक परीश्रमाने असामान्य नेते ठरले. उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या या नेत्याच्या जाण्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रत कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना, विधान परिषदेत व्यक्त करण्यात आली. 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिषदेत मुंडे यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडला.  गोपीनाथ मुंडे केवळ भाजपाचे नव्हे तर राज्याचे नेते होते. मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे मुंडे उत्तम संघटक, कुशल आणि हजरजबाबी नेते होते, असे पवार म्हणाले.  आज नियतीने आपला डाव साधला. अजूनही ते गेले यावर विश्वास बसत नाही. त्यांच्या निधनाने ओबीसी समाजाचा आत्माच हरपला, अशी भावना भुजबळ यांनी व्यक्त केली. मुंडे यांच्या जाण्याने मुत्सद्दी नेता, कुशल राजकारणी आणि सामान्यांचा आवाज हरवल्याचे विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे म्हणाले. यावेळी संसदीय कायर्मंत्री हर्षवर्धन पाटील, पाटबंधारे मंत्री सुनील तटकरे, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, आ. जयंत पाटील, हेमंत टकले आणि सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.