शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

३0 नोव्हेंबरपर्यंत दप्तराचे ओझे कमी न झाल्यास मुख्याध्यापक जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2015 03:02 IST

पालकांनीही दक्षता घेणे अनिवार्य.

अकोला : शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्यातील शाळांना देण्यात आलेला ३ महिन्यांचा कालावधी येत्या ३0 नोव्हेंबर रोजी संपणार असून, त्यानंतरही दप्तराचे ओझे कमी न झाल्यास, संबंधित मुख्याध्यापकास जबाबदार धरल्या जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे प्रमाणापेक्षा अधिक असल्याने, विद्यार्थ्यांना पाठदुखी, सांधे दुखी, स्नायू आखडणे, मणक्यांची झीज, मान दुखणे, फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, थकवा येणे, मानसिक ताण, इत्यादी आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना बालवयातच अशा प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याने, भविष्यात त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. दप्तराचे वजन विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १0 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, तसेच शाळांमध्ये ग्रंथालयाच्या धर्तीवर ह्यदप्तरालयह्ण सुरू करावे,अशा प्रकारच्या विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील शाळांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी शाळांकडे ३0 नोव्हेंबरपर्यंतचा अवधी शिल्लक राहिला आहे. येत्या ३0 नोव्हेंबरपर्यंत दप्तराचे ओझे कमी न झाल्यास, शाळेचे मुख्याध्यापक, तसेच नियामक मंडळाचे नामनिर्देशित संचालक जबाबदार राहणार आहेत. शाळा व्यवस्थापनासोबतच पालकांनीही यासाठी विशेष दक्षता घेणे अनिवार्य असल्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकुंद यांनी सांगितले.