शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

३0 नोव्हेंबरपर्यंत दप्तराचे ओझे कमी न झाल्यास मुख्याध्यापक जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2015 03:02 IST

पालकांनीही दक्षता घेणे अनिवार्य.

अकोला : शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्यातील शाळांना देण्यात आलेला ३ महिन्यांचा कालावधी येत्या ३0 नोव्हेंबर रोजी संपणार असून, त्यानंतरही दप्तराचे ओझे कमी न झाल्यास, संबंधित मुख्याध्यापकास जबाबदार धरल्या जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे प्रमाणापेक्षा अधिक असल्याने, विद्यार्थ्यांना पाठदुखी, सांधे दुखी, स्नायू आखडणे, मणक्यांची झीज, मान दुखणे, फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, थकवा येणे, मानसिक ताण, इत्यादी आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना बालवयातच अशा प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याने, भविष्यात त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. दप्तराचे वजन विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १0 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, तसेच शाळांमध्ये ग्रंथालयाच्या धर्तीवर ह्यदप्तरालयह्ण सुरू करावे,अशा प्रकारच्या विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील शाळांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी शाळांकडे ३0 नोव्हेंबरपर्यंतचा अवधी शिल्लक राहिला आहे. येत्या ३0 नोव्हेंबरपर्यंत दप्तराचे ओझे कमी न झाल्यास, शाळेचे मुख्याध्यापक, तसेच नियामक मंडळाचे नामनिर्देशित संचालक जबाबदार राहणार आहेत. शाळा व्यवस्थापनासोबतच पालकांनीही यासाठी विशेष दक्षता घेणे अनिवार्य असल्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकुंद यांनी सांगितले.