शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

आरोग्य विभाग जपणार शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य !

By admin | Updated: September 19, 2015 04:17 IST

पीक वाया गेले, घेतलेले कर्ज कुठून फेडणार, पदराकाठी उरलेल्या पैशांत घर कसं चालवणार, घरात अन्नाचा दाणा नाही, अशा अनेक विवंचनांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांना मानसिक

मुंबई : पीक वाया गेले, घेतलेले कर्ज कुठून फेडणार, पदराकाठी उरलेल्या पैशांत घर कसं चालवणार, घरात अन्नाचा दाणा नाही, अशा अनेक विवंचनांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग योजना आखत आहे, अशी माहिती ‘लोकमत’ला आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. दुष्काळामुळे ग्रासलेल्या शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचल्याने यंदा राज्यातील ६४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला विविध स्तरातून आर्थिक मदत केली जात आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावते. पण त्याचबरोबरीने अनेक कारणे असतात, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. या शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवल्यास अशा विचारांपासून ते लांब राहतील, असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. वैफल्यग्रस्त अवस्थेत असणाऱ्या शेतकऱ्यांचे निदान होण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे मानसोपचार तज्ज्ञाकडे औषधोपचार सुरू आहेत, असे सांगण्यास व्यक्ती तयार होत नाहीत. मानसोपचाराविषयी आपल्याकडे अजूनही गैरसमज आहेत. यामुळे तणावाखाली असलेली व्यक्तीही मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्यास तयार नसते, असे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे. शेतकऱ्यांना मानसिकरीत्या सक्षम करण्यासाठी योजना हाती घेण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत मानसिक ताणाखाली असलेल्या शेतकऱ्यांवर उपचार केले जाणार आहेत, असे आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.