शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

‘आदिवासी मुलांची आरोग्य तपासणी करा’

By admin | Updated: June 9, 2016 04:19 IST

सर्वच अंगणवाड्यांतील मुलांची पावसाळ्यापूर्वी आरोग्य तपासणी करण्यासाठी फिरती आरोग्य पथके नेमावी, तसेच या भागात सातत्याने आरोग्य शिबिरे घ्यावी

ठाणे : नवसंजीवन योजनेंतर्गत जिल्ह्यातील आदिवासी भागामधील सर्वच अंगणवाड्यांतील मुलांची पावसाळ्यापूर्वी आरोग्य तपासणी करण्यासाठी फिरती आरोग्य पथके नेमावी, तसेच या भागात सातत्याने आरोग्य शिबिरे घ्यावी. त्याचबरोबर दुर्गम व अतिसंवेदनशील क्षेत्राबरोबर आदिवासी भागात अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी आदिवासी विभागामार्फत वाहन उपलब्ध करून तो कसा सुरळीत होईल, याकडे लक्ष देण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सूचना केल्या आहेत. या योजनेचा आढावा घेण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक झाली. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढावा घेण्यात येईल. पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांशी संपर्क होण्यासाठी रस्त्यांची डागडुजी करण्यास त्यांनी सांगितले. आदिवासी क्षेत्रातील श्रेणी-३ व श्रेणी-४ मधील सर्व बालकांना आंतररु ग्ण सेवा व तातडीने औषधोपचार कसे मिळतील, त्याचबरोबर या भागात रोजगार कसा मिळेल, याकडे लक्ष द्यावे. खावटी कर्जवाटप व्यवस्थित करा. अंगणवाड्यांना पूरक पोषक आहार त्वरित कसा मिळेल, याकडे लक्ष देण्यात यावे. आदिवासी भागातील शहापूर २३३, भिवंडीतील ७३, मुरबाड ७७ व अंबरनाथ तालुक्यातील ४ गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (जेडब्ल्यूएसएम) यांनी तत्काळ तपासणी करावी, अशी सूचना दिली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोरराजे निंबाळकर, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, जिल्हापुरवठा अधिकारी डॉ. मोहन नळदकर व इतर अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)