शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या दोनशे रुपयांसाठी त्याने गमावले कुटुंब

By admin | Updated: November 6, 2016 02:19 IST

मुंबादेवीला जाण्यासाठी आणखी एक टॅक्सी केल्यास अधिकचे दोनशे रुपये खर्च करावे लागतील त्यापेक्षा एकत्रच अ‍ॅडजेस्टमेंट करून एकाच टॅक्सीतून जाऊ या, असा अवघ्या दोनशे

- मनीषा म्हात्रे, मुंबई

मुंबादेवीला जाण्यासाठी आणखी एक टॅक्सी केल्यास अधिकचे दोनशे रुपये खर्च करावे लागतील त्यापेक्षा एकत्रच अ‍ॅडजेस्टमेंट करून एकाच टॅक्सीतून जाऊ या, असा अवघ्या दोनशे रुपयांसाठी घेतलेला निर्णय वर्मा कुटुंबीयांच्या जिवावर बेतल्याची हृदयद्रावक कहाणी समोर आली. यात गेल्या २० वर्षांपासून असलेल्या गाडी चालविण्याचा अतिआत्मविश्वासही चालकाला नडल्याचे दिसून आले.वडाळा येथील भीमवाडी परिसरात मंगरू वर्मा (४०), पत्नी अंतरा आणि मुलगा राजकुमार, मुलगी आशासोबत भाड्याने राहतो. गेल्या २० वर्षांपासून तो टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. दिवाळीची सुटी असल्याने अंतराने बहीण राजश्रीच्या कुटुंबीयांना घरी बोलावून घेतले होते. शुक्रवारी रात्री राजश्री ही पत्नी आणि दोन मुलांसोबत घरी आली. रात्री त्यांनी एकत्र जेवण केले. जेवतानाच त्यांनी शनिवारी सकाळी मुंबादेवीच्या दर्शनाचा बेत आखला. या वेळी दोन टॅक्सी करण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे सकाळी निघताना मंगरूने सहकारी टॅक्सीचालक मित्राला फोन केला होता, अशी माहिती त्याचे नातेवाईक मुन्ना वर्मा यांनी दिली. तेव्हा कमीतकमी २०० रुपये होतील असे त्याला सांगण्यात आले.मात्र अधिकचे दोनशे रुपये कशाला खर्च करायचे? ८ जणांना टॅक्सीतून नेताना अडचण येणार नाही. या विचाराने त्याने रवीसह आणखी एकाला पुढच्या सीटवर बसविले; तर पाठीमागे पत्नी, मुलगी तसेच साडूच्या कुटुंबीयांना बसविले. आशा आणि राजकुमार त्यांच्या पायात बसले होते. सकाळी पावणेनऊच्या सुमारास त्याने घर सोडले. तेथून वाडीबंदर येथे वळण घेत असताना अचानक वाढलेल्या भारामुळे टॅक्सीचा दरवाजा उघडला. त्यातून दोघी जणी खाली फेकल्या गेल्या. ते पाहताच मंगरूचेही गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. काय झाले कळलेच नाही...आम्ही गप्पा मारत मुंबादेवीच्या दर्शनाला निघालो. अशात अचानक गाडीचा दरवाजा उघडला. मी पायाजवळ असल्याने काही समजले नाही. काय झाले कळण्याच्या आतच आमची गाडी खांबावरून भिंतीला धडकली. त्यानंतर कुटुंबीय बेशुद्धावस्थेत दिसले. काय करायचे सुचत नव्हते. सारेकाही शांत झाले होते आणि मीही खाली कोसळलो, असे यामध्ये जखमी झालेल्या विनय वर्माने सांगितले. घटनास्थळावरील वास्तवअपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी त्यांच्या चौकीच्या खिडकीतून डोकावून पाहिले. तेव्हा अपघाताचे भीषण वास्तव लक्षात घेत त्यांनी अवघ्या काही मिनिटांत तेथे धाव घेतली. तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात गाडीत अडकलेल्या कुटुंबीयांपैकी प्रथम कुणाला काढायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला. या वेळी वाहतूक पोलीस वरिष्ठ निरीक्षक प्रमोद तांबे, पोलीस अंमलदार प्रवीण शिंदे आणि सुरवडे घटनास्थळी दाखल होते. त्यापाठोपाठ डोंगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश कातकर यांनी सहकारी अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळ गाठले. दोन महिलांचे मृतदेह रस्त्यावर पडले होते तर सात जण टॅक्सीमध्ये अडकले होते. अजूनही कुटुंबीय जगल्याची आशा... आम्ही एकत्र जाऊ असा विचार मनात होता. म्हणून दुसरी टॅक्सी करणे गरजेचे समजले नाही. मात्र माझ्या बाजूने गेलेल्या बसला सावरण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे मंगरू याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अपघातानंतर मी व साडूचे दोन मुले आम्ही शुद्धीवर होतो. मात्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुटुंबीयांना पाहून माझी शुद्ध हरपली. त्यानंतर जाग आली तेव्हा मी रुग्णालयात होतो. माझ्या मुलांवर, पत्नीवर उपचार सुरू आहेत, असे मंगरूने ‘लोकमत’ला सांगितले. अपघातात त्याच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाल्याबद्दल तो अनभिज्ञ आहे.‘माझे आई-वडील कसे आहेत?अपघातात आई-वडिलांसह बहिणीच्या मृत्यूबाबत अनभिज्ञ असलेले रवी वर्मा डॉक्टर, नातेवाइकांकडे आई- वडिलांबाबत चौकशी करीत आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये म्हणून नातेवाइकांकडून कुटुंबीयांवर उपचार सुरू असल्याबाबत सांगण्यात येत आहे.घरी जेवणासाठी येणार होते... कालच सुरतहून नात्याने दीर लागत असलेला हरिकेश घरी आल्याने आम्ही सगळेच खूप आनंदात होतो. रात्रीचे जेवण त्यांनी अंतराच्या घरी केले, मात्र शनिवारी रात्री ते आमच्याकडे जेवणाला येणार होते. त्यानुसार मी बेतही ठरवला होता. मात्र सकाळी सुरतच्या भावाकडून मिळालेल्या माहितीने धक्काच बसला. त्याच्याकडून आम्हाला या अपघाताची माहिती मिळाल्याचे सरस्वती रामचंद्र वर्मा यांनी सांगितले. या घटनेमुळे वर्मा कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.