शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

आरोग्य विभाग जपणार शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य !

By admin | Updated: September 19, 2015 04:17 IST

पीक वाया गेले, घेतलेले कर्ज कुठून फेडणार, पदराकाठी उरलेल्या पैशांत घर कसं चालवणार, घरात अन्नाचा दाणा नाही, अशा अनेक विवंचनांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांना मानसिक

मुंबई : पीक वाया गेले, घेतलेले कर्ज कुठून फेडणार, पदराकाठी उरलेल्या पैशांत घर कसं चालवणार, घरात अन्नाचा दाणा नाही, अशा अनेक विवंचनांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग योजना आखत आहे, अशी माहिती ‘लोकमत’ला आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. दुष्काळामुळे ग्रासलेल्या शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचल्याने यंदा राज्यातील ६४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला विविध स्तरातून आर्थिक मदत केली जात आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावते. पण त्याचबरोबरीने अनेक कारणे असतात, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. या शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवल्यास अशा विचारांपासून ते लांब राहतील, असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. वैफल्यग्रस्त अवस्थेत असणाऱ्या शेतकऱ्यांचे निदान होण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे मानसोपचार तज्ज्ञाकडे औषधोपचार सुरू आहेत, असे सांगण्यास व्यक्ती तयार होत नाहीत. मानसोपचाराविषयी आपल्याकडे अजूनही गैरसमज आहेत. यामुळे तणावाखाली असलेली व्यक्तीही मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्यास तयार नसते, असे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे. शेतकऱ्यांना मानसिकरीत्या सक्षम करण्यासाठी योजना हाती घेण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत मानसिक ताणाखाली असलेल्या शेतकऱ्यांवर उपचार केले जाणार आहेत, असे आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.