शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

३0 नोव्हेंबरपर्यंत दप्तराचे ओझे कमी न झाल्यास मुख्याध्यापक जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2015 03:02 IST

पालकांनीही दक्षता घेणे अनिवार्य.

अकोला : शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्यातील शाळांना देण्यात आलेला ३ महिन्यांचा कालावधी येत्या ३0 नोव्हेंबर रोजी संपणार असून, त्यानंतरही दप्तराचे ओझे कमी न झाल्यास, संबंधित मुख्याध्यापकास जबाबदार धरल्या जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे प्रमाणापेक्षा अधिक असल्याने, विद्यार्थ्यांना पाठदुखी, सांधे दुखी, स्नायू आखडणे, मणक्यांची झीज, मान दुखणे, फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, थकवा येणे, मानसिक ताण, इत्यादी आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना बालवयातच अशा प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याने, भविष्यात त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. दप्तराचे वजन विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १0 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, तसेच शाळांमध्ये ग्रंथालयाच्या धर्तीवर ह्यदप्तरालयह्ण सुरू करावे,अशा प्रकारच्या विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील शाळांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी शाळांकडे ३0 नोव्हेंबरपर्यंतचा अवधी शिल्लक राहिला आहे. येत्या ३0 नोव्हेंबरपर्यंत दप्तराचे ओझे कमी न झाल्यास, शाळेचे मुख्याध्यापक, तसेच नियामक मंडळाचे नामनिर्देशित संचालक जबाबदार राहणार आहेत. शाळा व्यवस्थापनासोबतच पालकांनीही यासाठी विशेष दक्षता घेणे अनिवार्य असल्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकुंद यांनी सांगितले.