शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

मुख्याध्यापक, संचालक दप्तर ओझ्यासाठी जबाबदार

By admin | Updated: November 19, 2015 02:54 IST

दप्तराच्या ओझ्यातून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी शाळास्तरावर प्रयत्न करण्यात आले नाहीत, तर त्यासाठी शाळेच्या दैनंदिन कामाजात लक्ष घालणाऱ्या व नियामक मंडळाने

मुंबई : दप्तराच्या ओझ्यातून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी शाळास्तरावर प्रयत्न करण्यात आले नाहीत, तर त्यासाठी शाळेच्या दैनंदिन कामाजात लक्ष घालणाऱ्या व नियामक मंडळाने नामनिर्देशित केलेल्या संचालकांना व मुख्याधापकांना जबाबदार धरण्यात येईल आणि तसा शासन निर्णय काढण्यात आल्याची माहिती बुधवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली.विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे त्यांच्या वजनापेक्षा अधिक असल्याने त्यांना अनेक शारीरिक त्रास जडतात. त्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ई-लर्निंग, लॉकर व तासांमध्ये बदल करण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका चेंबूरच्या समाजसेविका स्वाती पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठापुढे होती.गेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने २१ जुलै २०१५च्या शासन निर्णयामधील तरतुदींवर शाळांनी अंमलबजावणी न केल्यास कोणाला जबाबदार धरणार, अशी विचारणा सरकारी वकील अ‍ॅड. अंजली हेळेकर यांच्याकडे केली होती. सर्व शाळांना शासन निर्णयावर अंमलबजावणीकरिता आवश्यक सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे, असेही ५ नोव्हेंबरच्या शासन निर्णयात म्हटले आहे. खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी गुरुवारी ठेवली आहे. (प्रतिनिधी)