शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

कुपोषित मुलीला न बघताच आरोग्यमंत्र्यांनी गाठली मुंबई

By admin | Updated: September 24, 2016 04:04 IST

पालघर जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येमुळे प्रशासन हादरले

अरीफ पटेल,

मनोर- पालघर जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येमुळे प्रशासन हादरले असून राज्यपालांनी या प्रकरणाची दखल घेऊन नुकतीच संबंधित मंत्र्यांची हजेरी घेतली होती. मात्र, कुपोषणामुळे बळी गेलेल्या रोशनीच्या घरी गेलेले आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत पालघर तालुक्यातील टेनमोरपाडा येथील कुपोषणग्रस्त सुर्वी सुदाम अत्कारी या सात महिन्यांच्या मुलीला पाहण्यासाठी गाडीतून उतरलेही नाहीत. तिला पाहण्यासाठी त्यांनी आपल्यासोबत आलेल्या एका डॉक्टरला पाठवले आणि स्वत: मात्र मुंबई गाठली. त्यामुळे आदिवासींमध्ये संतापाची भावना आहे.आरोग्यमंत्री सध्या कुपोषणाची दखल घेत पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा परिसरात कुपोषिग्रस्तांची पाहणी करीत आहेत. गुरुवारी वाडा येथे त्यांचा दौरा होता. त्यानंतर सायंकाळी ते पालघर तालुक्यातील टेननाका मोरेपाडा येथे राहणाऱ्या सुर्वी या कुपोषणाच्या विळख्यात अडकलेल्या मुलीला पाहण्यासाठी निघाले. तिचे वजन केवळ दोन किलो २०० ग्रॅम आहे. मात्र, सावंत यांनी आदिवासीपाड्यापर्यंत पोहोचूनही गाडीबाहेर पायही ठेवला नाही. त्यांच्यासोबत आलेले डॉ. धुमाळ यांनी त्या मुलीची तपासणी केली. या वेळी पालघरचे शिवसेनाप्रमुख उत्तम पिंपळे उपस्थित होते. >चार दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होतीचार दिवसांपूर्वीच सुर्वीची प्रकृती गंभीर झाली होती, त्या वेळी शिवसेनेच्या दिलीप देसाई, वसंत ठाकरे यांनी तिला दुर्वेस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. डॉ. संजय बुरप्लले यांनी तिची तपासणी करून केंद्रात सुविधा नसल्याने रुग्णवाहिका बोलावून तिला डहाणू येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले होते. तिच्या आरोग्याबाबतची माहिती सावंत यांना देण्यात आली होती. ती मुलगी आता घरी आहे. तिला भेटण्यासाठीच ते टेननाका येथे आले होते. याबाबत डॉ. धुमाळ यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी जाऊन त्या मुलीची तपासणी केली. तिची प्रकृती आता बरी आहे. आरोग्यमंत्र्यांना महत्त्वाचा फोन आला, म्हणून ते न उतरता निघून गेले.’ लाल दिव्याची गाडी थांबली असल्याने कोणी तरी मंत्री आला आहे, ते पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. मात्र, गाडी पाड्यावर न जाता फिरून परत गेली. >बालमृत्यूंची आकडेवारी लपवणार नाही-दीपक सावंतवाडा : राज्याच्या आदिवासी भागांत होणारे बालमृत्यू जाहीर करावेत, बालमृत्यूंची आकडेवारी कोणीही लपवून ठेवू नये, अशा सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याने राज्य सरकार कोणत्याही प्रकारे बालमृत्यूंची आकडेवारी लपवणार नाही, अशी ग्वाही आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शुक्रवारी वाड्यात दिली. त्यांनी पेठरांजणी येथील कुपोषणाने दगावलेल्या रोशनी सवरच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पालघर जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी सरकार गांभीर्याने प्रयत्न करत असून रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पावले उचलली जातील. मुंबईतील नामांकित रुग्णालयांतील डॉक्टरांसोबत गुरुवारीच बैठक झाली आहे. या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र दत्तक घेऊन मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर आरोग्य विभागाच्या यंत्रणेबरोबरच सेवा देतील, असे त्यांनी सांगितले.योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपण प्रयत्नशील असून भविष्यात बालमृत्यूचा दर कमी करण्यावर विशेष भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी माजी आमदार दौलत दरोडा, शिवसेना गटनेते नीलेश गंधे, जि.प. सदस्य प्रकाश निकम, गिरीश पाटील, प्रकाश किणी आदींसह शासकीय अधिकारी उपस्थित होते.>आरोग्यमंत्री कुपोषणाची बळी ठरलेल्या रोशनीच्या कुटुंबीयांना भेटले, मात्र त्यांनी कुपोषणग्रस्त सुर्वीच्या घरी जाणे टाळले. त्यामुळे नाराजी आहे.